Author: bittambatami.com

छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान टिकविला;

शिवभक्त राजू देसाई यांनी वाहिली आदरांजली मुंबई : शहाजीराजांनी भगवाध्वज  छत्रपती शिवाजी महाराज यांना दिला याच ध्वजाला घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभे केले आणि हाच भगवा समर्थपणे पेलणाऱ्या दोनच महान व्यक्ती…

विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घेऊन कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे – गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर : विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा व कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे. विविध योजनेचा लाभ देण्याकरीता प्राथमिक टप्यांत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या नेतृत्वात व रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांच्या उपस्थितीत मे. टाटा मोटार्स (सीआरएस) यांच्यासोबत सांमज्यस्य करार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आला, त्यानुसार पालघर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत टाटा मोटर्स (सीआरएस) यांनी कृषी विभागाच्या अभिसरणातून १ एकर लाभार्थी यांना एकत्रित (आंबा ५० रोपे व काजू ५० रोपे व १०० बांबू रोपे वाटप करण्यात आले आहेत. सदर लाभार्थ्यांना टाटा मोटार्स मार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून त्याबाबत योग्य पद्धतीने लागवड व संगोपन करण्याचे नियोजन केल आहे.आजपर्यंत मग्रारोहयो अंतर्गत टाटा मोटार्स व कृषी विभागामार्फत १ हजार ४१० हेक्टर वर एकूण ३ हजार ६९२ लाभार्थी यांना लाभ देण्यात आले असून सदर लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत मनरेगा मधून १०० टक्के अनुदान पुढील ३ वर्ष देण्यात येणार आहे. तसेच नियोजित कार्यक्रमामधुन मग्रारोहयो अंतर्गत १ हजार ८२८ हेक्टरवर ४ हजार ५५४ लाभार्थ्यांना फळबाग लाभ देण्यात आला आहे. पालघर जिल्हयात एकत्रित ३ हजार २३८ हेक्टर वर एकूण ८ हजार २४६ लाभार्थ्यांना विक्रमी फळबाग योजनेचा लाभ देण्यात आला आहे, सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्याना पूढील ३ वर्ष १०० टक्के अनुदान देण्यात येऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीतून उत्पन्न वाढ होऊन आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होईल. राज्यातील महत्त्वाकांक्षी सी एम बांबू मिशन प्रकल्पामध्येही पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांना उच्च प्रजातीचे बांबू रोपे सलग व बांधावर लागवडीकरीता उपलब्ध करून देण्यात आली असून या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढील ४ वर्षात व्यावसायिक बांबूचे उत्पादन सुरु होण्यास मदत होईल. जिल्हयात आजतागायत १हजार ४९५ हेक्टरवर ५ हजार २८२ लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून यापुढेही लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मनरेगा केवळ मागेल त्याला अकुशल काम व त्यातून दैनंदिन मजूरी मिळविणे असे जुने स्वरुप राहिले नसून मनरेगातील वैयक्तिक लाभाच्या कामांचा लाभ घेऊन कुटूंब लखपती होऊ शकते व त्यायोगे सर्वांगिण समृध्द होऊ शकते. जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी मगांराग्रारोहयो विभागामार्फत फळबाग, बांबू लागवड, बरोबरीने विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा व कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पातलीपाड्यातील रहिवाशांचा `जंगल बचाओ’चा नारा!

जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध ठाणे : पातलीपाडा येथील डोंगरावरील १५ एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या ७० एकरापैकी ५५ एकरावर अतिक्रमणे झाल्यानंतर, रहिवाशांनी वृक्षारोपण व संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचविण्याचा निर्धार केला आहे. भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी `नैसर्गिक जंगल बचाओ’चा नारा दिला. ठाणे नगर विकास आराखड्यानुसार, पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक २८५/२, २७१, आणि १३९ (सुमारे ७० एकर) राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, या भागात २००८ पासून अतिक्रमणे सुरू झाली. या संदर्भात हिरानंदानी इस्टेटसह अन्य वसाहतीतील रहिवाशांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, ठोस कारवाई न झाल्यामुळे, २०११ मध्ये या जमिनीचे राखीव जंगल म्हणून संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या भागातील अतिक्रमणे थांबविण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडे लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांमुळे गेल्या १३ वर्षात १५ एकर मोकळ्या जमिनीत ५ हजारांहून अधिक स्थानिक झाडांचे संपन्न जंगल तयार झाले आहे. त्याचबरोबर ते पोपट, घार यांच्यासह स्थानिक व परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान बनले आहे. या १५ एकर जंगलाच्या क्षेत्राला संपूर्ण जाळीने (नेट) संरक्षित करून पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या पक्षी उद्यानात बाहेरुन आणलेले पक्षी सोडले जाणार आहेत. नेटचे आच्छादन असल्यामुळे ते बाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येईल. यापूर्वी राज्य सरकार व ठाणे महापालिकेने साकारलेल्या अनेक प्रकल्पांची दुरवस्था आहे. कळवा खाडी किनाऱ्यावरील डॉ. सलीम अली उद्यानाची दुरवस्था झाली. महापालिकेने उभारलेले `नवे ठाणे, जुने ठाणे’ प्रकल्पही भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेला. तुर्फेपाडा येथे उभारलेल्या अर्बन फॉरेस्टला आग लागल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मध्यरात्री मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. या पार्श्वभूमीवर पक्षी उद्यानाची दुरवस्था झाल्यास, संवर्धन केलेल्या १५ एकरावरील जंगलाचे नुकसान होईल, अशी भीती माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली. तर संरक्षित जंगल बचाओचा नारा दिला. दरम्यान, या परिसराला महापालिकेचे सहायक संचालक (नगर रचना) संग्राम कानडे, कार्यकारी अभियंता पाडगावकर, सर्व्हेअर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील रहिवाशांकडून सोमवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात येणार आहे.

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

हरिभाऊ लाखे नाशिक   केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. शहा यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही…

…तर रिपाइं (आठवले) ठामपाची निवडणूक स्वबळावर लढणार – सुरेश बारशिंगे

ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण…

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या…

साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कल्याण : कल्याण पूर्व, साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार  सुलभा गायकवाड या  उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

माथेरानला अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ मतदारांचीच गरज !

विकासाचा आलेख उंचावुन पर्यटन क्रांतीसाठी माथेरान : माथेरान हे जरी राज्यातील नावाजलेले रमणीय पर्यटनस्थळ असले तरी सुद्धा याठिकाणी अद्यापही अन्य स्थळांच्या तुलनेत विकासात्मक दृष्टीने आमूलाग्र बदल घडवून आणले गेले नाहीत.याला…

17 फेब्रुवारीला परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

ठाणे : नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिस-या सोमवारी १७ फेब्रुवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार, १७ फेब्रुवारी…

मनोज सानप, डॉ. संदीप माने व डॉ.अविनाश भागवत यांची उत्कृष्ट कार्यकर्ता” म्हणून  निवड

 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कार्याबद्दल ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्या ठाणे जिल्हा समन्वय समितीस  तसेच आपल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप आणि कोकण विभागीय सहसरचिटणीस तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश भागवत यांची उत्कृष्ट कार्यकर्ता” म्हणून राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे. राजपत्रित महासंघाच्या  39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यांना गौरविण्यात येणार आहे. आपल्या जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. *महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ अंतर्गत ठाणे जिल्हा समन्वय समितीने केले आहे.