Category: ठाणे

Thane news

अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर मनसे नेते अविनाश जाधव नतमस्तक

ठाणे : शहर मतदार संघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर…

कल्याण पूर्वेत शक्तिप्रदर्शन करत सुलभा गायकवाड यांनी भरला उमेदवारी अर्ज

 शिवसेनेतील नाराज गटाची मिरवणुकीकडे पाठ   कल्याण : कल्याण पूर्वेतील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज गुरूवारी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेतील नाराज गटाने महायुतीच्या या मिरवणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. गोळीबार प्रकरणामुळे भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत. त्यामुळे यावेळी भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याचे वातावरण भाजपने बुधवारी निर्माण केले होते. पण व्यस्ततेमुळे तेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपील पाटील, आमदार कुमार आयलानी, रिपब्लिकन पक्षाचे अण्णा रोकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे सहभागी झाले होते. तिसगाव नाका येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. मिरवणुकीत चित्ररथ, ढोल-ताशा, कर्णकर्कश वाद्ये यांचा समावेश होता. महायुती आणि सुलभा गायकवाड यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सजविलेल्या रथामधून उमेदवार सुलभा गायकवाड, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सुलभा गायकवाड यांचे कुटुंबीय उपस्थितांना अभिवादन करत होते. शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरवली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्याण पूर्वेत आणून महायुतीमधील नाराजांना सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण, या नाराजांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची पूर्ण नजर राहणार असल्याची चर्चा आहे. मिरवणुकीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोट अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील निवडणूक शिवसेना-भाजप युतीमधून लढवत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा दांडगा जनसंपर्क येथे आहे. अनेक विकास कामे या भागात त्यांनी केली आहेत. तोच विकासाचा अजेंडा समोर ठेऊन सुलभा गायकवाड या निवडणूक लढवित आहेत. त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. रवींद्र चव्हाण (भाजप नेते)

‘गद्दारांना क्षमा नाही’ आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या’

 ठाण्यात निष्ठावान शिवसैनिकांचे शक्तीस्थळावर गाऱ्हाणे, राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज ठाणे : गद्दारांना क्षमा नको आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या असे म्हणत ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे यांचा गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर गाऱ्हाणे घातले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांचे राजन विचारे यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी, हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना(शिंदेगट) खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरेगट) माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे ४८ हजार मतांनी पिछाडीवर होते. तर, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या मतदारसंघातही विचारे यांना मोठा फटका बसला. परंतू, शिंदे यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्तीय देखली आग्रही होते. परंतू, या मतदारसंघातून केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे. तर, विचारे हे २००९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्शभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांनाच ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राजन विचारे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ही दर्शन घेतले. तर, अर्ज दाखल केल्यानंतर दिघे यांच्या शक्तीस्थळावर दर्शन घेऊन सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी गद्दारांना क्षमा नाही आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या, यासाठी आपले शिलेदार राजन विचारे यांचा सर्वाधिक मतांनी विजय व्हावा असे म्हणत गाऱ्हाणे घातले. 00000

मोहम्मद सालेमउद्दीनला ठाणे ‘जिल्हा नॅचरल श्री’ किताब

ठाणे : ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटना आणि अमित नांदगावकर आयोजित रमेश नांदगावकर आणि रत्नप्रभा रमेश नांदगावकर स्मृती ठाणे जिल्हा नॅचरल श्री  शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाव्या गटातील युनिव्हर्सल फिजिक सेंटरच्या मोहम्मद सालेमउद्दीनने…

