Author: bittambatami.com

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या, मंगळवारी वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर कि.मी १९.१०० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी…

औरंगाबादच्या बैजू पाटीलांची जागतिक भरारी

पॅरिसमधिल जागतिक छायाचित्र स्पर्धेत पहिला क्रमांक मुंबई- औरंगाबादच्या बैजू पाटील यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपला ठसा उमठविला आहे. पॅरिसमधिल ३३ व्या जागतिक पक्षी आणि निर्सग छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील…

ठाकरेंच्या सभेनंतर काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल कुस्ती

खामगाव : खामगाव येथे महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाली. महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ काल…

मोदी सरकार नव्हे आम्हाला भारत सरकार हवंय- उद्धव ठाकरे

अमरावती : शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे, युवकांना बेरोजगार करणारे, दहा वर्षात देश लुटून कंगाल करणारे, हुकूमशहा मोदी सरकार नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारे भारत सरकार हवेय अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र…

अजून खूप सत्य उघड व्हायचयं – एकनाथ शिंदे

मुंबई :  मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझे काही तत्व आहेत. माझ्यावर बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी लढणारा माझा स्वभाव आहे, अजून खूप सत्य उघड व्हायचयं असा…

‘मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको’

शरद पवारांचा मोदीवर हल्लाबोल अमरावती: संसदेपासून राज्याराज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही वाढत आहे. या देशात मोदींच्या रुपाने नवीन ‘पुतीन’ तयार होत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे अशा शब्दात शरद…

सुरतमध्ये भाजपा विजयी; काँग्रेसला दगाफटका?

सुरत : भाजपाने यंदाच्या निवडणूकीत आपले खाते उघडले आहे. सुरतमध्य काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरविल्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी…

आरटीईमधून खाजगी शाळा गायब

नवी मुंबई : राज्य सरकारने आरटीई प्रवेश नियमावलीत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे प्रवेशप्रक्रिया करताना पालकवर्गात मोठा गोंधळ उडाला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा असल्यास इतर खासगी अथवा अनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश न देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे स्वप्न भंगले आहे. सध्या आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना पालकांना इतर खासगी शाळांच्या जागा दिसत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत अनुदानित खासगी, विनाअनुदानित आणि महापालिका अशा सुमारे दीड हजार शाळा आहेत. नवी मुंबई शहर हे सिडकोने नियोजन करून वसवल्यामुळे प्रत्येक प्रभागात महापालिकेची शाळा आहे. ज्या भागात महापालिकेची शाळा आहे, त्याच परिसरात इतर संस्थांच्या खासगी आणि अनुदानित शाळाही आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ते उच्चवर्गीय गटांतील प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी ही चांगल्या खासगी शाळेत शिक्षण घ्यावे, अशीच धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, तो वंचित राहू नये, याकरिता सरकारने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सक्तीचे शिक्षण हे धोरण अवलंबले. याच धोरणातून आरटीईचा जन्म झाला. सरकारी शाळा अनुदानित आहेत, अशा स्वायत्त संस्थांमधून आरटीईद्वारे शिक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. त्यामुळे खासगी शाळांमध्ये पालकांना शिशू वर्गापासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत देता येत होते; मात्र आता सरकारने आरटीई धोरणात बदल केल्यामुळे आरटीईच्या पोर्टलमधून खासगी शाळांची नावे गायब झाली आहेत. ज्या भागात सरकारी अथवा महापालिकेची शाळा आहे, अशा परिसरात इंग्रजी खासगी शाळांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता पालकांना खासगीऐवजी सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवावे लागणार आहे. पोर्टलहून महापालिकेच्या शाळा गायब नवी मुंबई शहरात सीवूड्स, सारसोळे, कोपरखैरणे या ठिकाणी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा ज्या परिसरात आहेत, त्या ठिकाणच्या पालकांना आरटीई पोर्टलवर इतर खासगी शाळा दिसत नाही; मात्र महापालिकेच्या शाळाही पोर्टलवर दिसत नसल्याने प्रवेश कसा घ्यायचा, असा नवा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी महापालिकेचे नवीन पोर्टल सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता महापालिकेतर्फे वेगळे पोर्टल तयार केले जात आहे. या पोर्टलद्वारे अर्ज भरून पालकांना पाल्याचा प्रवेश करता येणार आहे. हे पोर्टल अद्याप तयार न झाल्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबवली असल्याचे समजते आहे. शाळांना मान्यता नाही नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना अद्याप दिल्ली बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. गेल्या सात वर्षांपेक्षा अधिक काळ मान्यता मिळवण्यात नवी मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरटीई पोर्टलवर नवी मुंबईच्या शाळा मान्यता नसल्याने दिसत नाही. मात्र, एकीकडे शाळांना परवानगी आणण्याचे आणि दुसरीकडे प्रवेशप्रक्रियेकरिता पोर्टल तयार करण्याचे दोन्ही समांतर काम सुरू असल्याचे समजले. महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळांना मान्यता घेणे आणि प्रवेशप्रक्रिया राबवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शहरातील पालकांकरिता स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ट्रॉमा केअर सेंटरअभावी रूग्णांची हेळसांड

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात आहे. येथील म्हामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमीच घडतात. त्यात अनेकांना तत्काळ उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले आहेत; परंतु शहापूर तालुक्यात अपघातग्रस्तांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध नाही. तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक संताप करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो; परंतु येथे उपचारास मर्यादा आहेत. त्यामुळे अत्याधुनिक उपचारांसाठी अपघातग्रस्तांना ठाणे, कल्याण व मुंबई यांसारख्या शहरातील रुग्णालयात न्यावे लागते. मागील वर्षी समृद्धी मार्गावर अपघातात २० च्या आसपास मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतदेह ठेवण्यासाठी कक्ष नसल्याने ते मृतदेह उघड्यावर ठेवले होते. रस्ते अपघात झाल्यास जखमींना प्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे-मुंबईतील रुग्णालयांत दाखल करावे लागते. त्यामुळे अपघातग्रस्तांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत शहापूर तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची मागणी होत आहे; मात्र प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत नसल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण झाले असून येथील पहिल्या मजल्यावर ट्रामा केअर सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. पाच एकर जागा मंजूर ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वेस्थानक व मुंबई-आग्रा महामार्गालगतच मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथे जखमींना तत्काळ उपचार मिळून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात; तर या रुग्णालयालगत पाच एकर जागाही ट्रामा केअर सेंटरसाठी मंजूर आहे. त्यामुळे बांधकाम होईपर्यंत खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे, यासाठी मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

 रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार रिंगणात

८  जणांनी घेतली उमेदवारी मागे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात. अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार निवडणुकीच्या  रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी  रायगड लोकसभा मतदार संघातील ८  उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ७  मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी दिली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. अनंत गिते, (अपक्ष),अनंत बाळोजी गिते, (अपक्ष),  अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २८  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छानणीत  ७ जणांचे अर्ज बाद झाले. सोमवारी  दुपारी ३  वाजेपर्यंत ८  उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे १३  निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत. १३ उमेदवार असल्यामुळे एक युनिटवर  मतदान घेता येणार आहे.  प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार १) अनंत गिते, (अपक्ष), २) अनंत बाळोजी गिते, (अपक्ष), ३) अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे), ४)  नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष), ५) मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष), ६) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी)…