Category: ठाणे

Thane news

भिवंडीत नवरात्रोत्सव आणि गरबा उत्सवाला गर्दी

भिवंडी : शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील सर्व हिंदूबहुल भागात दुर्गामातेच्या भव्य मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तेथे मोठ्या संख्येने महिला गरबा खेळत दुर्गामाता व अंबेमातेसाठी…

न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक…

कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून तडकाफडकी कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पुढाकार घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना साकडे घालून या कामगारांना पुन्हा नोकरी मिळवून दिली. सर्व कामगार आज पुन्हा कामावर रुजू झाले असून, या कामगारांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या सहा ते सात वर्षांपासून १४८ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलकुंभ, व्हॉल्व्ह आणि बिलांचे वाटप आदी कामे त्यांच्याकडे सोपविलेली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने अचानक सर्वांना काढून टाकले. त्यातील काही जणांनी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांना साकडे घातले होते. त्यानंतर भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या प्रश्नांवर सुरुवातीपासून आयुक्त राव यांची भूमिका सहानुभूतीची होती. अखेर आज आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराने सर्व १४८ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास मान्यता दिली. सर्व कामगार आज पुन्हा कामावर रुजू झाले. या कामगारांना दिवाळीचा बोनस मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी सांगितले. पुन्हा नोकरी मिळाल्याचा आनंद तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या निर्णयानंतर त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. तसेच आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेवक भरत चव्हाण, युवा मोर्चाचे सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले. यापुढील काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कंत्राटी कामगारांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही भरत चव्हाण यांनी दिली. 00000

डॉ.महेश अग्रवाल यांची राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या सहाय्यक मंत्रीपदी नियुक्ती

ठाणे : राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा ही महात्मा गांधींनी 1936 मध्ये स्थापन केलेली अखिल भारतीय संस्था, गेली 88 वर्षे देशभरातील राज्यांमध्ये आणि परदेशातही हिंदी मासिके, पुस्तके प्रकाशित करत आहे आणि…

संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा हरियाणातील विजय साजरा

ठाणे : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केल्यावर ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ठाणे शहरात विजयी जल्लोष केला. भाजपाच्या वर्तकनगर येथील कार्यालयाबाहेर फटाके फोडून…

दुबार मतदार न  वगळल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार –  आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार आहेत. ही नावे निवडणूक आयोगाने वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तीनदा निवडून आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करीत आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. पुढील काही दिवसांमध्ये पार पडणा-या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक पूर्व सर्वे केले असता त्या दरम्यान मतदार यादीमधील अनेक चुका आढळून आल्या आहेत. आम्ही केलेल्या सर्वेनुसार या मतदार संघामध्ये असलेल्या यादी क्र. १ ते ३९२ बूथ (एकूण मतदार ४,४३,३३१) मध्ये जवळ-जवळ ३१,२३४ दुबार मतदारांची नावे आम्हांला आढळून आली असल्याबाबत त्या नावांवर आम्हांला हरकत असून ती दुबार नावे तात्काळ वगळण्यात यावीत अशा आशयाचे पत्र आम्ही १८ जुलै,  मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांना दिले. त्यानंतर ६ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये आम्हांला ३०,८१२ दुबार नावे आढळली त्यानंतर हरकती नोंदविण्याच्या कालावधीमध्ये आम्ही ९ ऑगस्ट, २०२४ रोजी पुन्हा मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांच्याकडे पत्राद्वारे या याद्यांमध्ये आढळलेली ३०,८१२ दुबार नावे वगळण्याबाबची विनंती केली. अंतिम मतदार यादी दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर देखील आम्ही पुन्हा सर्वे केला असता; आजही त्या मतदार याद्यांमध्ये यादी क्र. १ ते ४०९ (एकूण मतदार ४,६८,२५२) मध्ये २४,२२६ दुबार मतदार आहेत. आम्ही मा. उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांच्याकडून माहिती घेतली असता, आम्ही १८ जुलै, २०२४ व ९ ऑगस्ट, २०२४ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ५,८८४ दुबार नावे वगळण्यात आल्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला असल्याची तोंडी माहिती त्यांनी दिली. तसेच २७ सप्टेंबर, २०२४ रोजी मा. मा. उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांना पत्राद्वारे यादी क्र. ३७७ ते ४०९ या याद्यांमध्ये १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदार देखिल नोंदविण्यात आल्याची लेखी तक्रार आम्ही केली आहे. तसेच ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी यादी क्र. ३७७ ते ४०९ मधील याद्यांवर निवडणूक विभागाचे BLO यांच्याबरोबर राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेमलेले BLA यांनी या याद्यांचा सर्वे करुन मतदारांची तपासणी करावी अशा प्रकारचे देखिल पत्र दिले आहे, त्याबाबतही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा ४ ऑक्टोबर, २०२४ रोजी आजही यादी क्र. १ ते ४०९ मध्ये असलेली २४,४२६ दुबार नावे वगळण्याबाबत उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे.१४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार आहेत. ही नावे निवडणूक अधिकाऱ्यांनी वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तीनदा निवडून आलेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचरी काम करीत आहेत, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बोलताना दिली आहे. चौकट डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.ज्या माणसावर किडनॅपिंग चा गुन्हा आहे, ज्या माणसावर स्री शक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे.मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को व खोटी पिटाची केस करण्याचा षड्यंत्र रचण्याचा आरोप आहे. यांनी तरी दुसऱ्याला नावे ठेऊ नयेत.आम्हीही त्यांना कुठल्या ना कुठल्या नावाने बोलु शकतो पण माझ्यावर ते संस्कार नाहीत. नवरात्रीचा मंगलमय पर्व चालू आहेत. करोडो हिंदूंचे आस्था असलेले प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य ते करु शकतात, विश्वरत्न, भारतरत्न, बोधीसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जे फाडू शकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचे ? ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात, भाषा,मर्यादा सोडून बोलणे हा त्यांचा गुण आहे.पण जनाची नाही पण मनाची लाज त्यांनी दुसऱ्याला नावे ठेवताना त्यांनी दाखवायला हवी, अशी अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हवी असे मला वाटत नाही, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटले. ००००

