भारताविरुद्धच्या
वर्ल्डकप मॅचवर
पाकचा बहिष्कार
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताविरूद्धच्या टी-२० वर्ल्ड कपमॅचवर बहिष्कार टाकला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये मॅच होणार होती. बांगलादेशने भारतात सुरक्षेच्या कारणावरून खेळण्यास नकार दिल्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशची वर्ल्डकपमधून हकालपट्टी केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी आणि बांगलादेशला पाठींबा देण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला.
आयसीसेन बांगलादेशएवेजी स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला आहे.
बांगलादेश सरकारने भारतात खेळण्याबाबत सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशला स्पर्धेतून काढून टाकल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला.
दरम्यान, टी२० वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी ६ वेळा भारतानं विजय मिळवला आहे. तर, एका मॅचमध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला. एक मॅच टाय झाली होती. त्यात देखील भारतानं बॉल ऑऊटमध्ये विजय मिळवला होता.
