Author: bittambatami.com

 पानसरे हत्या प्रकरण

 तपासावर देखरेख सुरू ठेवायची आवश्यकत नाही मुंबई : दोन फरारी आरोपीबाबतचा तपास वगळता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे. त्यामुळे, दोन फरारी आरोपींच्या कारणास्तव प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख सुरूच ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरूच ठेवण्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. उपरोक्त निर्णय देताना, याप्रकरणी सुरू असलेला खटला जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने खटल्याची सुनावणी दररोज घ्यावी, असे आदेशही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने कोल्हापूर येथील विशेष न्यायालयाला दिले. तसेच, फरारी आरोपींना अटक झाल्यास तपास यंत्रणेने त्याबाबत विशेष न्यायालयाला माहिती द्यावी, असेही न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांची याचिका निकाली काढताना स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालानुसार आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही. पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे, या प्रकरणावरही न्यायालयाच्या देखरेखीची आवश्यकता नसल्याचा दावा प्रकरणातील दोन आरोपी वीरेंद्र तावडे आणि शरद कळसकर यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे केला होता. तसेच, पानसरे कुटुंबीयांची याचिका निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यांची याचिकाही न्यायालयाने यावेळी निकाली काढली. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांनी आधी प्रकरणाचा विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) तपास करण्याची मागणी केली होती. मात्र, आता हत्येच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गेली दोन वर्षे हाच दावा केला जात आहे. परंतु, तपास यंत्रणेने सर्व पैलूंनी प्रकरणाचा तपास केला आहे. दोन फरारी आरोपी वगळता आता तपास करण्यासारखे काहीच राहिलेले नाही, असे न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले होते. त्याचवेळी, पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी करता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांच्या मुख्य सूत्रधारांचा शोधच घेण्यात आला नसल्याच्या दाव्याबाबत म्हटले होते. पानसरे कुटुंबीयांची मागणी पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर. साहित्यिक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार सारखेच असून त्यांचा शोध तपास यंत्रणांनी अद्याप लावलेला नाही. किबंहुना, त्या पैलूने तपास यंत्रणांनी प्रकरणाचा कधी तपासच केला नाही. त्यामुळे, तपास सुरू ठेवण्याचा आणि त्यावर देखरेख ठेवण्याचा आग्रह पानसरे कुटुंबीयांच्या वतीने वरिष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी युक्तिवाद करताना केला होता. तपास यंत्रणेचे म्हणणे काय होते? प्रकरणाचा तपास सुरू आहे. तो थांबवण्यात आलेला नाही. मात्र, दोन फरारी आरोपी वगळता तपास करण्यासारखे काहीच राहिलेले नाही. दोन्ही फरारी आरोपींचा छडा लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. याशिवाय, खटलाही जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. हत्येच्या प्रत्यक्षदर्शी आणि पानसरे यांच्या पत्नीची साक्ष त्यांच्या वयोमानामुळे आलेल्या आजारपणामुळे अद्याप नोंदवण्यात आलेली नाही. परंतु, तीही लवकरच नोंदवली जाईल, असे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले होते. ०००००

