Author: bittambatami.com

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले

मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. बुधवार, २७ नोव्हेंबरपासून…

 ठाण्यातील १३०० घरांसाठी ५ हजारांहून अधिक अर्ज

 PM आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही   मुंबई – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने सुमारे ११ हजार घरे विक्रीसाठी काढण्यात आली आहेत. यामधील १५ आणि २० टक्के योजनेंतर्गत १३०० घरे होती. ठाण्यात असलेल्या  १३०० घरांना १०० टक्के प्रतिसाद असून, या घरांसाठी सुमारे पाच हजारांहून अधिक अर्ज आले होते. ही सगळी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या गटातील आहेत. मात्र, पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता या घरांची विक्री व्हावी म्हाडाकडून सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. विरार, बोळींज, शिरढोण येथे असलेली घरे दूर आहेत. मात्र, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आता ही घरे विकली जावीत म्हणून या घरांची अधिकाधिक जाहिरात केली जाणार आहे. लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. सोशल मीडियाचा यासाठी वापर केला जाणार आहे. दुसरीकडे कोकण मंडळाची २२०० घरे लॉटरीसाठी आहेत. या घरांनाही कमी प्रतिसाद आहे. निवडणुका संपल्या असून, लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत अर्जदार अपात्र ठरण्याचे प्रमाण कमी असते. कारण यात अटी-शर्ती नाहीत. त्यामुळे अर्जदाराने मुदतीत पैसे भरले नाही तरच तो अपात्र ठरतो. अशावेळी प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला प्राधान्य दिले जाते. पहिला कोण ? एका घराला चार अर्ज आले असतील तर त्यातील पहिल्या अर्जदाराला संबंधित घर दिले जाते. यात दिवस, वेळ पाहिला जातो. उदा. सोमवारी तीन लोकांनी अर्ज केला. मंगळवारी एकाने अर्ज केला तर सोमवारचा अर्ज गृहीत धरला जातो. यातही कोणी किती वाजता अर्ज केला हे पाहिले जाते. हे सगळे पाहून यामध्ये सगळ्या अर्थाने जो पहिला असेल त्याला घरासाठी प्राधान्य दिले जाईल. २५ टक्के रक्कम भरा संबंधित अर्जदाराला पात्र असल्याचे कळविले जाईल. त्याने घराचे पैसे भरल्यानंतर म्हाडाकडून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकूण घराच्या किमतीपैकी २५ टक्के रक्कम संबंधिताने भरणे अपेक्षित असते. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आता स्वीकृती पत्र देण्याची पद्धत नाही. म्हाडाकडून आता संबंधितांना पात्र ठरल्याचे मेसेज पाठविले जातात. आता कोणतीच प्रक्रिया ऑफलाइन नाही. सगळ्या प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी दलालांची मदत घेऊ नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे. 0000

‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’

 पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन   ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर भावनिक बुध्दिमत्ता महत्त्वाची आहे. सर्व परीक्षार्थींनी या परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जावे आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन मुंबई लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींसाठी नुकतेच डॉ. रवींद्र शिसवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी डॉ. शिसवे यांचे स्वागत केले. सन २००१च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले डॉ. रवींद्र शिसवे यांनी यावेळी ठाणे आणि मुंबईतून स्पर्धा परीक्षांना बसलेल्या परीक्षार्थींशी संवाद साधला.  अभ्यासाबाबत संवेदनशीलता, सकारात्मकता महत्त्वाची आहे. त्याचवेळी, समाजातील नकारात्मक लोकांपासून दूर राहणे, अभ्यासाचे योग्य पध्दतीने नियोजन करणे, त्यासाठी वेळेची आखणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. केलेल्या  अभ्यासाची पेन्सिल उजळणी करणे, विचार करण्याची पद्धत कशी विकसित करायची, महत्त्वाचे मुद्दे कसे काढायचे याच्याबद्दलही डॉ. शिसवे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, अभ्यासाच्या नोट्स काढताना शॉर्ट हॅण्ड कौशल्याचा वापर करण्याचीही सूचना त्यांनी केली. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, असेही डॉ. शिसवे म्हणाले. विविध उदाहरणे देत डॉ. शिसवे यांनी हा संवाद साधला. परीक्षार्थींच्या प्रश्नोत्तरांनी या सत्राची सांगता झाली. संस्थेचे गिरीश झेंडे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

