Author: bittambatami.com

मोदींनी देश अमेरिकेला विकला!

मोदींनी देश अमेरिकेला विकला! राहुल गांधींची व्यापार करारावरून मोदींवर टिका टीका नवी दिल्ली : अमेरिकेबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टिका केली. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. जो व्यापार करार चार…

भारताचा व्यापार कराराचा विक्रम !

भारताचा व्यापार कराराचा विक्रम ! एका वर्षात विक्रमी ५ व्यापार करार  जागतिक जीडीपीत ५० टक्क्यांहून अधिक भागिदारी नवी दिल्ली : भारताने यंदाच्या एका वर्षात तब्बल पाच व्यापार करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतानं काही दिवसांपूर्वी यूरोपियन यूनियन सोबत मदर ऑफ…

प्रफुल पटेलांची मोदी-शाहांशी बंद दारा आड चर्चा

प्रफुल पटेलांची मोदी-शाहांशी बंद दारा आड चर्चा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतून माघार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणास भाजपचा विरोध नवी दिल्ली : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत उलटसुलट दावे दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहेत.…

सत्कार यशाचा, अमेरिकेसोबतच्या कराराचा

सत्कार यशाचा, अमेरिकेसोबतच्या कराराचा अमेरिकेसोबत यशस्वी व्यापार केल्याबद्दल एनडीएतील घटकपक्षांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रफुल पटेलही…

दिल्लीत होणार प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर!

पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत ७-८ मार्चला रंगणार नवी दिल्ली –  प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा…

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विजय साळवी यांच्या आयोजनाखाली होणार भव्यदिव्य स्पर्धा कल्याण : हिंदुस्तानातील तमाम हिंदुप्रेमी नागरिकांचे आराध्य दैवत असणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर शिवसेना शाखेने शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोण होणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ चा मानकरी हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवसेना उपनेते विजय साळवी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण शहर शाखा यांच्या वतीने “हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार ६ फेब्रुवारीला  सायंकाळी ६ वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) संतोषी माता मंदिर रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची मान्यता आहे. या स्पर्धेला कल्याणकर क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण पश्चिम व मुरबाड जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला आदींनी केले आहे.

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कल्याण : विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा तसेच मोबाईलचा अतिरेक सोशल मीडिया, टेलिव्हिजनमुळे एकाग्रता भंग होणे, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी व ताण-तणाव नियंत्रण याबाबत ध्यानधारणा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक व सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल काजरोळकर यांनी मार्गदर्शन केले. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर व विश्वस्त लता परब, कैलास रेडीज यांच्या पुढाकाराने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, परळी, वाडा, जिल्हा–पालघर येथे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ध्यान (मेडिटेशन) शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास बंजारा यांनी सर्च विदिन फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक संजय हुंबरे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी यांचे आभार मानले.

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयोजित  महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले. महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली, या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,  बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले.  महापौर निवडीनंतर भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला.

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी आरती परब दिवा : दिवा रेल्वे स्टेशन ते पडले बीएसयुपी तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गांवरील ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसची संख्या व फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. दिवा रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पडले बीएसयुपी व डोंबिवली या मार्गांवर परिवहन सेवेच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सध्या या मार्गांवरील बसची संख्या अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी या मार्गावर केवळ दोन बसेस असून त्यामधून फक्त सहा फेऱ्या होत असल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर एक ते दीड तासांपर्यंत जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गावरही फक्त दोन बसेस असल्याने फेऱ्यांमधील अंतर मोठे असून अनेक वेळा ऐनवेळी बस रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेषतः रविवारी अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून याबाबत प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजी वाढत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. दिवा शहर व परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक नागरिक डोंबिवली एमआयडीसी, खिडकाळी आदी भागात जाण्यासाठी या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता संबंधित मार्गांवरील बसची संख्या व फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन परिवहन सेवेचे उत्पन्न व विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिवा शहरातील वरील मार्गांवरील बस सेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी मनसे दिवा शहराच्या वतीने प्रशांत प्रभाकर गावडे यांनी केली आहे.

  विनय चंद्रकांत शाह, परिचर, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या सेवानिवृत्ती सोहळयास प्रकाश नरसाणा,तुषार परब, रजनीकांत काजरोळकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.