Category: ठाणे

Thane news

 हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन

 मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक अनिल ठाणेकर   ठाणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या प्रतिनिधींनी मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनच्या मागील संपात मान्य केलेल्या मागण्यांबाबतचे जीआर ताबडतोब काढवेत, या मागणीला घेऊन बेमुदत उपोषण व हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन करण्यात आल्याची माहिती एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे. कृती समितीचे ज्येष्ठ नेते कॉ. अतुल दिघे यांनी उपोषणकर्त्यांना प्रेरणा देणारे भाषण करून कार्यक्रमाची सुरवात केली. कृती समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृती समितीच्या शिष्ठमंडळांना मंत्रालयात बोलावून त्यांचे निवेदन स्विकारले. परंतु ही भेट उभ्या उभ्या झाल्यामुळे कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रात्री प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण आझाद मैदान जलमय झाले होते. मंडपात व स्टेजवर देखील प्रचंड ओल होती. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी खुर्च्यांवर बसून पूर्ण रात्र काढली. तरीही त्यांचे मनोबल तुटले नाही. पोलिसांनी त्यांच्या नियमाप्रमाणे संध्याकाळी सर्वांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वांनी तिथेच थांबण्याची ठाम भूमिका घेतली. कृती समितीचे नेते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले व शेवटी ही कारवाई थांबवण्यात आली. या शिष्ठमंडळात शुभा शमीम, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, नितीन पवार, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांचा समावेश होता. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे व अन्य अनेक अधिकारी उपस्थित होते. आझाद मैदानाच्या स्टेजच्या मागच्या गेटजवळील रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या आणण्यात आल्या व घोषणांच्या गजरात जेल भरो आंदोलनाला सुरवात झाली. कृती समितीचे प्रमुख नेते शुभा शमीम, भगवानराव देशमुख, सुर्यमणी गायकवाड, राजेश सिंग, नितीन पवार, माधुरी क्षिरसागर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. चार गाड्या भरून सत्याग्रहींना यलो गेट पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस यंत्रणा हजारो अंगणवाडी कर्मचारी महिलांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी अक्षम ठरल्यामुळे त्यांनी आझाद मैदानातच सर्वांना स्थानबद्ध करत असल्याची घोषणा केली व सुमारे दहा हजार महिलांच्या नावांची यादी करून त्यांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही ज्यांची नावे यादीत येऊ शकली नाहीत अशा सुमारे सहा हजार महिलांनी मैदानावर व मैदानाच्या बाहेर घोषणा दिल्या. परंतु पोलिसांची महिलांना अटक करण्याची क्षमता संपल्यामुळे त्यांनी याद्या करण्याचे काम बंद केले. सायंकाळी अटक करून नेलेल्या नेत्यांना सोडेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी पावसाची पर्वा न करता मैदानावर ठाण मांडून बसल्या. हे सर्व नेते परत आल्यानंतर सभा घेऊन सर्व सत्याग्रहींचे अभिनंदन करण्यात आले व लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला.पाऊस व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आंदोलनकर्त्या महिलांचा परतीचा प्रवास लक्षात घेता बेमुदत साखळी धरण्यामध्ये २६ व २७ या दोन दिवसांसाठी मुंबई व ठाणे येथील नागरी प्रकल्पातील कर्मचारी व ज्यांचा परतीच्या प्रवासाचे नियोजन उशीराचे आहे अशा बाहेरगावच्या कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसतील. ३० सप्टेंबरपासून मंत्रीमंडळाच्या बैठकीत मानधनवाढ, मासिक पेन्शन व ग्रॅट्युईटीचा निर्णय होईपर्यंत रोज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून लोक २५० ते ३००च्या संख्येने रोज उपस्थित राहतील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे, असे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी सांगितले. ०००००

कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे

कल्याण : कल्याणमधील शंकरराव चौक, दुधनाका-पारनाका ते टिळक चौक या यु आकाराच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेकडून २४ वर्षापूर्वी करण्यात आले. या रस्ते रुंदीकरणातील बाधितांना पालिकेने कारवाईपूर्वी कोणतीही सूचना…

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद

 शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने   ठाणे : संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश द्या यासह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी बुधवारी सामूहिक किरकोळ रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. आंदोलनादरम्यान, ठाणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्य शासनाची प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील धोरणे चुकीची असल्याचा आरोप करत राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात असहकाराची हाक दिली होती. यानुसार ठाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांनी सामुहिक रजा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शिक्षकांच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. आधारवर आधारित संच मान्यता, वीस पटाला एक कायम आणि एक कंत्राटी शिक्षक हे शासनाचे धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप करत त्यास शिक्षक संघटनांसह पालकांनी विरोध केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या निर्णयामध्ये अंशतः बदल करून वीस ऐवजी दहा पटाला एक कंत्राटी शिक्षक, प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थी संख्येवर शिक्षक निश्चिती यासारखे शासन निर्णय निर्गमित केले होते. परंतु शिक्षकांनी आंदोलनावर ठाम राहत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मोफत गणवेश योजना चुकीचे पद्धतीने राबविल्याने गणवेश उशिरा प्राप्त होत आहेत. गणवेश योजना जुन्याच पद्धतीने राबवावी. पाठ्यपुस्तकात कोरी पाने देण्याऐवजी स्वतंत्र वही द्यावी, पोषण आहार योजना स्वतंत्र्य योजनेकडे सोपवावी, याबाबत प्रामुख्याने घोषणाबाजी होत होती. १५ मार्चचा संच मान्यता निर्णय रद्द करा, कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटीत शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करा, शैक्षणिक आणि शैक्षणिक कामाचा शासन निर्णय शिक्षक संघटनांबरोबर चर्चा करून दुरुस्त करा, अशी मागणी ठाणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आली. 00000

ग्रामस्थाच्या सहभागाने ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘एक झाड…

 मीरा भाईंदरमध्ये ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’चे काम सुरु होणार -प्रताप सरनाईक

१५० कोटींची मंजुरी अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वर्सोवा ब्रिज ते घोडबंदर गावाशेजारी घोडबंदर किल्ल्यापर्यंत खाडी किनारा विकसित करण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या पहिल्या टप्प्यात जवळपास २ किलोमीटर इतकी लांब ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली होती. हे काम सुरु करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची , सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मीरा भाईंदर शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा , ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामाचे डिजाईन , संकल्प चित्र तयार करण्यात आले. वरसावे ब्रिज ते घोडबंदर गावा पर्यंत खाडी किनारा साधारण १.८ किलोमीटर इतका विकसित केला जाणार आहे. परदेशात जसे ‘वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंट’ करून परिसर सुशोभित केला जातो , त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात त्याचपद्धतीने मीरा भाईंदरचा हा खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकास करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचे पहिल्या टप्प्याचा खर्च १५० कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यातील १२१ कोटींचे टेंडर प्रक्रिया मीरा भाईंदर महापालिकेने पूर्ण केली आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. खाडी किनारा असल्याने त्याठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीआरझेडची परवानगी २३ सप्टेंबर रोजी मिळाली आहे.  ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ कडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यावर पुढील २ वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. वर्सोवा-घोडबंदर खाडी किनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा आराखडा तयार आहे. खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या-फिरण्यासाठी मोठा ‘पाथ वे’ , विविध प्रकारचे आकर्षक गार्डन , विसर्जन घाट , लहान मुलांना खेळण्यासाठी जागा , बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन , पार्किंगची सुविधा , वॉक वे , खेळण्यासाठी मोकळी जागा , ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा , लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल –  फुटबॉल खेळता येईल अशी जागा , आकर्षक लायटिंग ,सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. खाडी किनारा विकास करत असताना येथे ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरु करण्याचाही विचार आहे. खाडी किनारा विकास म्हणजेच हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ आहे. या खाडी किनाऱ्यावर जिथे मँग्रोज आहेत तिथे ‘लाकडाचे’ म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य हा प्रकल्प राबविताना या  कामात वापरण्याचे प्रस्तावित केले आहे. या किनाऱ्यावर जे घाट बनवले जातील ते घाट सोडले तर नागरिकांचा पाण्याशी संपर्क येणार नाही. हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ खाडी किनारा विकास पूर्ण झाल्यावर फक्त मीरा भाईंदर मधील नाही तर संपूर्ण मुंबई महानगरातील हे पर्यटन केंद्र बनेल , असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशापद्धतीने येथे खाडी किनारा विकास केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हे खाडी किनारा सुशोभीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात १५० कोटींचा निधी दिल्याने हे काम सुरु होत आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातच न्हवे तर संपूर्ण राज्यात हा खाडी किनारा विकास प्रकल्प सर्वाना प्रेरणादायी ठरेल , असे आमदार सरनाईक म्हणाले. 0000

Photo-2 स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे साहेब  यांच्या माध्यमातून आनंद नगर शिर्डी नगर महिलांचे सभासद नोंदणी फॉम भरण्यात आले. स्वराज अभियान संघटनेशी जोडण्यात आले. स्वराज अभियान ही एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे, ज्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे आहे. स्वराज अभियानाचे सक्रिय सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले. हे शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी स्वराज अभियानाच्या महिला सदस्य संजना खोत, सुषमा ब्रीद, मृणाल सूवरे, प्रिया सोडगे, अंकिता शिर्के यांचा सहभाग आहे.

ठाणे स्थानक परिसर मोकळा

ठाणे : काही महिन्यांपासून थंड पडलेल्या फेरीवाला विरोधातील कारवाईचे हत्यार ठाणे पालिकेने पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. त्याअंतर्गत ठाणे स्थानकात कारवाई करून पालिकेने परिसर फेरीवालामुक्त केला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या…

ठाणे  महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती’ ‘अंत्योदय दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी…

पनवेलच्या ऋषिकेश पेणकर यांनी सुवर्ण पदकासह पटकाविला मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब

पनवेल : द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्ण पदकासह आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे…

‘उत्सव स्वच्छतेचा’ या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: आयुक्त सौरभ राव

ठाणे :  प्रतिवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ सर्वत्र साजरा केला जातो. या पंधरवड्यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा 2024’ ही देशपातळीवरील महापालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…