दर दिवशी ३ ते ४ लहान मुलांवर होत आहेत उपचार
मिरा -भाईंदर : देशातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी पारा ४५°C पेक्षा जास्त नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी पालकांना २५ मे ते २ जूनदरम्यानच्या “नौतपा” काळात लहान मुले आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन, उष्माघात आणि हीट स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, विशेषतः नवजात बालक आणि सहा वर्षाखालील मुलांमध्ये हीटवेव्ह आणि नौतपामुळे संपूर्ण भारतात तापमानात मोठी वाढ होत असून त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई, वीज कपात तसेच डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे.
मिरा रोड येथील वोक्हार्टहॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांचे शरीर प्रौढांच्या तुलनेत तापमान नियंत्रित करण्यात कमी सक्षम असते. त्यामुळे त्यांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. अतिप्रमाणात घाम येणे, चिडचिड होणे, ओठ कोरडे पडणे, लघवी कमी होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, जास्त झोप येणे, जलद श्वास घेणे आणि शरीराचे तापमान वाढणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. डॉक्टरांनी पालकांना मुलांना दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत बाहेर न नेण्याचा आणि त्यांना थंड व हवेशीर वातावरणात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
मुलांमध्ये हीट स्ट्रोकची सूचना देणारी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या
जास्त ताप येणे, त्वचा कोरडी, लालसर आणि गरम होणे
चक्कर येणे, गोंधळ उडणे किंवा अतिशय सुस्ती येणे
जलद श्वास घेणे किंवा अनियमित हृदयाचे ठोके
वारंवार उलट्या होणे किंवा पाणी पिण्यास नकार देणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *