Author: bittambatami.com

बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी ‘पाणीबाणी’

तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी…

पत्राचाळवासीयांना खुशखबर !

जुलैमध्ये घरांचा ताबा मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचे…

‘भाजपाने भ्रमनिरास केल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली’

अकोला : २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच…

शरद पवारांकडून ‘मोदीं गॅरंटी’ची चीरफाड

पेट्रोल-गॅस महागला, १०० पैकी ८७ बेकार माढा: १० वर्षांपुर्वी सत्तेत येताना नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती. २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या ५० दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले…

‘बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी’

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल हिंगोली : उध्दव ठाकरेंकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, आणि त्या नैराश्यातूनच ते माझ्यासहीत पंतप्रधान मोदींवर टिका करीत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की,  बाप एक नंबरी अन् बेटा 10 नंबरी…

शेतकऱ्यांना एकदा नव्हे अनेकदा कर्जमाफी देणार

राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी बंपर गॅरंटी अमरावती: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही देशात काँग्रेसचे सरकार निवडूण द्या , शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची आम्ही अंमलबजावणी करू. देशात कृषी आयोगाची स्थापना करून ज्या राज्यातील…

मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व कसं कळणार ? – उद्धव ठाकरे

नांदेड: देशाचे पंतप्रधान धार्मिक ध्रुवीकरण करीत असून खोटा प्रचार करीत आहेत. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर हिंदूच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रं जास्त मुलं असणाऱ्यांना म्हणजेच मुस्लिमांना दिली जातील, असं पंतप्रधान…

ठाणे टोल हटवा, नाहीतर मतदानावर बहिष्कार

ठाणे : ठाण्याच्या वेशीवर असणारा मुलुंड चेकनाका येथील टोलनाका रद्द करा नाहीतर मतदावर बहिष्कार टाकू अशी आक्रमक भुमिका ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी घेतली आहे. तब्बल दहा हजार…

व्हीव्हीपॅट मोजणीवरील निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स आणि व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल्स पडताळणीसंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय राखून ठेवला. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिच्या निवडणुकीच्या पद्धतीवर आपला अधिकार नसल्याच्या भूमिकेचा सुप्रीम कोर्टाने पुनरुच्चार करत आवशक्यता भासल्यास त्यात सुधारणा सुचवल्या…

पीएचडी करणाऱे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना निलंबित करणाऱ्या

टीआयएसएस प्रशासनाचा निषेध अनिल ठाणेकर ठाणे : पीएचडीसाठी अभ्यास करणारे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना दोन वर्षे निलंबित करण्याच्या व रामदास यांना टीआयएसएसच्या सर्व कॅम्पसमध्ये प्रवेशास बंदी घालण्याच्या, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस डॉ. विजू कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. रामदास हे प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) चे सरचिटणीस होते, आणि आज ते एसएफआय च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून एसएफआय च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचे सहसचिव आहेत. युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांच्या देशव्यापी मंचाचेही ते प्रतिनिधी आहेत. रामदास यांच्याविरुद्ध काढण्यात आलेला निलंबनाचा आदेश हा भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर तसेच मतस्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे जे देशव्यापी कारस्थान चालले आहे, त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. टीआयएसएस च्या प्रशासनाने या कारस्थानात सामील होऊन आणि रामदास यांच्या कृतींवर राष्ट्रविरोधी हा ठराविक शिक्का मारून लोकशाही मूल्ये आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. रामदास यांचे निलंबन हे अशा प्रकारचे एकच उदाहरण नाही. देशातील अनेक कॅम्पसवर होत असलेल्या हुकूमशाही हल्ल्यांचा तो भाग आहे. भाजप व आरएसएस यांच्या केंद्र सरकारच्या विद्यार्थीविरोधी आणि शिक्षणविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवाल तर त्याचा हाच परिणाम होईल अशी देशातील समग्र विद्यार्थी समुदायाला दिलेली ती धमकी आहे. पण विद्यार्थी समुदाय अशा हल्ल्यांचा व धमक्यांचा धैर्याने सामना करत आहे. अलीकडेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या एकजुटीने आरएसएस च्या अभाविप या विद्यार्थी संघटनेचा जो धुव्वा उडवला, त्यातून हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याची झलक पाहायला मिळते. टीआयएसएस चे विद्यार्थी सुद्धा अशा हल्ल्यांच्या प्रतिकाराच्या अग्रभागी राहतील याचा आम्हाला विश्वास आहे. रामदास यांचे निलंबन ताबडतोब मागे घ्यावे, आणि स्वातंत्र्य व लोकशाहीवरील अशा हल्ल्यांविरुद्ध विद्यार्थी, शेतकरी, आणि सर्व जनतेनेच आपला बुलंद आवाज उठवावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने डॉ. अशोक ढवळे व डॉ. विजू कृष्णन यांनी केले आहे.