Category: ठाणे

Thane news

मित्रांचाही मित्र अजातशत्रू  बाळू कुडाळकर – डॉ साळगावकर

ठाणे : ‘बाळूचे व्यावहारिक नाव संतोष होते याचा आज अनेक मित्रांना शोध लागला. कुडाळकर कुटुंबीय चेंदणी कोळीवाड्याशी एकरूप झाले. क्रिकेटआणि समाजसेवा म्हणजे बाळूच्या जिवनाची दोन अविभाज्य अंगे होती.मित्रासाठी तन, मन…

स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : नरेश म्हस्के

ठाणे :   प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा  गुण  अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिका…

घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा   ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसापूर्वी पार पडली होती, या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट,  तिरुपती काकडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदररोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका व इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे व ही यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेची काम करेल, या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे. तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करुन त्या तातडीने सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे, यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने संबंधित प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केले. घोडबंदर रोड अस्त‍ित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून लाईटस् बसविण्यात यावेत,  तसेच रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत असलेली चेंबर्सची दुरूस्ती करणे, खड्डे तातडीने बुजविणे आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या. याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. 00000

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी…

बदलापूरच्या शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. या झटापटीत जे दोन पोलीस जखमी झाले त्यांची राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्या…

पावसामुळे मोदींचा पुणे दौर रद्द

पुणे :  पुण्यातील मुसळधार पावासमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.  मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही…

घराच्या छतावर वीज निर्मिती करून ६०० ग्राहक झाले स्वावलंबी

 पीएम सूर्यघर योजनेचा लाभ; ३४०० अर्जांवर प्रक्रिया सुरू ठाणे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत ३ हजार ४०० जणांनी अर्ज केले आहेत. यातील ६०० ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येत आहेत. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.

आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकारी संघटना करणार कामबंद आंदोलन

ठाणे : आदिवासी विकास विभागातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिला आहे. आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षापासून…

विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली’ सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे – क्रेडाई एमसीएचआय, आशर, रास रंग, ब्युटी ऑन बाईक, अर्चना मनेरा फाउंडेशन, आणि टॅग(मिस/मिसेस ठाणे) या संस्थांच्या विद्यमाने विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. `नारी तू नारायणी,…

 शिवसेना महाविजय संवाद महाराष्ट्र दौऱ्या’ला आजपासून प्रारंभ

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारने केलेली विकास कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना राज्यातील खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना महाविजय संवाद दौऱ्या’चे आयोजन २८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. याबाबतची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी  दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सोशल मीडिया राज्यप्रमपुख राहुल कनाल, महिला आघाडी संघटना अध्यक्षा मीना कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून सुरुवात होत आहे. दररोज सहा विधानसभांला भेट देणार आहोत. पहिला टप्पात मुंबईतील विधानसभांना भेट देणार आहोत.  यामध्ये बैठका,मेळावे आणि शाखाभेट आदींचा समावेश असणार आहे, सदर दौरा तीन टप्प्यात होणार आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान मुंबई, मुंबई उपनगरमधील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात येणार आहे तर १३ ऑक्टोबर ते  १६ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात हा दौरा होणार आहे. या दौऱ्यांतर्गंत युवकांशी संवाद साधून युवा संघटन मजबूत करून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत ती सर्व कामे लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. संघटनात्मक ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या वतीने मीना कांबळी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दौरे करण्यात येतील. लाडकी बहीण संपर्क अभियान दरम्यान गाठीभेटी, मेळावे, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना,अन्नपूर्णा योजना याचा आढावा घेण्यात येईल. सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया, वॉररुम आदींचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली. ०००००