Category: ठाणे

Thane news

 s21 ऑक्टोबरला परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

7 ऑक्टोबरपूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन ठाणे (23) – नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिस-या सोमवारी 21 ऑक्टोंबर परिमंडळ स्तरावरही लोकशाही…

पत्रकार राजेश शेटकर यांनी वाचवले 3 वर्षाच्या मुलाचे प्राण

ठाणे : हिरानंदानी इस्टेट क्लब हाऊस मध्ये रविवार 22 सप्टेंबर रोजी रात्रौ 8 च्या सुमारास एक घटना घडली. संध्याकाळी आठच्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका तीन वर्षीय लहान मुलाचे…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

विठ्ठल घाडगे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांची45 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ठाणे  : ठाणे शहरातील सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी झटणारी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण…

 डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा

 बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा-  श्रीकांत शिंदे   कल्याण : ‘आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे महायुतीला धक्का लागणार नाही, अशी कोणतीही कृती कोणत्याही शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्याने करायची नाही. शिवसेनेच्या डोंबिवली विभागातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी महायुतीकडून जो उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिला जाईल, त्याच्यासाठीच जोमाने काम करायचे आहे,’ असा सल्ला कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी, नेत्यांना दिला. डोंबिवलीत शिंदे गटातून बंडखोरी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून किंवा अपक्ष म्हणून भाजप उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या एका युवा नेत्याला आम्ही तुमच्या पाठीशी नाहीत, असा इशारा यानिमित्ताने खासदारांनी दिला. गेल्या महिन्यापासून डोंबिवलीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा खास समर्थक म्हणून ओळखला जाणारा एक युवा नेता विविध पक्षातील आपल्या ज्ञातीमधील १२ हून अधिक नगरसेवक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. तसे वातावरण या युवा नेत्याने तयार करण्यास सुरुवात केली होती. गणेशोत्सव काळात या युवा नेत्याने आगरी समाजासह डोंबिवलीतील विविध ज्ञातीमधील ज्येष्ठांच्या भेटी घेऊन आपण आगामी विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत देण्यास सुरूवात केली होती. वर्षानुवर्षाचा वैरभाव विसरून या युवा नेत्याने गणेशोत्सवाचे निमित्त करून शत्रूंच्या घरात प्रवेश केला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आपण हे सगळे खासदार डॉ.शिंदे यांच्या आशीर्वादाने करत असल्याची मल्लीनाथी हा युवा नेता करत होता. स्थानिक शिवसैनिक चक्रावून गेले होते. या युवा नेत्याच्या या हालचालींची ज्येष्ठ शिवसैनिक बालीशपणा, पोरखेळ अशी संभवना करत होते. डोंबिवलीतील हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांना माहीत नव्हता. खड्डे फलक भोवले गेल्या महिन्यात गोकुळ अष्टमीनिमित्त आपण शहरात फलक लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना डिवचण्यासाठी या हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शुक्रवारी वाढदिवस असताना त्याच्या आदल्या मध्यरात्री त्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक डोंबिवलीत लावण्यात आले. फलक छपाईदाराने युवा नेत्याच्या इशाऱ्यावरून आपण हे केल्याचे पोलिसांना सांगितले. या विषयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाखडी झाली. युवा नेता बाहेर डोंबिवली परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खा. डॉ.शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी दोन दिवस बैठका घेतल्या. त्या युवा नेत्याने बंडखोरी केली तर त्याच्या सोबत कोण जाईल, अशी चाचपणी केली. त्यांच्या बंडखोरीचा विचार न करता शिवसैनिकांनी महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, असे स्पष्ट केले. शिवसेना पदाधिकारी बैठकीत असताना युवा नेता स्वत:हून वर्षा निवासस्थानाबाहेर त्याच्या वाहनात बराच उशीर डॉ.शिंदे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. कोट डोंबिवलीतून शिवसेनेतून काही जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अशा कोणत्याही प्रवृत्तीला थारा न देता शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवाराचे जोमाने काम करायचे आहे. कोणत्याही ऐकीव, दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याच्या खासदार डॉ.शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसैनिकांना सूचना केल्या आहेत. – राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, डोंबिवली. ०००००

अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक !

प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या ठाणे : कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथील एका अंध दाम्पत्याची फसवणूक करून त्यांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न देता त्यांचे नवजात बाळ छत्तीसगड राज्यातील एका जोडप्याला परस्पर दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंध दाम्पत्याने तक्रार केल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने हस्तक्षेप केल्यानंतर मोहने येथे गणपती नर्सिंग होम नावे दवाखाना चालवणाऱ्या अनुराग धोनी या डॉक्टरविरुद्ध बेकायदेशीररित्या बाळ दत्तक प्रक्रिया राबविल्याबद्दल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथे एक अंध दाम्पत्य राहते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले आहेत. यातील अंध महिला पुन्हा तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने ते गावातील गणपती नर्सिंग होम येथे डॉक्टर अनुराग धोनी यांच्याकडे तपासणीसाठी गेले. यावेळी त्यांना हे बाळ नको असल्याचे त्यांनी डॉक्टर धोनीला सांगितले. मात्र आता तुम्ही तीन महिन्यांच्या गरोदर असून गर्भपात करता येणार नसल्याचे डॉक्टर धोनीने त्या अंध दाम्पत्याला सांगितले. मात्र तुम्ही या बाळाला जन्म दिल्यानंतर माझ्या परिचयातील इच्छुक पालकांना दत्तक देऊ शकतात. त्या मोबदल्यात ते पालक तुमचा सर्व रुग्णालयाचा खर्च आणि तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अर्थ साहाय्य करतील असे सांगितले. कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्याने अंध दाम्पत्याने त्यास संमती दिली. मात्र मागील महिन्यात प्रसुती झाल्यानंतर अंध दाम्पत्याशी संवाद न साधता ते बाळ डॉक्टर धोनीने छत्तीसगड येथील कौर नामक दाम्पत्याला थेट देऊन टाकले. यानंतर संबंधित अंध दाम्पत्याने अर्थ साहाय्य आणि रुग्णालयाच्या खर्चाविषयी विचारणा केली असता डॉक्टरने ते देण्यास साफ नकार दिला. यामुळे आमचे बाळ आम्हाला परत द्या, आम्ही त्याचा सांभाळ करू असे सांगितले. मात्र डॉक्टरने बाळ देण्यासह नकार दिला. हा संपूर्ण प्रकार अंध दाम्पत्याच्या शेजारील कुटुंबाला कळला असता त्यांच्या मदतीने एक ते दोन आठ्वड्यांनी बाळ पुन्हा अंध आई वडिलांच्या ताब्यात घेण्यात आले. यानंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाला हा प्रकार कळताच त्यांनी हस्तक्षेप करून डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर अनुराग धोनी विरुद्ध बेकायदेशीररित्या बाळ दत्तक प्रक्रिया राबविल्याबद्दल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तर त्याने याआधीही अशाच पद्धतीने काही जणांची फसवणूक केल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अंध दाम्पत्याची फसवणूक केल्यानंतर डॉक्टर अनुराग धोनी याने प्रसूतीनंतर संबंधित अंध महिलेला स्तनपान बंद होण्याच्या अर्थातच दूध बंद होण्याच्या गोळ्या दिल्या असल्याचाही धक्कादायक प्रकार तपासादरम्यान समोर आला आहे. यामुळे अशा पद्धतीचे अतिशय धक्कादायक आणि निंदनीय कृत्य करणाऱ्या डॉक्टर विरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जात असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. 00000

भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन

 प्रताप सरनाईक यांच्याकडून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांनी २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग ‘सनातन राष्ट्रसंमेलना’चे आयोजन केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, भाईंदर येथे दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत हा सत्संग संपन्न होईल. मिरा-भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संगात, शंकराचार्य , साधू महंत सनातन संमेलनात सहभागी होणार आहेत.भाविकांना श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज यांच्या प्रवचनाची पर्वणी लाभणार आहे.सनातन राष्ट्रसंमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदर मध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री  श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज उपस्थित राहणार आहेत. तीनही दिवस त्यांचे प्रवचन होईल. तर तिसऱ्या दिवशी प. पू. बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य ‘विद्याभास्कर’ जी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमाम्नाय द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज कोषाध्यक्ष – राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास (अयोध्या), गजानन ज्योतकर गुरूजी अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचेही या संमलेनात प्रवचन होणार आहे. मिरा-भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.३० सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.२८ सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच ३० सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल. या यात्रेत ५१०० महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल. या भागवत सत्संगासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात ४० ते ५० हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १०० महिला व १०० पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. पहिल्यांदाचो होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक व टीम करीत आहे. ०००००

ठाण्यातील केबीपी महाविद्यालयात कौशल्य विकासाचे धडे!

आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे : गरजू विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी महत्वाचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयातही सुरू झाले आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये `आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले. या महाविद्यालयांमध्ये ठाण्यातील वागळे इस्टेटमधील केबीपी महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. या केंद्रांमधून कौशल्य विकास कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आमदार निरंजन डावखरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, भविष्यातील प्रगतीसाठी कौशल्य विकासाचे धडे घेण्याचे आवाहन केले. आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे व प्राचार्य संतोष गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केबीपी महाविद्यालयातील केंद्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी, अकाऊंट असिस्टंट, डिजिटल मिडिया मॅनेजमेन्ट, वेब डेव्हलपमेंट आणि इतर अनेक कोर्सेस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या वेळी महाविद्यालयातील शिक्षक व २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

माझी वसुंधरा जिल्हास्तरीय स्पर्धेत बांदोडकर कॉलेजला प्रथम क्रमांक

ठाणे महानरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व   *माझी वसुंधरा स्पर्धा’ राबविण्यात आली होती या स्पर्धेत विद्या प्रसारक मंडळाच्या बा.ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महावद्यालयाला प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला आहे, ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका (TMC)* द्वारे आयोजित करण्यात आली होती. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाविद्यालये, उद्योग आणि एनजीओकडून पर्यावरणीय शाश्वत प्रयत्ना साठी केलेल्या अपवादात्मक योगदानाची दखल घेतली जाते. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला या उल्लेखनीय कामगिरीसाठी *₹१,०२,००० चे रोख बक्षीस देण्यात आले आहे. ‘माझी वसुंधरा स्पर्धा’ ही संस्थांना पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास,आणि हवामान बदलाच्या उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केली जाते. या पुरस्कारामुळे विविध *पर्यावरणपूरक उपक्रम,विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि आमच्या प्रयत्नांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे महाविद्यालयाच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन होते हे यश गाठण्यासाठी *विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, समिती समन्वयकांचे आणि कार्यालयीन व प्रयोगशाळेतील सहायक कर्मचारी वर्गाचे एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाले आहे. क्रियाकलापांचे अहवाल, उपस्थिती, अभिप्राय आणि भू-संकेतित छायाचित्रांचे दस्तऐवजीकरण यामुळे हा सन्मान मिळवणे शक्य झाले*असे मत यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर यांनी व्यक्त केले. तसेच पर्यावरणशास्त्र विभाग (EVS), BWCM, NSS, NCC आणि ग्रीन क्लब* यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे त्यांनी कौतुक केले . पर्यावरण प्रकल्पांच्या दिशेने त्यांचे अविरत प्रयत्न आणि समर्पण या यशात मोलाचे ठरले आहे असेही त्या म्हणाल्या. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर यांचे व  संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ अधिकारी सन्माननीय डॉ.विजय बेडेकर, डॉ.महेश बेडेकर, श्री.अभय मराठे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शाश्वत भविष्यासाठी या प्रयत्नांना सतत पुढे नेण्याच्या महत्त्वावर भर दिला. जिल्हा स्तरीय स्पर्धेत व काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .