Author: bittambatami.com

 कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना कॅन्सर संबधित उपचारांकरिता खाजगी रुग्णालयांमध्ये अथवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारार्थ जावे लागते. त्यामुळे अनेकदा रहिवाशांची अडचण होते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कॅन्सर रूग्णांकरिता अत्यंत महत्वाची अशी केमोथेरपी सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे आग्रही होते. त्या अनुषंगाने नमुंमपाच्या आरोग्य विभागाने गतीमान पावले उचलत टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या समन्वयातून नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 10 रूग्णखाटांची डे केअर केमोथेरपी युनीट (Day Care Chemotheropy Unit ) सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये काल  पहिला रूग्ण संदर्भित होऊन या रूग्णावर केमोथेरपी उपचार करण्यात आला आणि या सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकिय समुहासह टाटा ॲक्ट्रेक यांचाही वैद्यकिय समुह उपस्थित होता. डे केअर केमोथेरपी ही सध्याची प्रभावी आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धती असून ज्यामुळे केमोथेरपीसाठी नियमित हॉस्पिटलायझेशनची गरज कमी करते. त्यामुळे रुग्णाच्या वेळेची व साधनांची बचत होते. याच उद्देशाने नमुंमपाच्या आरोग्य विभागांतर्गत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे टाटा ॲक्ट्रेक यांचे समन्वयाने 10 रुग्णखाटांचे डे केअर केमोथेरपी युनीट सुरु करण्यात आले आहे. नेरूळ रूग्णालयामध्ये हे डे केअर सेंटर सकाळी 8 वाजल्यापासून कार्यान्वित राहील. रुग्णांवर उपचाराकरिता येथे फिजीशिअन, स्टाफ नर्सेस व आवश्यकतेनुसार इतर विशेषज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. हे डे केअर सेंटर सुरु करणेकरिता कॅन्सर उपचार संबधित सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना टाटा ॲक्ट्रेक, खारघर येथे प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले होते. सॉलीड ट्युमर्स (Solid Tumors) च्या रुग्णांवर या डे केअर सेंटर (Day Care center) मध्ये उपचार करण्यात येणार आहेत. सदर उपचाराचे निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा अँक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल (Haemodynamically stable) असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची (ICU) आवश्यकता नसेल अशा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांना केमोथेरपीच्या (Chemotherapy) दुस-या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना टाटा रुग्णालयापर्यंत जावे न लागता नवी मुंबईतच नमुंमपाच्या नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात औषधोपचाराचा लाभ घेता येईल. त्यामुळे टाटा रुग्णालयात दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अपॉईंटमेंट मिळाल्यावर उपचारांकरिता अगदी पहाटेसुध्दा उठून जाण्याची व दिवसभर रांगेत थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे. 00000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाश

अलिबाग : अशोक गायकवाड रायगड जिल्ह्याचे सन २०२४ चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी श्”जयसिंग मेहेत्रे, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती वृषाली माकर आदि उपस्थित होते. 0000

विधी सेवा शिबीर तसंच शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्या – न्या. ए.एस.राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी, सकाळी ११.०० वा. बालगंर्धव रंगभवन, रिलायन्स पेट्रोकेमिकल टाउनशिप, नागोठणे, ता. रोहा येथे “विधी सेवा शिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. 000000

डोंबिवली क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत सागरचे २ धावांत ८ बळी

६८ वी शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धा ठाणे  : सागर मिमरोटची भेदक गोलंदाजी, प्रणव यादवच्या शतकी खेळीसह दुसऱ्या  बळीसाठी केलेली ११७ धावांच्या शतकी भागीदारीमुळे डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनने  डेक्कन क्रिकेट फाऊंडेशनचा २११…

५वी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा

यजमान स्पोर्टिंग युनियन आणि साईनाथ अशी अंतिम झुंज   मुंबई, दि. १७ जानेवारी : साईनाथ स्पोर्ट्सने गतविजेत्या डॅशिंग सी. सी.चा २३ धावांनी पराभव करुन ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांची गाठ यजमान स्पोर्टिंग युनियनशी पडेल. कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेमध्ये यजमान संघाने मोठ्या धक्क्याची नोंद करताना भामा सी.सी.चा ७ विकेटनी पराभव केला. यापूर्वी गटसाखळीमध्ये पराभूत संघांनी मोठमोठ्या धावसंख्या रचल्या होत्या आणि विशेष म्हणजे स्पर्धेतील ३ शतके याच संघांच्या खेळाडूंनी ठोकली होती. साईनाथने प्रथम फलंदाजीचा निर्णय  घेत ९ बाद १२२ अशी तुटपुंजी धावसंख्या उभी केली. त्यांची किंजल कुमारी ही एकमेव खेळाडू विशीचा टप्पा गाठू शकली. श्रेया सुरेश, निलाक्षी तलाठी आणि वेदिका मंत्री यांच्या फिरकीने जसे साईनाथच्या फलंदाजांना जखडून ठेवले. तसे मग साईनाथच्या श्रीनी सोनी (२१/३ बळी) आणि श्रावणी पाटील यांनी डॅशिंगला लय सापडूच दिली नाही. साखळीत शतके ठोकणारी खुशी निजाई (३३) हीने थोडीफार चिकाटी दाखवली पण ती व्यर्थ ठरली. भामाने १९.३ षटकांमध्ये सर्व बाद ११३ धावा केल्या. त्यांच्या अंजू सिंग हिला आज भोपळाही फोडता आला नाही. अंजूप्रमाणे शतक ठोकणारी प्रिती पटेल देखील अपयशी ठरली. काव्या भगवंत (२१/३ बळी) आणि गगन मुल्कला यांच्यासमोर इतर फलंदाजांचा प्रभाव पडला नाही. त्याला अपवाद हृदयेशा पाटील (२९) आणि सृष्टी कुडाळकर (२२) यांचा. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (२८) आणि प्रांजल मळेकर (नाबाद ६०) यांनी ६० धावांची सलामी दिली. ध्रुवी धावचीत झाल्यावर प्रांजलने एक बाजू लावून धरली आणि वेळ येताच ५ चौकार ठोकत विजय साध्य केला. त्याआधी अंजू सिंगने आपल्या ऑफ स्पिनवर दोन फलंदाजांना १५व्या षटकात बाद करुन काही काळ अवश्य सनसनाटी पैदा केली होती. संक्षिप्त धावफलक साईनाथ स्पोर्ट्स २० षटकात ९ बाद १२२ (किंजल कुमारी २०, श्रावणी पाटील १९, श्रेया सुरेश १५ धावात २ बळी, निलाक्षी तलाठी २६ धावात २ बळी, वेदिका मंत्री ३० धावात २ बळी) वि. वि. डॅशिंग सी. सी. २० षटकात ८ बाद ९९ (खुशी ‌निजाई ३३, श्रीनी सोनी २१ धावात ३ बळी, श्रावणी पाटील १० धावात २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : श्रीनी सोनी भामा सी. सी. १९.३ षटकात सर्वबाद ११४ (हृदयेशा पाटील २९, सृष्टी कुडाळकर २२, काव्या भगवंत २२ धावात ३ बळी, गगन मुल्कला २१ धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १८.२ षटकात ३ बाद ११५ (ध्रुवी पटेल २८, प्रांजल मळेकर नाबाद ६०, अंजू सिंग १४ धावात २ बळी) सामन्याता सर्वोत्तम: प्रांजल मळेकर

आज कुर्ला येथे‌ मानव सेवा प्रतिष्ठानची आंतर शालेय कबड्डी स्पर्धा‌

मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान कुर्ला शाखा आयोजित १४ वर्षाखालील शालेय मुलांची  कबड्डी स्पर्धा १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता  गांधी मैदानावर होणार आहे. स्पर्धेत महिला मंडळ माध्यमिक विद्यालय कुर्ला, सेंट…

विवाद कामांच्या तासांचा

  कोणत्याही देशाची अर्थव्यवस्थेचा विकास, प्रगती होण्यासाठी युवा वर्गाचा हातभार असला पाहिजे, त्याबाबत दुमत नाही. भारतासारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असताना नोकरांचे वय वाढवणे, कामाचे तास वाढवणे यामुळे देशाच्या प्रगतीला…

‌‘रिअल‌’ वाढ, कृषि क्षेत्राचा आधार

सरत्या आठवड्यामध्ये अर्थनगरीमध्ये काही निष्कर्ष समोर आले. पहिले म्हणजे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकदारांतर्फे होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ अनुभवायला मिळाली. दुसरी लक्षवेधी बाब म्हणजे नजिकच्या भविष्यात कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेला…

महाराष्ट्राचा विवेकी आवाज-प्रा. डॉ. एन.डी. पाटील

फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा पुरोगामी वारसा चालवणारे सत्यशोधक विचारवंत प्रा डॉ एन डी पाटील यांचा आज तिसरा स्मृतिदिन. तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी २०२२ रोजी प्रा डॉ एन…