मुंबई मुंबईसह आज राज्यात सकाळी पावसाने दमदार हजेरी लावलीय. येत्या १४ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

 राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे.

येत्या ९ ते १४ जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीडपरभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून १४ जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.

राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *