Month: January 2026

बचेंगे तो और लढेंगे….

बचेंगे तो और लढेंगे…. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ पैकी चार नगरसेवक फोडले. या घटनेनंतर उरलेल्या ७ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. बचेंगे…

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगर पालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. गटनेतेपदासाठी महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी 

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे आस्तेकदम पक्ष आणि चिन्हावर आता शुक्रवारी २३ जानेवारीला सुनावणी नवी दिल्ली: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रक्त आणि घामाने उभा केलेल्या शिवसेना…

ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’!

ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’! मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेला पाठींबा ठाकरेंचे ४ नगरसेवकही फुटले शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार स्वाती घोसाळकर कल्याण : तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करून कल्याण डोंबिवलीत ५…

पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख

पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख एमआयएमच्या नगरसेविकेचे आव्हाडांना आव्हान ठाणे : पुढील पाच वर्षत संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार एमआयएमचा असेल. असे थेट आव्हान मुंब्य्रातील…

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची  अखेर युती झाली आहे. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये  राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा असे म्हणत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र, ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत पाणी बाणी

मुंबईत पाणी बाणी तब्बल ४४ तास पाणीपुरवठा बंद मुंबई : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत तब्बल ४४ तास पाणीबाणी असणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे  मुंबईकरांना  पुढील काही दिवस उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी प्यावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो 7अ’ प्रकल्पासाठी ४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. परिणामी वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठ खंडीत होणार आहे. दरम्यान, मंगळवार, २० जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. तर नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळा देखील बदलल्या जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने बाधित भागातील रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व विभागात क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाईल. हे काम मंगळवार ते गुरुवार एकूण ४४ तास सुरू राहील. या भागात पाणीपुरवठा प्रभावित होईल. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर पालघर : जल,जंगल आणि जमीनीसाठी आदिवासी आता रस्त्यावर उतरली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला. पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले. चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट  ४ दिवसांनी घरी परतले ० हॉटेल पॉलिटिक्स संपले ० दिल्ली पॉलिटिक्स सुरु स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवकांचा हॉटेलमधिल मुक्काम आज…