Category: ठाणे

Thane news

ज्येष्ठ साहित्यकार हरिवंशराय बच्चन उत्तर भारतीय भवनासाठी राज्य सरकार कडून ४० कोटींचा निधी-प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये ज्येष्ठ साहित्यकार हरिवंशराय बच्चन उत्तर भारतीय भवन उभारणे हे काम सुरु आहे. शहरातील साहित्यप्रेमी, कला व संस्कृती प्रेमी तसेच हिंदी…

डोंबिवलीजवळ सहा कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त

कल्याण : कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील मानपाडा येथील मौर्या ढाब्याच्या बाजुला तीन जणांकडून व्हेल माशाची उलटी (ओकारी) शुक्रवारी जप्त केली. हे आरोपी पनवेल जवळील रहिवासी…

‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये काल्हेर ग्रामपंचायत प्रथम

अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये ठाणे जिल्हा कोंकण विभागात प्रथम; 4 ग्रामपंचायतींना बक्षिस जाहिर झाला असून ग्रामपंचायत…

शेती उत्पादनवाढीसाठी सिंचन साहित्याचा पुरवठा योजनेकरीता ८० लाखाचा निधी – रामेश्वर पाचे

ठाणे : शेतातील उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत ८० लाख निधी विविध सिंचन साहित्याचा पुरवठा योजनेसाठी उपलब्ध असून शेतकरी बांधवाना या योजनेसाठी अर्ज करावे , असे आवाहन-कृषी विकास…

धनगरांचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास आदिवासींचा विरोध

आज ठाण्यात मोर्चा ठाणे : राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये,…

ठाण्याचे कलावंत दत्तात्रय चिव्हाणे पुरस्काराने सन्मानित

ठाणे : मुंबई येथे नामांकित ओ. एन. सी. जी. कंपनीमध्ये कार्यरत असलेले ठाण्याचे  सुपुत्र  कलावंत दत्तात्रय चिव्हाणे यांना कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात…

डाक विभागाची नाळ सर्वसामान्यांची जोडलीय – न्या. ईश्वर सूर्यवंशी

ठाणे : डाक विभागासोबत सर्वसामान्यांची नाळ जोडली गेली आहे. पोस्टमन सामान्यांना आपल्या जवळचा आणि कुटुंबातील सदस्य वाटतो. याच पद्धतीने विधी सेवा प्राधिकरण सुद्धा सर्वसामान्यांना आपले वाटू लागले आहे. प्राधिकरणाचीही नाळ…

 लाभेश को. ऑप. हौ. सोसायटीच्या १३ वर्षांच्या लढ्याला यश

 इमारतीच्या बेसमेंट मधील दोन्ही बारला ठोकले सील ओसी मिळण्याचा मार्ग सुकर   ठाणे : तब्बल १३ वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश को. ऑप. हौ. सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या दोन बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश को. ऑप. हौ. सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडवून) ऐवजी श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट आणि शितल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत. अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत २०११ पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत, दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीने अनेकदा दोन्ही बार मधील अनधिकृत, वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदला बाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगर पालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सिल करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शुक्रवारी (ता.२७) पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार आणि अनधिकृत, वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीने मोठ्या हिमतीने आणि चिवटपणे ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकाने इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करून त्याची विक्रीदेखील केली होती. इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडावून) ऐवजी शितल बार (चंद्र शितल बार) व श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट (देवी दर्शन बार ॲण्ड रेस्टॉरंट) सुरू करून बारमधून तळमजल्यावर (दुकानाच्या रांगेत ११ नंबर गाळ्यात) जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत.  याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेने दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर प्रभाग समिती (सहायक आयुक्त) जा. क्र.८८५ च्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई केली. बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केल्या गेलेल्या खोट्या आरोपांना व आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरी विरुद्ध कायदेशीर लढा दिला आहे. त्याला आज यश मिळाले आहे, एवढे वर्ष एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती, अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून कोणाच्या आशीर्वादाने चालत होते याचाही पालिका प्रशासनाने शोध घेऊन त्यांच्यावरही एमआरटीपी आणि इतर कलमांतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाश्यांकडून केली जात आहे. दरम्यान इमारतीमधील सोसायटीत चेरमेन, सेक्रेटरी आणि इतर विविध पदांवर काम करणारे दुलाजी लक्ष्मण लाड यांनी पदाचा गैरवापर करत बेसमेंटमध्ये बार सुरू करण्याची नियम बाह्य परवानगी आणि नाहरकत दिली. बारमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल केले. हे सर्व पालिका आणि मंजूर नकाशाच्या विरोधात असल्याने ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी त्यावेळेचे चेअरमन, सेक्रेटरी दुलाजी लाड यांच्यावर मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत, वाढीव आणि वापर बदल काम केल्याचा ठपका ठेवत एमआरटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापि दुलाजी लाड याच्यावर गुन्हा दाखल झाला नसून तो तत्काळ दाखल करावा अशी मागणी सोसायटीकडून केली जात आहे. तर पालिकेने वेळोवेळी केलेल्या अनधिकृत आणि वाढीव बांधकाम, वापर बदल यावर केलेल्या कारवाईमुळे सदर इमारतीला ओसी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून रहिवाशांचा १३ वर्षांचा वनवास संपणार आहे. 0000

