Category: ठाणे

Thane news

विकासकामांची माहिती घेणे हा पाहणी दौऱ्याचा उद्देश- आयुक्त सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील, याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त व प्रशासक सौरभ राव यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली. सोमवारी सायंकाळी झालेल्या या पाहणी दौऱ्यास आनंदनगर, कोपरी येथून सुरूवात झाली. ठाण्याचे प्रवेशद्वार, सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली. दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यानंतर, ठाणे पूर्व सॅटीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली. त्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कला दालने व व्यवस्था यांची माहिती घेतली. महापालिकेने उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांच्या निगा व देखभालीचा खर्च निघेल  अशा पद्धतीने या वास्तूंची भाडे आकारणी केली जावी, अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या. अशा प्रकारच्या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रितसर करारनामा करण्यात यावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तीन हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचेही, तीन हात नाका, मॉडेला मिल नाका येथील वाहतुकीच्या परिचलनाची माहिती घेतल्यावर, आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील चौक आणि रस्ते अरुंद झाले आहेत. ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. त्या दृष्टीकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग  करण्याची आवश्यकता असून त्यांची नोंद घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर, आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली. किसन नगर येथील मिनाताई ठाकरे प्रसूतीगृहाचे बळकटीकरण आणि अत्याधुनिकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच, त्या गर्भवती मातांचा विचार करून येथे लिफ्ट सुविधा देण्यासाठी आराखडा सादर करण्यास बांधकाम विभागाला सांगितले.  वागळे इस्टेट भागात पडवळनगर येथील शौचालय, रोड. नं. २२ येथील सुशोभीत करण्यात आलेले सर्कल यांची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचबरोबर, जयभवानी नगर येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. क्लस्टरसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात सुरू आहे, याचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी महापालिकेकडून जे सहकार्य लागेल ते देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. क्लस्टरबाबत आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा तसेच येथील नागरिकांचे राहणीमान बदलण्यासाठी क्ल्स्टर ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे, या प्रकल्पाच्या कालबद्ध पूर्णत्वासाठी लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांसह बैठकही आयोजित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. वर्तकनगरमधील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली. ग्रंथालय, अभ्यासिका आदी सुविधांची माहिती घेत त्यांनी तेथील प्रशिक्षणार्थी, ग्रंथपाल यांच्याशी संवाद साधला. उपवन येथील घाट, कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली. तेथील सुविधा आणि व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, अनघा कदम, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे संचालक महादेव जगताप, घाणेकर नाट्यगृहाचे व्यवस्थापक अजय क्षत्रिय आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा –  अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. शिनगारे वेळोवेळी आढावा घेत असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून केलेल्या कार्यवाहीची ते नियमितपणे माहिती घेत आहेत. उमेदवारास वैयक्तिक स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घेता येते. निवडणूकसंबंधी कोणत्याही विषयात आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना मिळणार सुट्टी

अनिल ठाणेकर ठाणे :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. शासनाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानांचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. वर नमूद केल्यानुसार  उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक 202403221710362810 असा आहे.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी…

वसई न्यायालयात ऐतिहासिक नाण्यांना उजाळा

वसई : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फार पूर्वीपासून नाणी चलनात आहेत. प्राचीन साम्राज्य, राजवटींसह स्वातंत्र्यपूर्व काळातील नाणी वसईकरांना पाहता यावी, यासाठी वसई न्यायालयाच्या आवारात असलेल्या बार असोसिएशन रूम येथे नाणी प्रदर्शनाचे आयोजन (ता. २) करण्यात आले होते. या वेळी प्राचीन नाणी व त्याचा इतिहास समजण्यासाठी न्यायाधीश, वकिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली. शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बार असोसिएशनचे अॅड. भरत पाटील, अॅड. आनंद घरत, अॅड. पूनम जाधव यांनी नाणी संग्रह प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मुंबई कॉईन्स सोसायटी न्यूमिसमॅटिक सभासद जोसेफ लोपीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, व्यंकोजी राजे भोसले, पेशवेकालीन व पोर्तुगीज, तसेच बसिन (वसई) अशी दुर्मिळ नाणी जमा केली आहेत. जोसेफ लोपीस यांच्या मदतीने नाणी प्रदर्शन भरविण्यात आले. सुमारे एक हजार नाणी प्रदर्शनात होती. तोफगोळेदेखील नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली. या वेळी न्यायाधीश आर. डी. देशपांडे, न्यायाधीश खोंगल, नाथानी, वाळके आदींनी भेट दिली, तर ज्येष्ठ वकील अविनाश विद्वांस, नंदन भगत बार असोसिएशनचे अध्यक्ष परमानंद ओझा, दिगंबर देसाई, साधना धुरी यांच्यासह मोठ्या संख्येने वकील मंडळी सहभागी झाली होती. जग तंत्रज्ञानात पुढे जात आहे. नव नवी संशोधने होत आहेत, अशावेळी प्राचीन इतिहासालादेखील तितकेच महत्त्व आहे. नाणी प्रदर्शन म्हणजे जगात पूर्वी घडलेल्या घडामोडी आणि तेव्हाच्या राजे- महाराजे, नागरिकांनी…

बदलापूर एमआयडीसीमध्ये डी.के. फार्मा या केमिकल कंपनीला आग!

बदलापूर : बदलापूरच्या एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर १५ येथील डी.के फार्मा या केमिकल कंपनीला दुपारी १२ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. दुपारी अचानक एमआयडीसी परिसरातून धुराचे लोळ दिसू लागल्यावर सगळीकडे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले कारण यापूर्वी जानेवारी महिन्यातच पहाटेच्या सुमारास विके केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाने लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन महिन्याच्या फरकानेच येथील डी.के. फार्मा या कंपनीला देखील आज भीषण आग लागली. डी.के.फार्मा या कंपनीत वैज्ञानिक प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे व औषधांसाठी वापरात वापरात येणाऱ्या केमिकल चे रसायन प्रक्रिया होत असते. दुपारी अचानक कंपनीच्या ८/३२ या प्लॉटच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रिॲक्टर आणि प्रोसेसर या भागात ही आग लागली. यावेळी आगीचे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम ने पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. यापूर्वी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील आग प्रतिबंधक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने आग जास्त प्रमाणात वाढली नाही अशी माहिती सोनोने यांनी दिली. या कंपनीत एकूण १५० कर्मचारी असून, शिफ्ट नुसार ड्युटी असल्याने, घटना घडली तेव्हा कंपनीत साधारण १०० माणसे असल्याचा अंदाज कंपनी व्यवस्थापक अजित बेहरे यांनी दिली. या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, कंपनीत असलेल्या आग प्रतिबंधक यंत्रणेने आग विझवताना कंपनीतील एक कर्मचारी व नंतर अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, केमिकल आणि आगीचे डोळ्यांना रिअँक्शन झाल्याने त्यांच्यावर बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापकानी यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, केमिकल ची गळती होऊन आग लागल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. आगीचे कारण आम्ही नेमके आता सांगू शकत नाही. त्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. आमच्या कंपनीत एकूण १५० कर्मचारी कार्यरत आहेत मात्र, शिफ्ट ड्युटी असल्याने आगीची घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नव्हती म्हणून आम्हाला लवकर सगळ्यांना सुखरूप बाहेर काढता आले. यात कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसून, लवकरच आगीचे कारण स्पष्ट होईल – अजित बेहरे व्यवस्थापक डी.के. फार्मा कंपनी.

मालमत्ता कराची 716.97 कोटी वसूली

मागील वर्षीपेक्षा 83.66 कोटी रक्कमेची अधिक वसूली नवी मुंबई : मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या आर्थिक वर्षात सन 2023-2024 मध्ये रु. 716.97 कोटी रक्कमेचे उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झाले असून ते मागील 2022 -2023 वर्षापेक्षा 83.66 कोटींनी अधिक आहे. मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा हा आत्तापर्यंतचा विक्रम आहे. मागील वर्षी महानगरपालिकेकडे मालमत्ता करापोटी 633.31 कोटी इतकी रक्कम जमा झाली होती. यावर्षी वसूलीचे सुयोग्य नियोजन करीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मालमत्ता कर थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांच्या थकबाकी रक्कमेनुसार उतरत्या क्रमाने यादया तयार करण्यात येऊन अधिकाधिक महसूल वसूलीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पाठपुरावा करण्यात आला. याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व थकीत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा व्हावा यादृष्टीने 1 ते 31 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली. यामध्ये 1 ते 20 मार्च या कालावधीत थकबाकीच्या दंडात्मक रककमेवर 75% सवलत तसेच 21 ते 31 मार्च या कालावधीत 50% सवलत लागू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला व 8740 थकबाकीदारांनी 116 कोटी इतकी रक्कम अभय योजनेअंतर्गत थकबाकीच्या दंडात्मक रक्कमेवरील सुटीचा लाभ घेत भरणा केली. या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना रु. 45.56 कोटी इतकी रक्कम सवलत देण्यात आली. याचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत 83.66 कोटी रक्कमेने अधिकची मालमत्ता करवसूली झाली. नागरिकांना मालमत्ता कर भरणा करणे सुलभ व्हावे यादृष्टीने आवश्यक काळजी घेत या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन दिवस सार्वजनिक सुट्टी आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता महानगरपालिकेची सर्व कार्यालये  व नागरी सुविधा केंद्रे करभरणा करण्यासाठी सुरु ठेवण्यात आली. त्यामुळे सुट्टीच्या तीन दिवसात 29 मार्चला 28.78 कोटी, 30 मार्चला 8.38 कोटी व 31 मार्चला 4.10 कोटी अशाप्रकारे अखेरच्या 3 दिवसात एकूण 41.26 कोटी इतकी रक्कम जमा झाली. त्याचप्रमाणे मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात 163.50 कोटी इतक्या रक्कमेचा करभरणा नागरिकांनी केला. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेला नेहमीच गती मिळालेली असून मालमत्ता करापोटी जमा होणारी रक्कम ही दर्जेदार नागरी सेवासुविधा पूर्तीसाठी वापरली जात असल्याने नवी मुंबईकर नागरिकांनी शहराच्या प्रगतीत आपले योगदान दिलेले आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराची रक्कम विहित कालावधीत भरणा केल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