स्वच्छ प्रतिमेच्या संजय केळकरांना मंत्रिपद द्या – राजेश गाडे

अनिल ठाणेकर ठाणे : शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत, विजयी हॅट्रिक साधणारे भाजपाचे संजय केळकर हे, स्वच्छ प्रतिमा असणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारे लोकप्रतिनिधी, अशी त्यांची ओळख असून, अशा बहुजनहित जपणाऱ्या संजय केळकर यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देत, त्यांच्या ज्येष्ठत्त्वाचा सन्मान राखण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजपाचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी केली आहे. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदारकी भूषविल्यानंतर, संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक साधून आपले निर्विवाद नेतृत्त्व सिद्ध करुन दाखविलेले आहे. माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला, भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षात जी काम करण्याची संधी मिळालीय, ती केवळ संजय केळकर यांच्यामुळेच. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा नेता, अशी सर्वमान्य ओळख असणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी, सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक अशा श्रीस्थानकाला लाभलेला आहे आणि म्हणूनच ठाणे शहरातील आंबेडकरी जनतेची अशी मागणी आहे की, ठाणे विधानसभा मतदारसंघाचे ‘हॅट्रिक’वीर अशी ओळख निर्माण झालेल्या संजय केळकर यांना, मानाचे मंत्रिपद भूषविण्याची संधी देण्यात यावी. असेही राजेश गाडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान,आमदारकीची हॅट्रिक साधून, ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात भाजपाची मुळे पूर्वीपेक्षाही अधिक घट्ट झाली असून, ठाणे महानगरपालिकेत आता कमळ फुलविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजेश गाडे यांनी यावेळी केले. गेल्या तीस वर्षांपासून राज्यात भाजपा-शिवसेना युती असूनही, ठाणे शहराचा महापौर, भारतीय जनता पक्षाच्या नशिबी नव्हता; मात्र, संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, महापालिकेवर भाजपाचाच महापौर बसेल, याबाबत आपल्या मनात कोणताही संदेह नसल्याचा आत्मविश्वास गाडे यांनी यावेळी बोलून दाखवला. संजय केळकर हे उच्चशिक्षित, संयमी आणि अठरापगड जाती-समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत नेतृत्त्व असून, त्यांचे आजोबा बॅरिस्टर  बर्वे हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक आणि सहकारी होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, बर्वे यांनी बाबासाहेबांना साथ दिल्यामुळे तत्कालीन कर्मठांनी, त्यांना वाळीतही टाकले होते. कोकणस्थ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात स्नेहभोजन आयोजित करुन, सामाजिक समतेच्या आड येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केल्याबाबत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकात बॅरिस्टर बर्वे यांचे कौतुकही केलेले आहे. अशा, खऱ्याअर्थाने पुरोगामी वारसा लाभलेल्या घराण्यातून आलेल्या संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, ठाणे शहराचा विकास, मुलभूत सुखसोयी व नागरीसमस्या चुटकीसरशी सुटतीलच, त्याचबरोबर भविष्यातील खरीखुरी ‘स्मार्टसिटी’ म्हणून नावारुपाला येण्यासाठी, संजय केळकर यांना, ठाण्यातून मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी करतानाच, यासंदर्भात आपण एक ‘स्वाक्षरी-मोहीम’ राबविणार असल्याचेदेखील भाजपाचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी, शेवटी स्पष्ट केले आहे. 000

मुंबई पोर्टच्या रुग्णालयात आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन साजरा

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  २५  नोव्हेंबर २०२४ रोजी  वडाळा येथील मुंबई पोर्ट  प्राधिकरण रुग्णालयाच्या सॅनिटरी सेक्शनमध्ये ” आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मुलन दिन “.साजरा करण्यात आला अशी माहिती…

पुरुषांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी नसबंदी पंधरवडा – रोहन घुगे

ठाणे : कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा (Vasectomy Forthnight २०२४) राबविण्यात येत आहे.…

 ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ठाण्यात शुक्रवारी व्याख्यान

 विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन   ठाणे : महायुतीच्या विजयासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार, निवडणूक अभ्यासक भाऊ तोरसेकर यांचे व्याख्याने ठाण्यात शुक्रवारी होणार आहे. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने नौपाड्यातील हितवर्धिनी सभेच्या मैदानावर शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या विजयाची खात्री सर्वप्रथम दिली होती. या पार्श्वभूमीवर `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर भाऊ तोरसेकर यांचे शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाला नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे.

 ठाणे शहरातील बोगस शिक्षणसंस्थांवर कारवाईसाठी पोलिस आयुक्तांना साकडे

भाजपा महिला मोर्चा मंडलाध्यक्षा वृषाली वाघुले यांचे निवेदन   ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या बोगस शिक्षणसंस्थांकडून सामान्य व गरीब कुटुंबातील तरुण व तरुणींची फसवणूक होत असल्याप्रकरणी चौकशी करुन संबंधित शिक्षणसंस्थांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा मंडलाध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ठाणे रेल्वे स्टेशन, राम मारुती रोड, नौपाडा परिसरासह शहरातील महत्वाच्या गजबलेल्या भागात काही बोगस शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध विद्यापीठातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचे शुल्क कर्जरुपाने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थीनींची कागदपत्रे मिळवून त्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या तरुण-तरुणींची भविष्यातही फसवणूक होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप या निवेदनात म्हटले आहे. ठाणे शहरातील राम मारुती रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पहिल्या मजल्यावरील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटबाबत तक्रारी आल्यानंतर भाजपा व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संबंधित संचालकांना जाब विचारला. त्यावेळी तेथे जनरल नर्सिंग कोर्सचे शिक्षण देण्याच्या नावाखाली सुरू असलेले फसवणुकीचे रॅकेट महिनाभरापूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फसवणूक झालेल्या ८ मुलींना १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम मिळवून दिली. या वेळी संबंधित तरुण-तरुणींची महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे, मूळ आधारकार्ड व इतर कागदपत्रे ठेवून शैक्षणिक शुल्काची मागणी केली जात असल्याचेही आढळले होते. `सीईडीपी’ संस्थेप्रमाणेच ठाणे शहरात अनेक बनावट शिक्षणसंस्थांमध्ये दहावी नापास व अल्पशिक्षित तरुण-तरुणींनाही चांगल्या अभ्यासक्रमानंतर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना टार्गेट केले जाते. त्यातून हजारो रुपयांचे शैक्षणिक शुल्क वसूल करुन शेकडो जणांची फसवणूक होत आहे. तरी या प्रकाराची दखल घेऊन आपण ठाणे शहरातील काही संशयास्पद शिक्षण संस्थांकडील मान्यता व इतर कागदपत्रांची तपासणी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरूत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आहे. त्यामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२.०० वाजल्यापासून…

संपूर्ण कोकणावर आता महायुतीचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध -रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग : राज्यातल्या महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक लोक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या शिवाय राज्यात एक विचाराचे सरकार यावे हे जनतेने ठरवल्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला आणि महायुतीला घवघवीत…