मनसेचे ठाणे-पालघरवर फोकस

ठाणे, ता. ६ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. ठाणे-पालघर…

नवरात्रीत ध्वनीप्रदुषण केल्यास कारवाई

ठाणे : सणासुदीच्या काळात अतिउत्साहात नागरिक कायद्याचे उल्लंघन करतात; मात्र कायद्याचे उलंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. नवरात्रोत्सवात लाऊडस्पीकर, डीजेच्या आवाजावर निर्बंध ठेवणे गरजेचे आहे. अतिउत्साहात मंडळाने ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. ठाणे संस्कृतीचे शहर आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विविध सण जल्लोषात साजरे करण्यात येतात. तसेच, मिरवणुकीच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) वापर करण्याला परवानगी असल्याने मंडळे विविध प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामग्रीच्या ध्वनिक्षेपकाचा, डॉल्बी, डीजेचा वापर करतात. ज्यात ध्वनीचे प्रमाण जास्त असल्याने सामान्यजनतेच्या आरोग्य व मानसिक स्वास्थावर विपरीत परिणाम होतो. सण–उत्सव सर्व नागरिकांना उत्साहात साजरे करता यावेत, या निखळ भावनेने आयुक्तांनी ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत जनतेला जाहीर आवाहन केले आहे. उत्सव साजरा करताना कायद्याचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अन्यथा ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाखाचा दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, रात्री दहा ते पहाटे सहापर्यंतच्या कालावधीत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. तर, ठरावीक ठिकाणी ध्वनिक्षेपकाला परवानगी रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे.

३०० घरेलु कामगारांना शासकीय लाभ!

तारामाऊली सेवाभावी संस्थेने मिळवून दिला  भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : तारामाऊली सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन कोपरी परिसरातील ३०० घरेलु कामगार महिलांच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभापाठोपाठ घरेलु कामगार कुटुंबांना भांड्याचे संच भेट म्हणून मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी घरेलु कामगारांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. हातावर पोट असलेल्या कोपरी परिसरातील सामान्य घरकामगार महिलांना भरत चव्हाण यांच्याकडून नेहमी सहकार्य केले जाते. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ कुटुंबांना मिळवून दिले जातात. त्यानुसार घरेलु कामगारांच्या योजनेतून कोविड आपत्तीच्या काळात कोपरी परिसरातील ३०० हून अधिक घरेलु महिला कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह तारामाऊली सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून कोपरीतील घरेलु महिला कामगारांचे अर्ज भरुन घेण्यात आले होते. तसेच या अर्जासाठी कागदपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने दाखले शिबीर भरविण्यात आले होते. नोंदणीकृत घर कामगार भगिनींना महायुती सरकारने ३० भांडी असलेला गृह उपयोगी भांड्याचा सेट भेट म्हणून दिला आहे. कोपरी परिसरात या भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी या भगिनींनी महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, तारामाऊली सेवा संस्थेच्या माध्यमातून नुकतेच कोपरी भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी महिला भगिनींना साडीभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

विधानसभेसाठी मराठा समाजाचा ‘मराठा पॅटर्न’

 महिनाभर मराठा जोडो अभियान ठाणे : मराठा समाजाबाबत सर्वच राजकिय पक्षांची उदासिनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवुन देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने “मराठा पॅटर्न” राबवण्याचा यल्गार केला आहे. या अनुषंगाने आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीब सुरू झाला असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला प्रविण पिसाळ, प्रविण कदम, दत्ता चव्हाण, दिनेश पवार, रमेश चौधरी, संतोष पालांडे आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना, समन्वयक ॲड. सुर्यवंशी यांनी, यापूर्वी राणे समितीच्या अहवालावरून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही, नंतर युती सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.तेव्हा, आम्हाला केवळ गृहित धरले जाते, असे असंविधानिक आरक्षण देण्याऐवजी ५० टक्यांच्या आतच आरक्षण द्यावे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोग तसेच शिंदे समितीनेही अनुकुल अहवाल दिला असे असतानाही ४० वर्ष झाली तरी मागण्या मान्य होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठा पॅटर्न राबवणार आहे. तसेच आगामी एक महिना ठाण्याच्या चौकाचौकात “मराठा जोडो अभियान” राबवुन मराठा समाजाला जागरूक करणार आहे.   ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासह चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद असल्याने मराठा उमेदवार देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे विधानसभेत १ लाख ३५ हजार मराठा मतदार तर ओवळा – माजीवडयात ५ लाख मतदारांपैकी १ लाख ५० मराठा, कोपरी- पाचपाखाडीत ८० हजार आणि कळवा – मुंब्रा मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदार आहेत. याकडेही मराठा समन्वयकांनी लक्ष वेधले. चौकट मराठा समाजाच्या मागण्या * कोपर्डी अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. * ५० टक्याच्या आत टिकणारे आरक्षण हवे. * जातनिहाय जनगणना झाली पाहिजे * ओबीसीसह सर्व जातींचे फेर सर्वेक्षण व्हावे * सारथी उपकेंद्र ठाण्यात उभारून त्याची व्याप्ती वाढवावी * ठाण्यात मराठा हॉस्टेल व मराठा भवन व्हायला हवे * सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नेमकी कशामुळे अडली हे स्पष्ट करावे. * मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.