Category: ठाणे

Thane news

महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचा

आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या कोकण विभाग कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार व संघटनेचे सल्लागार निरंजन डावखरे यांना पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव यांनी दिली. शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस, कोषाध्यक्ष देविदास नरवाडे, विभाग सचिव ज्ञानेश्वर गोसावी, राज्य कार्यकारिणी सदस्य एस. जी पाटील, विभागाचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष आणि सचिव सभेवेळी उपस्थित होते. गेल्या १२ वर्षांपासून आमदार निरंजन डावखरे हे १२ वर्षांपासून पदवीधर आमदार असून शिक्षण क्रांती संघटनेचे सल्लागार आहेत. संघटनेच्या शासकीय दप्तरी कामांकरिता त्यांचे सातत्याने सहकार्य लाभत असून, त्यांना विभागातील समस्यांची संपूर्णपणे जाण आहे, असे नमूद करीत शिक्षण क्रांती संघटना पूर्ण ताकदीनिशी डावखरेंसोबत राहणार असल्याचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवणे. तसेच सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महालढा उभारणे आदींकडे संघटना अधिक लक्ष देणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले, असे श्री. घागस यांनी सांगितले. या वेळी उत्तम कांबळे, महेंद्र जाधव, डॉ. शहाजहान मौलना, राजेंद्र गवळी, सुरेश साळवे, संदेश पाटील, योगेश वल्लाळ, थॉमस शिनगारे, प्रशांत घागस, किशोर राठोड, अनिल मुरादे, प्रा. रमेश बुटेरे, सुरेंद्रनाथ दुसाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे व्यवस्थापनावर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याविरोधात ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याना न्याय द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे. शालेय नवीन वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारखर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. निराश पालकांनी याबाबत संपर्क करुन माहिती दिली असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटले  ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख १२ जून आहे तरी ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनाने, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतील प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजल्या पासून शाळेबाहेर उभे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल ह्याचा जरा देखील विचार शाळा व्यवस्थापनाने केला नाही. यावेळी पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देखील भेटलो. याप्रकरणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासंबंधी ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करत राहणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा आनंदात शाळेत जाताना पाहण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कारवाईची व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले आहे. यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितिन लांडगे, ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, युवासेना ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजूडे, नितेश पाटोळे, युवासेना विधानसभा उपाध्यक्ष निखिल वाडेकर, सुशांत मयेकर,अशफाक शेख, ओम पवार, अखिल माळवी, साई ढवळे, अमित यादव, विराज कोकाटे, प्रसाद वाघ, संदीप तिवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