 अभिनेते-दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान

 पनवेलमध्ये राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला १ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.   रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टीआयपीएल तर सहप्रायोजक निल ग्रुप आहेत. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस  रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी प्रसार माध्यमांना पुढे माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, मराठी रंगभूमीला गेली अनेक वर्ष अनेक चांगले कलाकार अभिनेते दिग्दर्शक लाभले.  त्यांनी त्या काळात त्यांच्या मेहनतीवर मराठी रंगभूमी यशस्वीरित्या उभी केली, वारसा पुढे वाढवला. अशाच काही कलाकारांचा गुणगौरव हा अटल करंडकच्या रंगमंचावर करण्यात येतो. अटल करंडकच्या ८ व्या वर्षी पासून “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर, ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर, प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना गौरविण्यात आले आहे. यंदा प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व ५० हजार रुपये पन्नास हजार असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. गेली दहा वर्षे चाललेल्या अटल करंडक स्पर्धेने टप्प्याटप्याने उच्चांक गाठला आहे. कोरोना काळातही एवढ्या मोठ्या स्तरावर अटल करंडक ही एकमेव स्पर्धा होती जी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरीत्या संपन्न झाली, स्पर्धेच्या ८व्या वर्षी कोरोना चे सर्व निर्बंध पाळत कोरोना काळातही प्राथमिक फेरीसाठी जवळपास १०६ संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी देखील अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला प्राथमिक फेरीसाठी १०८ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १४ डिसेंबर २०२४ पासून विभागनिहाय प्रारंभ झाला, जळगाव व नागपूर केंद्र, पुणे सातारा केंद्र, कोल्हापूर केंद्र, रायगड (पनवेल) केंद्र, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या केंद्रांवर संपन्न झाली. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून आशीर्वाद मराठे आणि मानसी दोषी मराठे यांनी हि कामगिरी यशस्वीरित्या पार पाडत महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट अशा २५ एकांकिकांची निवड केली आहे. निवड झालेल्या संघाची महाअंतिम फेरी १०,११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे, असून परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, प्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी हे काम पाहणार आहेत.  एकांकिका स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच कोणत्यातरी एकांकिका स्पर्धेचा “ब्रॅण्ड अॅम्बेसिडर” अशी एक नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु करण्यात आली . अटल करंडक मधून जो कलाकार विजेता आहे आणि आज तो यशस्वीरित्या या क्षेत्रात कार्यरत आहे अशा एका कलाकाराला आम्ही ‘ब्रँड अॅम्बेसिडर” चा मान देण्याचे ठरविले होते त्यानुसार सुप्रसिद्ध अभिनेता “ओंकार भोजने” याची नियुक्ती बँड अॅम्बेसिडर म्हणून अटल करंडक च्या ८ व्या वर्षासाठी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ९ व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम, निरागस विनोदीवीर “पृथ्वीक प्रताप” यांची, मागील वर्षी म्हणजेच १० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता सि के टी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि अटल करंडक आणि मल्हार करंडक मधील स्पर्धक अजिंक्य ननावारे यांची निवड करण्यात आली होती. या वर्षी सुप्रसिद्ध बिग बॉस फेम, माझ्या नवऱ्याची बायको फेम आणि अटल करंडक ची २०१८ ची स्पर्धक अभिनेत्री “रुचिरा जाधव”  ‘ब्रँड अॅम्बेसिडर” आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७० हजाराची मुख्य पारितोषिके आणि ३८ हजार रुपयांची वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतात. तसेच प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशी मिळून ४ लाखाची पारितोषिके देण्यात येतात. प्रथम पारितोषिक ०१ ;लाख रुपये प्रमाणपत्र व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, चतुर्थ पारितोषिक २५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिकअसून त्यांना १० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेला १५ हजार रुपये, तसेच वैयक्तिक गटात उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, संगीत, लाईट, लेखक आणि दिग्दर्शक, विनोदी कलाकार, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार यांनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने पनवेल मधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे, अशीही माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, मल्हार महोत्सवाच्या निमित्ताने एकांकिका स्पर्धा सुरु झाली. ती गेल्या १० वर्षात अटल करंडकच्या रूपाने राज्यस्तरीय स्पर्धा झाली. कोरोनाच्या काळात आयोजन करणारी आणि यशस्वी अशी एकमेव स्पर्धा ठरली.  कलाकारांना व्यासपीठ आणि सन्मान देण्याचे काम या स्पर्धेतून होत आहे, याचे आम्हाला आयोजक म्हणून समाधान आहे. सीकेटी महाविद्यालयाचे कला क्षेत्रात असलेले काम आणि सहभागामुळे स्पर्धा परिपूर्ण झाली असून त्याचबरोबरीने टीम अटल करंडक मेहनत घेऊन काम करत आहे. या स्पर्धेच्या नियोजनाचे नेहमीच कौतुक होत असून यशस्वीतेमुळे अटल करंडकला प्रतिष्ठा प्राप्त झाली. निल गुपचे विलास कोठारी व कल्पना कोठारी, पनवेल महापालिका, कलाकार आणि रसिकांचा नेहमीच पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला असून त्या अनुषंगाने कार्यशाळा तसेच प्रशिक्षण वर्गही यापूर्वी घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्यामनाथ पुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीद वाक्य घेऊन गेली १८ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा “मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. गेली १० वर्ष ही स्पर्धा “अटल करंडक” या नावाने राज्यस्तरीय स्वरूपात आयोजित केली जात आहे. यंदाचे ह्या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. नाटय चळवळ वृद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो, असेही त्यांनी सांगितले. ००००००

‘ई-कॅबिनेट’ संदर्भात लवकरच निर्णय घेणार-मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : मंत्रिमंडळ समन्वय राखण्यासाठी १ प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. हळूहळू पेपर कॅबिनेट बंद करून ई कॅबिनेट प्रणाली राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  प्रत्येकाला मंत्रालयात प्रवेश…

माहिती अधिकाराचा वापर अर्थातच भारतीय संविधानाची अंमलबजावणी !

रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवसात ३९५ कलमे व ९ परिशिष्ट्ये असणारी जगातील सर्वांत मोठे संविधान लिहिले आणि २६ जानेवारी १९५० पासून या देशात संविधान…

सायकल मोहिमेतून कॅन्सरविषयी जनजागृती आणि केशदान मोहीम

ठाणे : हिंदायान फाउंडेशनच्यावतीने दिल्ली – ठाणे – मुंबई – पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत.  यावर्षी या मोहिमेची थीम…

राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन

ठाणे : ऑलिम्पिकमधील पहिले पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिन 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी…

मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे शानदार यश

मुंबई : जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकुण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कास्य पदकांचा समावेश…

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी आशेचा  किरण

रमेश औताडे मुंबई : गेल्या  २९ वर्षांमध्ये ११ हजारहून  अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर ,  दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन त्यांच्या परिवर्तनासाठी आशेचा  किरण ठरलेल्या  संपर्क   या सामाजिक संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे  कौतुक  नुसी  चे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले. संपर्क संस्थेचे लोणावळ्यातील बाल ग्राम पाहून मी भारावून गेले. २९ वर्षापासून (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) SAMPARC  संपर्क   हि संस्था संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी काम करते. संपर्क चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत या भेटी दरम्यान दोन तास घालविण्याचा बहुमान मला मिळाला याचा मला आनंद आहे असे कांदळगावकर म्हणाले. संपर्क मधील पाच मुलींचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही नूसी NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) च्या माध्यमातून मदत करणार आहे. गोव्यातील प्रतिष्ठित   नुसी  मेरीटाईम अकादमी  मध्ये जी पी रेटिंग प्रशिक्षणासाठी संपर्क संस्थेच्या  पाच तरुणींची निवड केली असल्याचे कांदळगावकर यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या  शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च   नुसी  संस्था करणार असून  नोकरीची शाश्वती देखील दिली आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत.  वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे  हे चांगले उदाहरण आहे. अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000

करम फाऊंडेशन कडून गरीब,आणि विधवांना मदतीचा हात….

सलमान पठाण मुंबई : 2 जानेवरी रोजी माहीम येथे करम फाउंडेशन कडून गरीब आणि विधवा महिलांना मुफ्त राशन, गरीब मुलांना शाळेसाठी फीस, आजरी रुग्णांना औषधे व त्या साठी आर्थिक मदत , गरीब मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य व विविध योजनांचा लाभ देण्यात आला. करम फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील अधिकृत संस्था असून यांच्यामार्फत माहीम विभागातील व तसेच मुंबई उपनगरातील गरीब आणि विधवा महिलांना गेल्या चार वर्षापासून विविध स्तरावर मदत करत आहे त्यांच्याकडून गरीब मुलींचे लग्नासाठी लागणारे साहित्य आजारी रुग्णांसाठी दवाखान्यामध्ये लागणारा खर्च व त्याचबरोबर गरिबांना राशन वाटप इत्यादी प्रकारचे काम वारंवार केले जात आहे या करम फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख सय्यद यांच्यामार्फत हे काम केले जाते आत्तापर्यंत करम फाउंडेशन यांच्यामार्फत 5 हजारच्या वर कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे त्याचबरोबर याच्याकडून 15 जोडप्यांचे लग्न लावण्यास मदत करण्यात आली आहे. कोव्हिड महामारीच्या काळात यांनी 1 हजारच्या च्या जवळपास रुग्णांना ऑक्सीजान पुरवठा केलेला आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत 400 गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य व शालेय फी साठी मदत करण्यात आली आहे. करम फाउंडेशन कधीही हे बघत नाही की मदत घेणारी गरीब व्यक्ती हिंदू आहे की मुस्लिम आहे जातीय भेदभाव न करता करम फाउंडेशन मदत करते आणि पुढेही भविष्यात करत राहू असे आम्हाला करम फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद फारुख यांनी सांगितले ०००००

 ह्युमॅनिटी स्टील लाईव्हच्या मार्फत अनोखा थर्टी फर्स्ट साजरा

 गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप   कल्याण :  ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे.  सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून  प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली. ०००००