पुण्यातील शाळा क्षेत्रीय स्तरावर जाणार

भारत विकास परिषदेच्या प्रांतीय समुहगान स्पर्धा संपन्न पुणे : भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय समुहगान स्पर्धेत पुण्यातील एसपीएम इंग्रजी माध्यम शाळेने पहिला क्रमांक पटकावला असून या शाळेचा विजयी संघ आता भारत विकास परिषदेतर्फे होणाऱ्या समुहगान स्पर्धेत पुढच्या क्षेत्रीय फेरीसाठी बडोद्याला जाईल. स्पर्धेचे उद्घाटन करताना विख्यात उद्योजक उमेश राठी म्हणाले की समूहगान घेण्याचा उद्देष हा विद्यार्थ्यांयंमध्ये संघ भावना (टीम स्पिरिट) निर्माण करणे हा असून संस्कारक्षम वयात देशभक्ती रुजवणे हाही एक हेतू यातून साध्य होत असल्याने या स्पर्धेचे महत्व निराळेच आहे. प्रमुख पाहुणे दत्ताजी चितळे या वेळी म्हणाले की या स्पर्धांचा इतिहास हा लक्षणीय असून पुण्यातून निवडून गेलेले संघ क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरही चमकल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन्ही पाहुण्यांनी सर्व संघांना भरूपर शुभेच्छा दिल्या. भारत विकास परिषद दरवर्षी संस्कृत व हिंदी भाषेतील देशभक्तीपर समुहगीत गायनाच्या स्पर्धा भरवते. विविध शाखांतर्फे राज्याच्या सर्व भागात होणाऱ्या स्पर्धांच्या पहिल्या फेरीत विजयी झालेले संघ प्रांतीय स्तरावरील स्पर्धेत दाखल झाले होते. एकूण बारा संघांनी यात सहभाग नोंदवला होता. कर्वे शिक्षण संस्थेच्या सभागृहात या पश्चिम महाराष्ट्र प्रांतस्तरीय स्पर्धा पार पडल्या. भारत विकास परिषदेच्या कोथरूड शाखेने स्पर्धेचे यजमानपद सांभाळले. या स्पर्धेत नासिक येथील विस्डम हाय इंटरनॅशनल शाळेने दुसरा तर पुणे येथील भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद संपर्क, सहयोग, सेवा, संस्कार आणि समर्पण या पंचसूत्री वर काम करते. यात संस्कार या सुत्रला अनुसरून शाळांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात प्रामुख्याने राष्ट्रभक्ती पर सामुहगान, भारत को जानो (प्रश्नमंजुषा) आणि गुरू वंदन छात्र अभिनंदन असे कार्यक्रम घेतले जातात. संगीत क्षेत्रातील जाणकार सुश्री घुगरी, राजे व साठे यांनी परीक्षक म्हणून कम केले. सुश्री मंजुषा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री शाम उकिडवे यांनी आभारप्रदर्शन केले. 0000

 यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठींबा काढला

 मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज ठाणे: ‘धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही’, असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या  यशवंत सेनेचे…