येऊरचा सायकल राजा ठरला शिवम तर सायकल राणी ठरली निकीता

ज्येष्ठ नागरिक गटातून ॲड. मोहन निंबाळकर प्रथम ठाणे : कोण होणार येऊरचा सायकल राजा आणि राणी या स्पर्धेबद्दल सायकलप्रेमींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लूप अशी स्पर्धेची संकल्पना होती. अखेर रविवारी भर पावसात ही स्पर्धा संपन्न झाली. येऊरचा सायकल राजा (खुला गट) शिवम खरात, ज्येष्ठ नागरिक गटातून ६३ वर्षीय ॲड. मोहन निंबाळकर तर येऊरची सायकल क्वीन ठरली निकिता मधार. तसेच, खुल्या गटातून हवाई दलातील रजत मैन यांना रौप्य पदक तर नौदल सेवेतील रिंकू सिंग यांना कांस्य पदक तसेच, महिला गटातून ममता परदेशी यांना रौप्य तर कॅन्सरवर मात केलेल्या नेहा राजुरीकर यांना कांस्य पदकांनी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सायकलपटू प्रा. नारायण बारसे, प्रा. सुनील भुसारा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकलप्रेमींना मार्गदर्शन करताना प्रा. बारसे म्हणाले की, सायकलिंग येऊरला नियमीत केली तर फुप्फुसाची क्षमता खूप वाढते. मी मागच्या नोव्हेंबर महिन्यात ३०० लूप्स येऊरला केले होते. त्यामुळे मला येऊरचा फायदा माहित आहे. येऊरला साधारणपणे फारसे सायकलप्रेमी येत नाही. येऊरला सायकलिंग केले तर स्नायू बळकट होतात. या स्पर्धेमुळे नवीन सायकलप्रेमींनी येऊरला आले. सायकल सर्वांनी नियमीतपणे चालवायला हवी, फिट राहायला हवे.. सायकल ही नेहमी आपल्याला ऊर्जा देते. अशा भावना प्रा. बारसे यांनी व्यक्त केल्या. सुरूवातीला प्रास्ताविकात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले की खरं तर येऊरसारख्या चढ उतार अशा शार्प वळणावर भर पावसात ही स्पर्धा आयोजित करुन ती यशस्वी करणे हे खूप मोठे आव्हान आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनसमोर होते. ते पेलण्यात संस्था यशस्वी ठरली हे विशेष. या स्पर्धेसाठी दिवसरात्र मेहनत करणारी माझी कोअर टीम चंद्रशेखर जगताप सर, अजय भोसले, भुसारा सर, निखील गावडे, पंकज रिझवानी, गुरूप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, विनोद फर्डे, गजानन दांगट यांनी विशेष मेहनत घेतली.

ठाण्यात सामाजिक कार्याचा आदर्श तारामाऊली सेवा संस्थेकडून प्रस्थापित

भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे प्रतिपादन, ओमकार चव्हाण यांचाही वाढदिवसही साजरा ठाणे : ठाणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा आदर्श तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून प्रस्थापित करण्यात आला आहे, असे…

अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाचे १५ जूनला प्रकाशन व चर्चा

‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अनिल ठाणेकर ठाणे : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे शनिवारी १५ जून रोजी प्रकाशन व चर्चा विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.याप्रसंगी प्रमुख वक्ते सुभाष देसाई, दिनकर गांगल, डॉ. मनोहर जाधव व डॉ. प्रज्ञा दया पवार हे उपस्थित राहणार आहेत ‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा हा कार्यक्रम शनिवारी, १५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ .३० (साडेपाच वाजता) सम्राट अशोका हॉल, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, चार बंगला, लोखंडवाला रोड, अंधेरी – पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, किशोर मेढे (संपादक) व नितीन कोतापल्ले (सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड) हे उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमास जनतेने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विलेपार्ले शाखेच्या वतीने आय़ोजित करण्यात आलेल्या चांद्रयान पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुरेंद्र पोतदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

येत्या गुरुवारी वंचितांच्या रंगमंचावर रंगणार युवा नाट्यजल्लोष

ठाणे : आर्थिक दृष्ट्या वंचित पण कलागुणांनी समृद्ध अशा युवांचा कलाविष्कार अर्थात युवा नाट्यजल्लोष या वर्षी येत्या गुरुवारी १३ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर मधे संध्याकाळी ४ वाजता रंगणार आहे. ११ जून या साने गुरुजींच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने साने गुरुजी १२५ या अभियानांतर्गत हा कार्यक्रम सादर होत आहे. समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या या उपक्रमात या वर्षी नाटकांची थीम असणार आहे ‘दीवार’ म्हणजेच ‘भिंत’! ठाणे परिसरातील खारटन रोड, अंबिका नगर, मानपाडा, किसन नगर आणि घणसोली अशा विभागातून युवा आपले विचार नाटकातून सादर करणार आहेत. श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचाचे हे दहावे वर्ष आहे, असे संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले. प्रतिभाताई मतकरी, प्रतिभा मतकरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी भाषा दूत, चिन्मयी सुमित, सिने दिग्दर्शक व टॅग सदस्य विजू माने, अभिनेता व टॅग सदस्य, उदय सबनीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, गणेश मतकरी, संपादक, दै. ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ, लघु चित्रपटकार, आंतरराष्ट्रीय किर्तीचे फिल्म ज्युरी, डॉ. संतोष पाठारे, थिएटर कोलाजची संचालिका, अभिनेत्री, निवेदिका, पल्लवी वाघ – केळकर,टॅग अध्यक्ष, महेश शानबाग, श्रीरंग खटावकर, पत्रकार आणि यू ट्यूबर रविंद्र पोखरकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. ठाण्यातील संवेदनशील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हा युवांचा कलाविष्कार बघण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले (81089 49102) यांच्याशी संपर्क करावा.