विधानसभेसाठी लोकराज्य पार्टीच्या  16 उमेदवारांची पहिली यादी जाहिर

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीची 16 उमेदवारांची पहिली यादी ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आली. लोकराज्य  पार्टीचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. नरेंद्र पाटील – 172 अणुशक्ती नगर, मुंबई; निल शिवडीकर – 183 शिवडी, मुंबई; कमलेश पोखरे – 173 चेंबूर, मुंबई; संजीवनी वैती. – 155 मुलुंड, मुंबई; बाबुकुमार कांबळे – 147 कोपरी पंचपाखाडी; सुनील विश्वकर्मा – 146 ओवळा माजिवडा; जालिंदर सिनलकर – 148 ठाणे शहर, धीरज मोरे – 118 सटाणा; हेमंत कोळी – 190 उरण; अॅड.  विलास निकुम – 2 शहादा, नंदुरबार (ST); सुभाष बाविस्कर – 105 कन्नड, संभाजी नगर (औरंगाबाद); रवींद्र जाधव – 111 गंगापूर, संभाजी नगर (औरंगाबाद); भूपेंद्र गवते – 150 ऐरोली, नवी मुंबई; सौ. ज्योती गायकवाड-पवार – 174 कुर्ला, मुंबई (SC); सौ. संगीत जामनेकर – 37 बडनेरा, अमरावती आणि विशाल बगाळे – 39 तिवसा, अमरावती अशी त्यांची नावे आहेत. राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती-जमातींचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य  पार्टी चे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची सामाजिक मोट बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 50 विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अश्या निवडक 40 ते 50 विधानसभा मतदारसंघांतून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व अनुसूचित जातीजमातींसह इतर मागासवर्गीय बहूजनांचे प्राबल्य  असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी सामंजस्याने संघटितपणे निर्णय घेऊन “एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणे” हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे, अशी माहीती लोकराज्य पक्षाचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 0000

ठाण्यात आजपासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि राज ठाकरे हे उपस्थित राहणार   ठाणे : आजचा गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तर, अविनाश जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे गुरूवारपासून ठाण्यातील मतदार संघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. परंतु शिवसेना (ठाकरे गट) या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. अर्ज भरण्यापुर्वी त्यांच्याकडून मिरवणुक काढली जाणार असून त्यात ते शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण ग्रामीण भागात आले होते. त्यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांची तर, ठाणे शहरातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. अविनाश जाधव हे सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुक लढविणार आहेत. ते सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड हे मुंब्रा भागात मिरवणुक काढून शक्ती प्रर्दशन करणार आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजपचे आमदार संजय केळकर हे वसुबारसचा मुहूर्त साधत सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पुर्वी ते मिरवणुक काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. असे असले तरी त्यांनी मंगळवारी दमाणी इस्टेटमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपा घर चलो अभियानांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून यामध्ये ४०० बुथवरील पदाधिकारी घरोघरी जाऊन केळकर यांची माहिती पत्रकांचे वाटप करणार आहेत. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने दुर्मिळ असा ‘ गुरुपुष्यामृत योग ‘ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ( सकाळी ६.३७ ) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत ( शुक्रवारी सकाळी ६.३७ ) हा योग आहे. गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच चांगल्या कामांचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे, असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह…

‘माझी टीएमटी’ मोबाईल ॲप ची केवळ घोषणा

ठाणे : परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का…

 ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आयुक्त सौरभ राव यांना इशारा

अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार!   अनिल ठाणेकर ठाणे : अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई न करता प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवून चौकशीचा फार्स केल्याने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संबंधित अधिकारी अभय देत नागरी सुविधा पुरवत असल्याने शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढत असल्याने अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता. मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड,वागळे येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी व  त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरता मा.ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती.या लक्षवेधी सुचनेवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहाने सर्वानुमते ६ सप्टेंबर २०२१ रोजी अनधिकृत बांधकामांच्या चौकशीचा ठराव पारित केला होता.त्या ठरावाच्या व २००९ च्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीच्या दिलेल्या आदेशानुसार ठा.म.पा सेवेतील  सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी ह्या चौकशी अधिकारी नेमुण करण्यात आल्या व प्रतिनियुक्ती वर आलेल्या सहाय्यक आयुक्तांची शासनाने चौकशी केली होती. बारा पैकी अकरा सहाय्यक आयुक्तांना चौकशी अधिकाऱ्याने दोषारोपातून मुक्त केले आहे आणि एका सहाय्यक आयुक्ताची चौकशी प्रलंबित आहे. या प्रकरणी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकाम करणारे ठा.म.पा सेवेतील व प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी जर निर्दोष असतील तर अनधिकृत बांधकामे करणारे व त्यास जबाबदार असणारे कोण..? तसेच या प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्याने सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावाखाली क्लीन चिट देण्यात आली.तसेच आयुक्तांनी हा बोगस चौकशी अहवाल स्वीकारू नये व या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी  ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे केली आहे.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

अनिल ठाणेकर मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आज रात्री उशीरा ४५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. पक्षातील विद्यमान जवळपास सर्वच आमदारांना पुन्हा विधानसभेची तिकीट जाहीर करण्यात आली आहे. जेथे विद्यमान आमदार खासदारकीची…