Author: bittambatami.com

दिवंगत आर.आर.पाटील यांच्या सूचनेकडे गृहविभागाचे अद्यापही दुर्लक्ष

रमेश औताडे मुंबई : दक्षिण मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या महिला प्रसाधनगृहात घुसून एका वकील महिलेचा विनयभंग करणारा सरकारकडे अद्यावत माहिती नसलेला परप्रांतीय सुरक्षा रक्षक संदीप पांडे याला पोलिसांनी अटक केली. याअगोदर अशा घटना घडल्या आहेत. त्यातील 99 टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय आहेत. परराज्यातून  तडीपार केलेले हे गुंड महाराष्ट्रात नोकरी करतातच कसे ? या  तक्रारीवरून दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची एकत्रित माहिती गोळा करून त्याचा एकत्रित डाटा एका क्लिकवर मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पुढे त्यावर सरकारने व गृहविभागाने अद्यापही गांभिर्याने काहीच केले नसल्याने परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिलांच्या विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत व त्या सुरूच राहतील अशी भीती महिला संघटना करत आहेत. तीन दिवसांपूर्वी झालेल्या ताज्या घटनेतील महिला वकील असून ती खासगी लॉ फर्ममध्ये कामाला आहे. ती एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी सुरक्षा रक्षक संदीप पांडे हा महिलांच्या वॉशरूममध्ये तिला दिसला. महिला प्रसाधनगृहात तुझे काम काय ? असे तिने त्याला विचारले. त्यानंतर पांडे हा घाबरला व तो बाहेर पळाला. त्यानंतर पीडितेने प्रसाधनगृहाच्या आतून कडी लावली. तेव्हा पांडे तिला पुन्हा आत दिसला. पीडितेने मदतीसाठी धावा सुरू केला. तेव्हा पांडे याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला बुक्का मारून लाथ मारली. त्यानंतर पांडे हा प्रसाधनगृहातून बाहेर पडला. या प्रकरणानंतर संबंधित आरोपीविरोधात पीडितेने आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली गेली. आता तपास सुरू होईल व त्याला शिक्षा होईल व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होईल. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा निघणार आहे की नाही ? असा सवाल महिला करत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी चे मालक मंत्रालयात बिनधास्तपणे फिरत असतात.  त्यांना कोणाचा आशीर्वाद असतो ? १९८१ साली सरकारने सुरक्षा रक्षक कायदा केला. सरकारचा हा कायदा असा आहे की , अनेक कंपन्या , मॉल , बँका , आस्थापना , कारखाने , महामंडळे इतर सरकारी कार्यालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त केले पाहिजेत. किंव्हा त्या त्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक त्यांनी नियुक्त केले पाहिजेत. जर सुरक्षा मंडळाकडे सुरक्षा रक्षक नसतील तर तसे हमी पत्र घेऊन खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीने सूट प्राप्त अर्ज करून त्या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा कार्यरत करावी.असे आदेश आहेत.कायदा आहे. मात्र मंत्रालयात  सर्वत्र आलबेल आनंदी आनंद असल्याने खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीचे मालक बिन्धास्त मोकाट मंत्रालयात फिरत आहेत. सरकारी सुरक्षा रक्षक मंडळातील कोरोना काळात ऑन ड्युटी मृत सुरक्षा रक्षकांच्या विधवा पत्नी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असताना व दिवंगत आर आर पाटील यांच्या सूचनेला दाखवलेली केराची टोपली सामान्य जनतेला आच्छे दीन कधी आणणार असा सवाल महिला वर्ग करत आहेत.

निवडणूक निरीक्षक राहूल यादव व सुधांशु मिश्रा यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

अशोक गायकवाड रत्नागिरी : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव आणि निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून येथील अल्पबचत सभागृहात आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, विशाल खत्री आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या. होम वोटींगच्यावेळी गोपनीयता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. व्हिव्हीपॅट कसे हाताळावे, याबाबतही एक व्हीडीओ सर्वांना देण्यात येईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये एकूण उमेदवार, त्यांचे आलेले अर्ज, दिव्यांग तसेच ८५ वर्षापुढील मतदारांसाठी करण्यात आलेली तयारी, प्रशिक्षण, ईव्हीएमची सरमिसळ, केंद्रस्तरीय परिवेक्षक, मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, भरारी पथक, स्थिर निगरानी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनीही सादरीकरण करुन, सीमा तपासणी नाके, प्रतिबंधात्मक आदेश, केलेली कार्यवाही, शस्त्रास्त्र, परवाने, स्ट्राँगरुम बंदोबस्त अशी एकूणच कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

मॉर्डन क्रिकेट क्लब सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब…

नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्यावतीने डोंबिवलीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार

ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड,…

भारतीय पुरुषांचा अंतिम फेरीत ८५ धावांनी दारूण पराभव

कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा दारूण पराभव करत इंग्लंड-एशिया कपावर नाव…

माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी

वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन डोंबिवली : मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून मुंबई, ठाणे किंंवा नाशिककडे जाण्यासाठी विना अडथळा, सुसाट वेगाने जाता येत असल्याने प्रवासी माणकोली पुलावरून जाण्यास पसंती देत आहेत.…

बहाई धर्मीय समाज रिझवान महोत्सव

मुंबई : मुंबईसह जगभरातील बहाई धर्मीय समुदाय आणि त्यांचे अनुयायी एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीला येणारे दिवस मिळून 12 दिवस त्यांचा रिझवान महोत्सव उत्सव साजरा करतील अशी माहिती…

आरटीई अंतर्गत बदलांचा फटका विद्यार्थ्यांना?

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) सरकारने विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतचे शिक्षण देणे अनिवार्य आहे. मात्र, राज्यातील बहुतांश अनुदानित शाळा, शासकीय-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय, असा सवाल आप…

दक्षिण मुंबईचा तिढा दोन दिवसांत सुटणार

मुंबई : महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर उध्दव ठाकरेयांच्या शिवसेनेने अरविंद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. याचपार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दक्षिण मुंबईच्या जागेवरुन मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर दक्षिण मुंबई…