‘ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊ नका’

माध्यमिक शिक्षणाधिकारी ललीता दहितुले यांचे आव्हान ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत ०१ अनधिकृत शाळा सुरू आहे. या ०१ अनधिकृत शाळेवर एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे. जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या माध्यमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या शाळाची यादी स्टारइंग्लिश हायस्कुल, दिवा, ठाणे मनपा क्षेत्र, डिवाईनग्रेस हायस्कुल, वज्रेश्वरी ता. भिवंडी  जि. ठाणे, आरएन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे, फरानइंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे, आरंभइंग्लिश स्कुल श्री, गणेश नगर चौळ गणेश मंदिराचे मागे दिवा आगासन रोड दिवापुर्व, न्युगुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली रोड दिवा पुर्व 400602, ग्रीनव्व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल,शिवसर्थ अपार्ट सदगुर नगर, दिवा आगासन दिवा जि.ठाणे, एस. एस. इंग्लिशस्कुल बाबुराव रेसिडेंन्सी हनुमान मंदिर निअर दिवा, आरएल पी हायस्कुल शिवम अपार्ट मुंब्रादेवी कॉलनी दिवा, आदर्शगुरुकुल स्कुल निअर जिव्हाळा हॉल दिवा इंग्रजी, आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व  माध्यम मराठी, आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम इंग्रजी, एसआर पी इंग्लिश स्कुल वक्रतुंडनगर दिवा, ओमसाईइंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे, श्री. विद्याज्योतीइंग्लिश स्कुल,नारायण कॉम्पलेस्क मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, सिम्बॉयसिसस्कूल, सुंदरबन नगर, दातिवली रोड दिवा, केम्ब्रीजइंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, पब्लीकइंग्लिश स्कुल, गणेशपाडा दातिवली दिवा, आर्यगुरुकुल इंग्लिश स्कुल दातिवली रोड दिवा, श्रीरामकृष्णा इंग्लिाश स्कुल, दिवा दातिवली रोड दिवा, स्मार्टएज्युकेशन इंग्लिश स्कु मुंब्रा, जेडी इंग्लिश स्कुल फेस 2 श्लोक नगर मुंब्रा जि.ठाणे,…

लोकलमधून लंपास झालेले दागिने पुन्हा मिळाले

कल्याण: माटुंगा ते कसारापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलेच्या बटव्यातील मोबाईल, सोनसाखळी असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज गुरूवारी चोरीला गेला. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी चोराला पकडून महिलेचा चोरीला गेलेला ऐवज परत केला. ठाण्यात संभाजीनगर भागात राहणाऱ्या श्वेता हेमंत शिंदे (२३) या नोकरदार आहेत. त्या माटुंगा भागात नोकरीला जातात. गुरूवारी कामावरून सुटल्यावर त्या माटुंगा रेल्वे स्थानकात कसाराकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसल्या. त्यांना ठाणे येथे उतरायचे होते. पण बाहेर उन्हाची काहिलीने त्या हैराण होत्या. लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्यास जागा त्यांना मिळाली. श्वेता यांना गाढ झोप लागली. ठाणे रेल्वे स्थानक येऊन गेले तरी त्यांंना काही कळले नाही. त्या थेट कसारा रेल्वे स्थानकापर्यंत पोहचल्या. तेथून लोकल कसारा यार्डात गेली. तेथे त्यांना जाग आली. त्यावेळी त्या सुरूवातीला घाबरल्या. कसारा येथे पोहचल्याचे लक्षात आल्यावर त्या सावध झाल्या. बटव्यातील मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्वेता यांंनी तातडीने कसारा रेल्वे स्थानकात येऊन तेथून त्या कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन घडल्या चोरी प्रकाराची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकात आशीष जाॅन मकासरे याला अटक केली होती. त्याच्या जवळ एक महागडा मोबाईल, सोनसाखळी होती. हा ऐवज कोठूण आणला आहे याची सविस्तर माहिती आशीष पोलिसांना देत नव्हता. श्वेता लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर असताना रेल्वे पोलीस आशीषला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी आशीष जवळ असलेला ऐवज आपला असल्याचे श्वेताने ओळखले. पोलिसांंनी आशीषवर गुन्हा दाखल करून श्वेता शिंदे यांचा मोबाईल, सोनसाखळी असा दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज परत केला.

फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर!

ठाणे: पहिल्याच दिवशी चालू वर्षातील शाळेतील फी न भरल्यामुळे महागिरी येथील पोलीस शाळेत शिकणाऱ्या शंभर मुलांना त्यांच्या पालकांना कल्पना न देता वर्गाबाहेर काढण्यात आले, अशी शंभर मुले बाहेर काढण्यात आली. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत. शाळेचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर 12 तारखेपर्यंत फी भरू शकता असे नमूद करण्यात आले आहे. परंतु असे नमूद केले असताना देखील आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आजच फी आणायला हवी होती असा धोशा लावणाऱ्या पोलीस शाळा प्रशासनाने शंभर मुलांना वर्गाच्या बाहेर शाळेतील ग्राउंड वर बसवून ठेवले. पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर म्हणाल्या की, “माझ्या मुलाला मी सात वाजता शाळेत पाठवले असते. आठ वाजता समजले की त्याला वर्गाबाहेर बसवून ठेवले. फी आम्ही वेळेतच भरतो. मी आता शाळेमध्ये चेक देखील घेऊन आली आहे परंतु शाळा प्रशासन, तेथील मुख्याध्यापक आम्हाला पालकांना दाद देत नाही. पोलिसांनी ड्युटी करायची का या प्रश्नाकडे बघत राहायचं. पोलिसांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का?असा प्रश्न त्यांनी केला. पूनम कडव म्हणाल्या, एका मुलीने तिच्या घरी फी भरली नाही म्हणून आम्हाला बाहेर बसवला आहे असे तिच्या आईला कळवल्यानंतर तिच्या आईने मला कळवलं त्यावेळी मला समजलं माझ्या मुलाला बाहेर काढलेला आहे मी जनरल कॅटेगिरी मध्ये येते माझा पगार दहा तारखेला होतो त्यामुळे मी संध्याकाळी फी भरेल असे मी ठरवले असताना देखील आणि ॲपवर 12 तारखेची मुदत दिलेली असताना देखील त्यांनी माझ्या मुलाला बाहेर बसवलं मुलांच्या मनावरती काय परिणाम होणार अर्धी मुले शाळेत शिकत आहेत आणि अर्ध्या मुलांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आले आहेत. याचबरोबर, आम्ही मीडियाशी बोलो म्हणून उद्या आम्हाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. उद्या आमच्या मुलांवर खुन्नस देखील काढली जाईल असेही या पालकांनी सांगितले आहे. वैभवी बांदेकर म्हणाल्या की, मी तर फी देखील भरली असताना देखील माझ्या मुलाला बाहेर बसवलं. आता मुलांना आमच्या ताब्यात देखील देत नाहीये. एका पालकांनी व्हिडिओ काढला म्हणून मुलांना एका रूममध्ये बसवण्यात आला आहे परंतु त्यांना वर्गात शिकण्यासाठी देत नाहीये. असा मनमानी कारभार पोलीस स्कूल प्रशासनाचा चालू आहे असा आरोप पालकांनी केला आहे.