Category: ठाणे

Thane news

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करुन प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. शनिवारी सकाळी ७.०० वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला. आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक परिसर, के व्हीला, राबोडी, ऋतू पार्क आदी भागात या मोहिमेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात, रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमे दरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. शौचालयातील पाण्याची समस्या, स्वच्छता, परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली. तसेच, सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या. या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या परिसर, मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या परिसरात नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण कसे मिळेल या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या वेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते. नालेसफाईचा आढावा उथळसर मधील मुख्य नाल्याच्या सफाईचा आढावा यावेळी आयुक्त राव यांनी घेतला. नाले सफाई वेळेत पूर्ण करण्यावर विभागाने लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी पाहणी नंतर दिले.

नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी यात मोलाची भूमिका बजावावी असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात शनिवारी राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात, आंबेघोसाळे तलाव येथे मतदानाची जनजागृती करणारे फलक लावून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर आदी उपस्थित होते. रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. जोडून आलेल्या सुटीच्या मोहात न पडता मतदानाच्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी, असेही आवाहन आयुक्त राव यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन

नरेश म्हस्केंनी भरला उमेदवारी अर्ज भरला अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यासहीत शिवसेना कुणाची याचा फैसला करणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी को हराना मुश्कीलही नही…

ठाणे : एकीकडे देशाला वाचवायला, लोकशाहीला पुढे नेण्यासाठी आणि विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर, दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडीया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. तसेच पप्पु आधीच फेल झाला असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा फेल करतील, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि इंडीया आघाडीवर टीका केली. २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार, दंगली आणि बाॅम्बस्फोट घडत होते. पण, त्यानंतर एकदाही बाॅम्बस्फोट करण्याची कुणाची हिमंत झाली नाही. कारण, भारताकडे डोळे वटारून पाहिले तर घरात घुसून मारु असा इशारा मोदींनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून मी जमिनीवर उतरुन काम करतोय. याआधीही मीच काम करत होतो पण, त्याचे श्रेय दुसरे घेत होते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर, बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले, असेही ते म्हणाले. तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले, असा टोला लगावत या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. तसेच आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेत कामा नये, असेही ते म्हणाले.

ठाण्याचा आर्यन कनोजिया ठरला  विजेता

दुबईतील आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत ठाणे – ठाण्यातील सेंट जॉन बाप्टीस्ट स्कुलमध्ये शिकत असलेला आर्यन मनोज कनोजिया हा कराटेपटू आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत देशाचं नेतृत्व करताना सुवर्णपदक विजेता ठरला आहे.…

शिवसेनेच्या फोडणीला बिचुकलेंची तेलाची धार

कल्याण लोकसभेत अभिजीत बिचुकले यांची एंट्री डोंबिवली : कल्याण मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. यातच शुक्रवारी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो आहे असे बिचुकले यावेळी म्हटले आहे. यामुळे शिंदे व दरेकर यांच्यातील रंगतदार लढतीत बिचुकले आगीत तेल कसे टाकतात हे पहावे लागेल. कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वादग्रस्त विधान करत नेहमीच चर्चेत राहिलेले बिचुकले आता कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कशी रंगत आणतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच त्यांनी येथे चुरशीची लढत अगोदरच आहे. त्यात तेल ओतायला मी आलो आहे असे सांगितले. तसेच सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस मी येथेच ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्धीसाठी आपण निवडणूक लढता असे म्हटले जाते. यावर बिचुकले म्हणाले, 288 आमदारांपेक्षा मी नक्कीच प्रसिद्ध आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही मी जन्मापासून प्रसिद्ध आहे. परडे 50 हजार, 1 लाख रुपयाचे काम सोडून जनतेसाठी मी लढतो तर जनतेला माझ्याबरोबर आले पाहिजे. माझ्याकडे काम आहे मी माझ्या स्टाईल मध्ये काम करतो. कल्याणमध्ये विकास झालेला नाही… अभिजीत बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापू्र्वी त्यांनी विकास केला असेल त्यात दुमत नाही. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे. कल्याण लोकसभेतून अर्ज भरला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भूलथापा देत आहेत असं मला वाटतं. मी अधिकारवाणीने हे बोलतो आहे. लोकांची कामं होत नाहीयेत. संसदेला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या असं पत्र मी नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात. मात्र बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यास यांचा नकार आहे का? हा माझा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अटल सेतू हे नाव देण्याआधीही मी त्या सेतूला माँसाहेब जिजाऊंचं द्या अशी मागणी केली होती मात्र ते नावही देण्यात आलं नाही असंही बिचुकलेंनी म्हटलं आहे. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार होतं. त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? उदयनराजेंना तुम्ही तिकिट दिलंय. त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान असल्याचं वाटत नाही. याच सगळ्या कारणांसाठी मी आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात माझी उमेदवारी घोषित करतो आहे असं अभिजित बिचुकलेंनी म्हटलं आहे.

ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा

सिद्धार्थ म्हात्रेचा अष्टपैलू खेळ विशाल मोरेकर ठाणे  : सिद्धार्थ म्हात्रेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एसआरएस ग्रुपने महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीचा सहा फलंदाज राखून पराभव करत महाराष्ट्र  माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रिमीयर लीग टी २०  क्रिकेट स्पर्धेत विजयी वाटचाल केली. सिद्धार्थने ९ धावांत ४ बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना ११४ धावांवर रोखल्यावर नाबाद ५४ धावांची खेळी करत ११५ धावांसह संघाला विजयी केले. प्रथम फलंदाजी करताना  मनोज यादवने नाबाद ३२, ह्रितिक पाटीलने २२ आणि संकेत यशवंतेने १५ धावा करत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला मर्यादित धावसंख्येवर रोखताना सिद्धार्थसह साईराज पाटील आणि शशांक अत्तरडेने प्रत्येकी दोन, प्रथमेश डाकेने एक बळी मिळवला. उत्तरादाखल यंदा मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुशीर खानने अवघ्या १७ धावांत ३ बळी मिळवत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला अडचणीत आणले. संघ नाजूक स्थितीत असताना गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीत छाप पाडणाऱ्या सिद्धार्थने दोन छोट्या भागीदारी रचत संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. संघाची अवस्था ३ बाद १७ धावा अशी असताना सिद्धार्थने साईराज पाटीलला हाताशी घेत चौथ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले, त्यानंतर सिद्धार्थने आकाशसह पाचव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. सिद्धार्थला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संक्षिप्त धावफलक  : महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी : २० षटकांत ९ बाद ११४ ( मनोज यादव नाबाद ३२, ह्रितिक पाटील २२, संकेत यशवंते १५, सिद्धार्थ म्हात्रे ४-०-९-४ , साईराज पाटील ४-१४-२, शशांक अत्तरडे ४-१७-२, प्रथमेश डाके ४-२८-१ ) पराभूत विरुद्ध  एसआरएस ग्रुप : १६.४ षटकात ४बाद ११५ (सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ५४, आकाश पारकर नाबाद २३,साईराज पाटील २१, मुशीर खान ४-१७-३) सामनावीर : सिद्धार्थ म्हात्रे.

ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ?

माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज डोंबिवली – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज…

वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई

टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात कल्याण/वसई: एप्रिल महिन्यात महावितरणच्या टिटवाळा, अंबरनाथ पूर्व आणि वाडा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. टिटवाळा उपविभागा‍त १२४ जणांविरुद्ध कारवाई करून ४१ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. अंबरनाथ पूर्व उपविभागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या १९ ग्राहकांकडे २६ लाख ३५ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. तर वाडा उपविभागात तब्बल १०४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे. त्यानुसार टिटवाळा उपविभागातील जीआर नगर, बल्याणी गाव, आंबिवली रोड, वैष्णवी देवी चाळ, गुरुवली पाडा, शिवनगरी चाळ भागात एकाच दिवशी राबवलेल्या शोध मोहिमेत १२४ जणांकडे सुरू असलेल्या वीजचोऱ्या शोधण्यात यश आले. या १२४ जणांकडून सुमारे ४१ लाख रुपये किंमतीची १ लाख ८० हजार ८८१ युनिट विजेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे यांच्या पथकांने ही कारवाई केली. अंबरनाथ पूर्व उपविभागात ३३३७ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात १९ वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले. या १९ ग्राहकांनी २६ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ९८ हजार ९९६ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, सहाय्यक अभियंते वैशाली पाटील, प्रशांत नाहीरे, हरेश विशे, प्रतिक म्हात्रे, मोहित ठाकुर, रविंद्र नाहिदे, सहायक लेखापाल मयुरी बोरसे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. तर वाडा उपविभागात वाडा शहर आणि ग्रामीण, गोऱ्हा, अंबाडी, कुडूस आदी भांगामध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत १०४ जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला. या १०४ जणंनी १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. वाड्याचे उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार, सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच सुरक्षारक्षक यांच्या चमुने ही कामगिरी केली.

‘राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको’

जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला ठाणे : ज्या गुंडांना गेल्या अडीच वर्षांत राजाश्रय देण्यात आला होता. त्या गुंडांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळीयुद्ध घडविले. हे गुंड कुणाचेच नसतात. आज ते एकमेकांच्या अंगावर गेले; उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यास जात असताना त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळीयुद्ध झाले. यासंदर्भात आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून टीका केली. आपण जे पेरतो, तेच उगवत असतं. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना,  ज्या गुंडांना गेली अडीच वर्षे राजाश्रय दिला होता; त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते ज्या शहरात राहतात; त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली. माझी खात्री आहे, पोलीस याच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याच्या ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचे मला कौतूक वाटते. ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झाले. त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणूकाही ते प्रशासनाचे जावई आहेत.  म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असे आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.