आधारचा आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार
मुंबई : लालबाग येथील आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्ट गेली १५ वर्षे पालघर, जवार, विक्रमगड तसेच कर्जत येथील आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रिडा तसेच जीवनावश्यक अशा अनेक स्वरुपात मदत करत…
मुंबई : लालबाग येथील आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्ट गेली १५ वर्षे पालघर, जवार, विक्रमगड तसेच कर्जत येथील आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रिडा तसेच जीवनावश्यक अशा अनेक स्वरुपात मदत करत…
मिरा-भाईंदर जागतिक मेंदू दिनानिमित्त न्यूरोलॉजी तज्ज्ञांनी नागरिकांना मेंदूच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, भारतात ३ कोटींहून अधिक नागरिक न्यूरोलॉजिकल विकारांनी प्रभावित असून देशाच्या एकूण आजारांच्या भारापैकी सुमारे १० टक्के भार या आजारांचा आहे. वाढता ताण, वायू प्रदूषण, बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि वाढते वय यामुळे स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. पवन पै यांनी सांगितले की, स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अचानक हात-पायात अशक्तपणा, बोलण्यात अडचण, तीव्र किंवा वेगळी डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा दृष्टीत बदल ही मेंदूची गंभीर इशारे असू शकतात. याशिवाय, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर), मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मज्जातंतूंचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांची सुरुवात अनेकदा अत्यंत सौम्य लक्षणांनी होते. वारंवार डोकेदुखी, विस्मरण, हात-पायात मुंग्या येणे, चालताना तोल जाणे, हात थरथरणे, झटके येणे किंवा बोलण्यात अचानक अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. जनजागृती, वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे लाखो नागरिकांना अपंगत्वापासून वाचवता येईल. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञांकडून उपचार सुरू केल्यास अनेक मेंदूविकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि रुग्णाला दीर्घकाळ निरोगी व स्वावलंबी जीवन जगणे शक्य होते. यामुळे आरोग्यावरील खर्च कमी होईल, देशाची उत्पादकता वाढेल आणि भारत अधिक निरोगी व सक्षम राष्ट्र बनण्यास मदत होईल.
अन्न,नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी मिरा भाईंदर : मिरा रोड परिसरातील नागरिकांना रेशनसंदर्भातील कामांसाठी होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सूरू करण्यात यावे अशी मागणी आमदार नरेंद्र मेहता यांनी १३ मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून एक वचनपूर्ती पूर्ण झाली आहे.राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शासन निर्णय जारी केला आहे. मिरा-भाईंदर शहरासाठी मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप (रेशन) कार्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय २१ जुलै २०२६ रोजी अन्न नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मिरा-भाईंदरमधील ३९ अधिकृत रेशन दुकाने आणि अतिरिक्त ३ दुकाने, अशी एकूण ४२ दुकाने नव्या मिरा रोड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना किरकोळ दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, पत्ता बदल, तक्रारी तसेच इतर शिधावाटपाशी संबंधित कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. त्यामुळे शिधावाटप संबंधित नागरिकांना असणाऱ्या अडचणी दूर होणार असून एक प्रकारचा मोठा दिलासा मिळाला आहे. मिरारोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मिरा-भाईंदरमधील हजारो रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक ठरणार असून, शिधावाटप यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मीरारोड शिधावाटप कार्यालयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने आमदार नरेंद्र मेहता यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.
अवघ्या ४ तासांत उभारला १६० टनांचा भव्य गर्डर लाँचर मुंबई : मुंबई–ठाणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)…
आंतरविद्यालयीन क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए.…
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक अशोक गायकवाड ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून, या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा क्रीडा परिषदेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्पर्धा सर्व दृष्टीने यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी व क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. तसेच सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती निलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, जिल्हा खो-खो संघटनेचे प्रतिनिधी विकास कोळी व कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनिल ठाणेकर ठाणे, जनमत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटरविरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेक अप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी १० वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर, बाळकूम येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती वेक अप ठाणेकर या संस्थेच्या वतीने देण्यात आली. बाळकूम येथील ५३ एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज १२ दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास ९० डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. युरोप अमेरिकेतून हद्दपार केलेला हा प्रकल्प ठाण्यात आणण्यामागे नक्की कारण काय आहे, असा सवाल करून या प्रकल्पाविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतला आहे, असे वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, हिमानी वर्मा, जतीन कोठारे, गुरासिस बुमरा, लावण्या पाटील यांनी सांगितले. शनिवारी सकाळी १०.०० वाजता कल्पतरू, बाळकूम येथील डेटा सेंटरबाहेर परिसरातील नागरिक निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात किमान १ हजार नागरिक सहभागी होतील, असे वेक अप ठाणेकरच्या वतीने सांगण्यात आले. ००००००००००० ००००००००