ठाणे : ठाणे परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने इलेक्ट्रिक बसचा समावेश होत आहे. तसेच येत्या काळात आणखी नव्याने बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परंतु परिवहनच्या ताफ्यात वाहकांची कमतरता असल्याने १०० बस धुळखात पडून असल्याची माहिती समोर आली होती. अखेर ठाणे परिवहन सेवेमार्फत पुढील तीन वर्षासाठी तब्बल ४८६ वाहक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर झाला असून त्यापोटी ३७ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. परंतु आता ही भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतरच पार पडणार असल्याने ठेकेदार अंतिम होऊनही जून महिन्यातच ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली. परिवहनच्या ताफ्यात सध्यस्थितीला ३५० च्या आसपास बस आहेत. त्यात इलेक्ट्रिक ११३ च्या आसपास बस दाखल झाल्या आहेत. त्यातील ९९ बस रस्त्यावर धावत आहेत. तर उर्वरीत सात बस या वाहक नसल्याने आगारात पडून आहेत. परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ठेकेदाराच्या २४०, परिवहनच्या स्वत:च्या १५० च्या आसपास, व्होल्वो ३०, इलेक्ट्रिक ११३ बस आहेत. परिवहनमधून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसपैकी यापूर्वी १५३ बस या जुन्या झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. तसेच दोन महिन्यापूर्वी आणखी १७ बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. परंतु आता परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या वाढत आहे. येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात पीएम ई बस योजनेतून पालिकेला शंभर विद्युत बस उपलब्ध होणार आहेत. परिवहन उपक्रमामध्ये ९५२ वाहक कार्यरत आहेत. त्यामध्ये ६२१ कायमस्वरुपी वाहक आहेत. उर्वरीत कंत्राटी वाहक आहेत. त्यात २०६ पुरुष आणि १२५ महिलांचा समावेश आहे. ठाणे परिवहन कार्यालयातील इतर विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा कामाचा भार काही कायमस्वरुपी वाहकांवर सोपविण्यात आला आहे. ६२१ पैकी १८० वाहकांना कार्यालयीन कामांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण होऊन बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. दुसरीकडे वाहकांची कमतरता असल्याने आजही नव्याने दाखल झालेल्या सुमारे १०० बस धुळ खात पडून असल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आता परिवहनच्या ताफ्यात ४८६ कंत्राटी स्वरुपात वाहक घेण्यासंदर्भात निविदाकार अंतिम करण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याची माहिती परिवहन सुत्रांनी दिली. त्यानुसार तीन वर्षासाठी हे कर्मचारी घेतले जाणार असून त्यापोटी ३७ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातही वाहक भरतीसाठी केवळ एकच ठेकेदार आल्याने अखेर पालिकेने तो अंतिम केला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जूनमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच भरतीची ही प्रक्रिया मार्गी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

