Category: ठाणे

Thane news

खासदार नरेश म्हस्के यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले…

वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

 अप्पा शिंदे अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती कार्यालयाचे उद्घाटन

29 जानेवारी रोजी अप्पा शिंदे यांचा कल्याणकरांच्या वतीने नागरी सत्कार   कल्याण : 29 जानेवारी रोजी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचा अमृतमहोत्सवी म्हणजेच 75 वा वाढदिवस असून तो कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिगग्ज नेत्यांच्या उपस्थित साजरा होणार आहे. याकरिता कल्याण पूर्वेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार करण्यात आली आहे. आप्पासाहेब अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती असे या समितीचे नाव असून या समितीच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी रोड परिसरात पार पडला. यावेळी माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक सचिन पोटे, नीलेश शिंदे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे, माधुरी काळे, नरेंद्र सूर्यवंशी, अर्जुन नायर, सुभाष म्हस्के, विष्णु जाधव, संदीप तांबे, संदीप माने, उमाकांत चौधरी, रुपेश गायकवाड, विजय भोसले, मनोज नायर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी संपूर्ण कल्याण करांच्या माध्यमातुन अप्पा शिंदे यांचा अमृतपर्व नागरी सत्कार केला जाणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्री मंडळींसह आणखीन काही दिगग्ज नेत्यांची देखील उपस्थित लाभणार आहे. या संपूर्ण सोहळ्याकरिता समिती नेमण्यात आली असून कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या समितीचे अध्यक्ष तर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड या स्वागत अध्यक्षा असणार आहेत. तसेच या समितीत निलेश शिंदे, प्रशांत काळे, सचिन पोटे, नाना सूर्यवंशी, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे यांसह कल्याण पूर्वेतील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान असणार आहे. यात प्रामुख्याने 21 पदाधिकाऱ्यांची मुख्य नियोजन समिती असून १०१ पदाधिकारी संयोजन समितीवर असणार आहेत. त्यामुळे पार पडत असणाऱ्या या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याला कल्याण पूर्वेतील तमाम जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने प्रशांत काळे यांनी नागरिकांना  केले आहे. 00000

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी आनंद परांजपे – सुनील तटकरे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली. मुख्य प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका व विचार हे माजी खासदार आनंद परांजपे हे मांडतील, भाष्य करतील. घटक पक्षांविषयीची भूमिका, इतर राजकीय भूमिका यांवर पक्षाचे इतर सर्व प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करुनच पक्षाची भूमिका मांडतील. तर आनंद परांजपे हे, सखोल अभ्यास व माहिती घेऊनच, पक्षाची धेय्य धोरणे व भूमिका, प्रसार माध्यमांसमोर मांडतील, वक्तव्य करताना आपल्या पक्षाबद्दल गैरसमज व वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही मुख्य प्रवक्ते म्हणून आनंद परांजपे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील –

ठाणे : घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड…

२७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन आरटीई’ प्रवेश – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_Portal या वेबसाईटवर दि. १४ जानेवारीपासून ते २७ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे. ०००००

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार –  प्रताप सरनाईक

ठाणे : ओला , उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील…

वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही – ॲड. पारिजात पांडे

अनिल ठाणेकर ठाणे : वक्फ कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. यात मुख्य न्याय तत्वाचे (प्रिन्सिपल ऑफ जस्टीस) पालन होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. असे परखड मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. पारिजात पांडे यांनी व्यक्त केले. तरीही, धार्मिक आधारावर उन्माद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. ठाण्यात सुरु असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘कायदा वक्फ बोर्डाचा’ हे पाचवे पुष्प ॲड. पारिजात पांडे यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, या सत्राचे अध्यक्ष ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत कदम, माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते. १९९५ साली काँग्रेस सरकारने व्यापक अधिकार दिलेल्या वक्फ कायद्यावर लख्ख प्रकाश टाकून ॲड. पांडे यांनी, वक्फ बोर्डाच्या मर्यादांना कात्री लावण्यासाठी विद्यमान केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रस्तावित ४० दुरुस्त्यांचा मुद्देसूद आढावा घेतला. ही धार्मिक लढाई निश्चित नाही. हा वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, याची ही लढाई आहे. ११३ कलमे असलेला हा वक्फ कायदा सर्वसामान्यांना आपला वाटत नाही. तरीही धार्मिक आधारावर जो उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार देतो की नाही, यात प्रिन्सिपल ऑफ जस्टीस फॉलो होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर संविधानाच्या चौकटीत वक्फ कायदा बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. आणि हे प्रस्तावित बदल बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सुचविलेले असून एकप्रकारे बोर्डाच्या कामाची गती वाढवण्यासाठी बदल आवश्यकच असल्याचे ॲड. पांडे यांनी नमुद केले. चौकट केंद्रात सुदैवाने बदल करण्याची मानसिकता असलेले सरकार विराजमान आहे. असा उल्लेख करीत ॲड. पांडे यांनी एकप्रकारे मोदी सरकारची स्तुती करून, या सरकारने वक्फ कायद्याचे नाव ‘एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा’ (युनिफाईड वफ्फ मॅनेजमेंट इन्पॉवरमेंट इफिशिएन्सी डेव्हलपमेंट ॲक्ट) असे केले. तसेच १४ ऑगस्ट १९४७ नंतर पाकिस्तान वा बांग्लादेश येथे गेलेल्याच्या इथल्या जागा वक्फच्या नावे होत्या. ही तरतुदच आता प्रस्तावित कायद्यात बदलण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हात ठेवाल ते वक्फचे हे चालणार नाही. याकडे ॲड. पांडे यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने वक्फ कायद्यातील मर्यादेच्या तरतुदी रद्द करण्यासाठी सादर केलेल्या दुरुस्ती विधेयकाविरोधात सध्या जो फेक नॅरेटीव्हचा प्रकार सुरु आहे तो समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. असे स्पष्ट करून ॲड.पांडे यांनी, त्यांचे बालेकिल्ले १०० टक्के ढासळणार असुन बालेकिल्यावरून त्यांचे निशाणही उतरणार आहे. असा सूचक इशारा दिला. तसेच आपणही समाज म्हणुन एक जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याची वेळ आली असल्याचे प्रेरीत करताना त्यांनी रामायणातील घटनेचा दाखला दिला.

‘वैश्य मेळावा, लक्ष्य २०२५’ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधी मिळवून देणार!

 उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची ग्वाही ठाणे : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक-कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, किशोर कदम (सौमित्र), कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संन्यस्त ज्वालामुखी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवेत. हिंदुत्व काय आहे हे जगाला ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला सांगायला हवेत. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ ही कादंबरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वि. रा. करंदीकरांपर्यंत अनेकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे आहेत, अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी चरित्रलेखक प्रा. डॉ. ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे, हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान भारतातील डाव्या-उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉ. शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी कवी-गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनीदेखील स्वामी विवेकानंदांच्या विचाराची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडत चालल्याची परिस्थिती आहे. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. दवणे यांनी केले. तर कवी-गीतकार व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) याप्रसंगी म्हणाले की, भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवनविचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काqढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील आपापला धर्म, स्व-धर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे, असे प्रतिपादन किशोर कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्रा. अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मनोगत व्यक्त करून ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशनसोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी केले, तर प्रा. संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातु यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले.