Author: bittambatami.com

अवघ्या ६ तासात चाकरमनी मुंबईतून कोकणात इलो….

सावंतवाडी: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा आज थाटात शुभारंभ झाला आणि चाकरमनी अवघ्या ६ तासात मुंबईतून कोकणात इलो. मुंबईतील भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश…

भाजपाच्या महिला नेत्याच्या मुलीकडून रामाला शिवीगाळ

स्लग- इन्स्टावर रीळ टाकल्यानंतर बदलापूरमध्ये उद्रेक ० भाजपाकडून प्रतिभा जाधवांचा राजीनामा ० मुलगी मृणालवर गुन्हा दाखल बदलापूर : भाजपाच्या बदलापूर पूर्वमधील महिला आघाडी प्रमुख असलेल्या प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधवने मर्यादा पुरुषोत्तम रामाला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करीत…

जग हादरले… इराणचे धर्मगुरु खामेनी ठार

युद्ध चिघळले ० अयातुल्ला अराफी इराणचे नवे सर्वोच्च नेते० इराण बदला घेणार ० अमेरिकेच्या २७ लष्करी तळांवर हल्ले ० इराणमध्ये ४०दिवसांचा राष्टीय दुखावटा ० इस्त्रलायलमध्ये हायअर्लट तेहरान : अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या…

बी.के. बिर्ला कॉलेजमध्ये नवीन लेखकांचे शिबिर संपन्न

कल्याण : कल्याणातील बी.के. बिर्ला कॉलेज आणि दिल्लीतील केंद्रीय हिंदी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या हिंदी हिंदीतर भाषिकांसाठी नवीन लेखकांच्या शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय…

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

मुंबई : (अशोक गायकवाड )—राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, शेलेश नवाल यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली. ‘महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात ७ आणि १४ मार्च, १० आणि १७ एप्रिल तसेच ८ आणि १५ मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

 जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सन्मान मॅरेथॉन’चे आयोजन

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जीवनदीप फाउंडेशन आणि जीवनदीप वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता “महिला सन्मान मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्यजागृतीसाठी, आत्मविश्वास वृद्धीसाठी व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. टिटवाळा येथील पद्मावती रॉयल सोसायटी येथून या मॅरेथॉनची सुरवात होणार असून ३ कि.मी. अंतर पार करून घोटसाई गाव प्रवेशद्वार येथे सांगता होईल. यामध्ये १८ ते ३० वर्षे व ३० वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतात मात्र नाव नोंदणी अनिवार्य आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 91६7५६341२, 9५६13६3133 ००००००

समाजसेविका मंगलाताई अडसूळ स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा शनिवारी

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ स्मृती चषक ८/११/१४ वर्षाखालील  मुलामुलींच्या स्वतंत्र एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च रोजी…

गुड मॉर्निंग स्पोर्टस् १४ वर्षाखालील गटात चषकाचे मानकरी ठरले.

स्पर्श फाउंडेशन आयोजित स्वर्गीय सामानाधिकारी यांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा – २०२६. मुंबई :- भैरवनाथ मंडळाने स्पर्श फाउंडेशनने आयोजित केलेल्या तृतीय श्रेणी पुरुषात विजेतेपद पटकाविले. १४ वर्षा खालील गटात हा मान…

रनर्स क्लॅन फाऊंडेशनकडून दुर्गम भागातील शाळेला मदतीचा हात

क्रीडा स्वास्थ्य आणि समाजसेवा यांचा संगम कल्याण : मॅरेथॉन विश्वात आपल्या शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट आयोजनाने देशभर नाव कमावणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील ‘रनर्स क्लॅन फाऊंडेशन’ने आपल्या ‘क्रीडा स्वास्थ्य एवं समाजसेवा’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत एका सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या जि.प. शाळा, वाडी (शिवमंदिर) या दुर्गम भागातील शाळेला फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा साहित्याची मदत देण्यात आली. फाऊंडेशनच्या सदस्यांनी या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर आणि कवायती सादर करत सदस्यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्थानिक भागातील उपलब्ध पाना-फुलांपासून स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ पाहुण्यांना देऊन त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे उपस्थित सदस्य भारावून गेले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलाविष्कार शहरातून आपल्याला कोणीतरी भेटायला आले आहे, या भावनेने भारावलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गाणी आणि नृत्यांचे सादरीकरण केले.

 माथेरान झाले चकाचक

७८५ श्रीसदस्यांकडून भव्य स्वच्छता अभियान, ६ टन कचऱ्याचे संकलन, पर्यटन वाढीस मदत मुकुंद रांजाणे माथेरान : महाराष्ट्र भुषण थोर निरूपणकार तिथरूप आदरणीय  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त १मार्च रोजी माथेरान शहरात   सदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या अत्यावश्यक अभियानासाठी माथेरान मधील सदस्यांसह कर्जत तालुक्यातील कडाव,नसरापूर,चिंचवली,मानिवली, भडवळ, डीकसळ,किरवली येथून जवळपास ६५० श्रीसदस्य दाखल झाले होते.सकाळी आठ वाजता या अभियानास श्रीराम चौकातून सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला कार्यक्षम  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, गटनेते शिवाजी शिंदे,उप नगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक सचिन दाभेकर, सिताराम कुंभार, किरण पेमारे,सुनील शिंदे,केतन रामाणे,गौरंग वाघेला,सोहेल महापुळे,किशोर मोरे,नगरसेविका अनिता रांजाणे, अनुसया ढेबे,रिझवाना शेख, लता ढेबे, कमल गायकवाड, सुरेखा साळुंखे,अर्चना भिल्लारे, ऐश्वर्या शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. माथेरानच्या एकूण ५२ किलोमीटर परिसरातील जंगल भागात सुक्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्लास्टिक बाटल्या, वेफर्स ,गुटखा पाकिटे तसेच इतर प्लास्टिकजन्य सुका कचरा यावेळी सदस्यांकडून गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरी वस्तीमध्ये सुध्दा काही भागातील लोकांची आजही स्वच्छते बाबतीत मानसिकता नसल्याने आजूबाजूला गटारात कचरा टाकला जातो तो सर्व गोळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावरील गटारे स्वच्छ करून पालापाचोळा,काचेच्या बाटल्या एकत्रित केल्या आहेत.मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाका, पार्किंग या भागात जवळपास ६५ गोणी कचऱ्याचे संकलन करण्यात आले.जमा करण्यात आलेला एकूण पाच ते सहा टन कचरा नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांमार्फत हातगाडी मधून डंपिंग ग्राउंडवर नेण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या भव्य अभियानाच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे सदस्य जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.याठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम कचरा नेहमीच पहावयास मिळतो. यातील नैसर्गिक कचरा हा झाडांचा पाला असून कृत्रीम कचरा प्लास्टिक बाटल्या,पिशव्या वगैरे असतो.यासाठी सर्वांनी संकल्प करून यापुढे कापडी पिशव्यांचा वापर केल्यास निश्चितच काहीअंशी का होईना प्लास्टिक मुक्त माथेरान होण्यास सुरुवात होईल. रिझवाना शेख—नगरसेविका माथेरान