Author: bittambatami.com

कंत्राटी कामगार आणि वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार- संजय केळकर

कंत्राटी कामगार आणि वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार- संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे आयुक्त…

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक आडतदारांबरोबर मूळ शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे – अण्णा बनसोडे मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पुणे मार्केट यार्ड येथील फळ विभागाऐवजी भाजीपाला विभागात डमी आडत्यांमार्फत लिंबू विक्री सुरू…

कल्याण  आगीत  १२ वाहने खाक

कल्याण  आगीत १२ वाहने खाक कल्याण: कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागातील एका उच्चभ्रू इमारतीच्या तळमजल्याला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत १२ वाहने जळून खाक झाली. यामध्ये मोटार, दुचाकी आणि सायकलींचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आग नक्की कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. आगीत तीन मोटारी, सहा दुचाकी, तीन सायकली जळून खाक झाल्या. पहाटेच्या सुमारास इमारतीच्या परिसरात धूर आणि टायर जळल्याचा वास सर्वदूर पसरला. दोन दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेत मानपाडा रस्त्यावरील सागाव भागात चेरानगरमध्ये रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंटच्या तळमजल्याला पहाटे चारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत रहिवाशांच्या तळमजल्याला उभ्या केलेल्या एकूण २९ दुचाकी, मोटारी जळून खाक झाल्या. यावेळी घरातून बाहेर पडताना आगीची झळ लागून पाच रहिवासी जखमी झाले होते.

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसी टीव्ही कॅमेरा प्रकल्प’ हाती घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल १११ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बस स्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये; तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७,०३५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक हालचालीवर सतत नजर राहणार आहे, असे सरनाईक म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी इ-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) या संस्थेकडे सोपवली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी एक वर्ष निश्चित केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (यूएटी) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येईल. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालये सुरक्षित होतील. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

अंत भला तो सब भला…

अंत भला तो सब भला… शेवट्च्या मॅचमध्ये नेपाळचा पहिला विजय वर्ल्डकप विजय स्कॉटलंडचा केला पराभव वाढदिवशी गुलशन झाने ठोकला विजयी चौकार मुंबईत :  टी२० क्रिकेट वर्ल्डकपच्या आपल्या शेवटच्या मॅचमधये मुंबईत रंगलेल्या सामन्यात नेपाळने…

हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी 

हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देत छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्याअसल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे सपकाळ यांनी आज सांगितले. सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्यास समाजात तेढ निर्माण न होता ऐक्याचा संदेश जावा, हा आपल्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा गाभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय असून ते आपले आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सपकाळ यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेत ५७ हजार पदे रिक्त

मुंबई महापालिकेत ५७ हजार पदे रिक्त मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील तब्बल ५७ हजार पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कामगार संघटनांव्दारे केली जात आहे.  राज्यात  लवकरच ७० हजार सरकारी पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या भरतीसहीत महापालिकेतीलही हा अनुषेश भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.  मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे महापालिकेतही नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या पत्रात कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे – बापेरकर यांनी म्हटले आहे की, मुंबई व मुंबई उपनगरातील जनतेला उत्तम नागरी सेवा पुरविता याव्यात यासाठी पालिकेचे १२९ विभाग व खाती कार्यरत आहेत. ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये व ५ संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठीची रुग्णालये, प्रसुतिगृहे यामधून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. हे सर्व विभाग आणि रुग्णालये योग्य प्रकारे चालविली जावीत यासाठी पालिकेच्या रचना व कार्यपध्दती विभागाने सखोल अभ्यास करून, कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या १ लाख ४५ हजार १११ अशी निश्चित केली आहे. तथापि, सध्या ही कर्मचारी संख्या सेवानिवृत्ती, मृत व इतर कारणांमुळे कमी झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेत जेमतेम ९० हजाराच्या आसपास कामगार – कर्मचारी आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येत आहे. रिक्त पदांमुळे अत्यावश्यक सेवेतील काम ठप्प होऊ नये म्हणून कंत्राटी कर्मचारी भरती केली जात आहे. कोणेतही कायमस्वरुपी व सततचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेणे उचित नसताना पालिका मागील अनेक वर्षांपासून रिक्त शेडयुल्ड पदे न भरता कंत्राटी भरती करत आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कामगार भरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, मुंंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात येतील. असे आश्वासन पालिका प्रशासनाच्यावतीने वारंवार दिले जाते. मात्र रुग्णालयातील अत्यावश्यक रिक्त पदे पुन्हा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याकरीता नुकतीच जाहिरातही देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी भरती बंद करावी आणि पदभरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागील अनेक वर्षांपासून तुटपुंजा पगारामध्ये कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, शासनाच्या भरती धोरणाच्या अधीन राहून कायम करावे व उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रान मुंबईच्या रस्त्यावर धावले…

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रान मुंबईच्या रस्त्यावर धावले… मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सुरक्षेचे सारे संकेत धुडकावत मंगळवारी १७ फेब्रुवारी  रोजी मुंबईच्या रस्त्यावर जॉगिंग केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईच्या रस्त्यावर धावतांना दिसताच मुंबईकरांनी अचंबित होत त्यांचे फोटो…

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्रालयातील मिलिंद शेणॉयांची बदली

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्रालयातील मिलिंद शेणॉयांची बदली अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दिवशी त्यांचा विरोध असणाऱ्या फाईलींना दिली होती मंजुरी शासकीय दुखवटा असताना राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना दिला अल्पसंख्यांक दर्जा…