३० एप्रिलपर्यंत मतदार जाणीव जागृती कृती आराखडा – महेंद्र गायकवाड

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीतील प्रबोधनासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदार जाणीव जागृती कृती आराखडा आखण्यात आला असून १ एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याची माहिती ठाणे झजिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी  दिली आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचा मतदार जाणीव जागृती कृती आराखडा १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड,  शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर या तालुक्यांमधील कौटुंबिक हिंसाचारांतर्गत नोंदणीकृत असलेल्या १५००. महिलांना व बालसंगोपन, शिलाई मशीन, स्वयंरोजगार, विद्यावेतन या ३६०० लाभार्थीं महिलांना आणि महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित ४५०० बचतगटातील महिला प्रमुखांना, मतदान ओळखपत्र नसल्यास उपलब्ध करुन देणे, मतदान करणेविषयी जाणीव जागृती करणे, १८ वर्षापेक्षा अधिक असलेल्या मुलींना नमुना ६ भरणे याबाबत सूचित करणे. १० एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत वरील १२, ००० महिलांना फोन, एसएमएसद्वारे मतदान विषयी जाणीव जागृती करणे व माहिती पुरविणे. २० एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत ४२०० अंगणवाडी सेविका, ४२०० मदतनीस, १०० मुख्यसेविका यांच्याद्वारे पथनाट्य,  प्रभातफेरी, प्रदर्शन, स्पर्धा या माध्यमातून मतदान विषयी जाणीव जागृती करणे व माहिती पुरविणे. जाणीव जागृतीसाठी फेसबुक, युट्यूब, मेसेज, काॅल, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हिडीओ काॅल, बॅनर, मोखिक आदी संपर्क साधनांचा उपयोग करणे. तसेच भारतीय घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याचा आणि देशासाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवार निवडण्यासाठी निर्भयपणे, निष्पक्षपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करेन अशा अर्थाचा संकल्प या जाणीव जागृती उपक्रमांतर्गत करण्यात येणार असल्याचेही ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

सिद्धेश्वर तलाव येथे श्री समर्थ मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर व अमृतमुल्य किर्तन सोहळा संपन्न

ठाणेः ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात कार्यरत असलेल्या श्री समर्थ मित्र मंडळ या सेवाभावी संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त रक्तदान शिबीर व अमृतमुल्य किर्तन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रक्तदान शिबिरात सुमारे 232 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर यावेळी आयोजित आरोग्य शिबिरातही ईसीजी, मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष निलेश मुंढे, सरचिटणीस गणेश हळदे, खजिनदार नारायण काते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यास भाजिवाली चाळ, पाटीलवाडी रोड, सिद्धेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी अजितभाई शहा, संतोष अबगुल, नारायण पवार, रुचिता मोरे, प्रल्हाद पाटील सचिनदादा भोसले आदींची विशेष उपस्थिती लाभली. रविवारी सिद्धेश्वर तलाव परिसरात श्री समर्थ मित्र मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी संतोष अबगुल प्रतिष्ठान व श्रीमती शारदाबाई हौशिलाल मेडीकल फाउंडेशन ट्रस्ट व वेद हॉस्पिटल यांच्यावतीने रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी 232 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला. सायंकाळी 7 वाजता हरिपाठ व रात्रौ अमृतमुल्य किर्तन सोहळयामध्ये खेड तालुक्यातील कळंबणी गावचे ह.भ.प. गणेश महाराज शिगवण यांच्या सुमधूर किर्तनाचा आस्वाद भाविकांनी घेतला. या कार्यक्रमासाठी सल्लागार सुनिल चव्हाण, अनंत शिंदे, सुरेश तटकरे, यशवंत जवरत, संजय गायकवाड, एकनाथ तेली, रिंकेश जाधव, चंद्रकांत कासार, गजानन साळसकर, विशाल फाटे, अंकुश हिरवाडकर, नितीन खामकर, नरेंद्र महाबळे, महेंद्र ठाकूर, दिनेश हळदे, संतोष दंत, हर्षद उतेकर, सुभाष बारस्कर,  स्वप्नील कालेकर, अमित दिगे, मधुकर साळुंखे, सुरेश ऐत, निळकंठ काते, भावेश चव्हाण, संदेश जवरत, केवळ चव्हाण, प्रशांत खरीवले, साहिल गायकवाड, मंगेश मुंडे, सौरभ शिंदे, रोहित हळदे, संस्कार तटकरे, सर्वेश गायकवाड, रविंद्र घाडगे, रुपेश पवार, विष्णु पांचाळ, महेश मोरे, मयुर कदम, सुचित चव्हाण, आत्माराम गंगुत्रे, कल्पेश चव्हाण, रोहिदास लोखरे, नामदेव निपुत्रे, बापु पाटील, अशु ठाकूर आदी कार्यकर्ते व हितचिंतकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.