Author: bittambatami.com

डोंबिवलीत बेसमेंट पार्किंगमध्ये आग

डोंबिवलीत बेसमेंट पार्किंगमध्ये आग २९ दुचाकी जळून खाक  पाच जण जखमी डोंबिवली : डोंबिवली पूर्वेयेथील चेडा नगरातील रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे सुमारे सव्वाचार वाजता अचानक भयानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला. यामुळे झोपेत असलेले रहिवासी घाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. ही आग शॉर्ट सर्किट की इतर कोणत्या कारणानी लागली याचा तपास सुरु आहे. पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आग विझवल्यानंतर घटनास्थळाची कसून पाहणी केली. पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा मुंबई: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी मुंबईकर वापरत असलेले युटीएस ॲप आता बंद होणार आहे. येत्या १ मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे. सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे २८ फेब्रुवारीनंतर सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने युटीएस ॲप २७ डिसेंबर २०१४ मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आला. मुंबई लोकलचं तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. पण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना रेलवन या ॲप RailOne कडे वळावे लागणार आहे. एक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता १ मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै २०२५ मध्ये RailOne ची सुरुवात केली होती. 

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक मुंबई : मुलुंड येथे मेट्रोब्रिजचा भाग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने एक विशेष पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो-४ मार्गिकेची सखोल तपासणी करणार आहे.  या पथकाचे नेतृत्व एमएमआरडीएचे संचालक बसवराज एम करणार असून त्यांच्या सोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करणार आहे. त्यांच्या सोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन ९ आणि ५ चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे दहा ते बारा अधिकारी देखील असणार आहे. दरम्यान, आज पासून पुढील 3 ते 4 दिवस किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत हे पथक अहोरात्र काम करणार आहे. त्यांच्या तपासणीचे, साईट विझिटचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. या पथकाचे मुख्य काम सखोल बारकाईने तपासणी करून काल झालेला अपघात पुन्हा होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आणि ज्या ठिकाणी काही चुकीचे अथवा नियमांचे उल्लंघन करून किंवा धोकादायक काम सुरू असेल तिथे ते थांबवणे आणि योग्य रित्या काम सुरू करून घेणे हे असेल. अशातच, तपासणीच्या वेळी नुकत्याच झालेल्या अपघातासारखे स्लैब, स्लैबचे तुकडे, बांधकाम साहित्य, सिमेंटचे भाग या आणि अश्या इतर गोष्टी धोकादायक स्थितीत दिसून आल्यास लगेच कारवाई करणे आणि काढून टाकणे, हे देखील या पथकाचे मुख्य काम असेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख एक रिपोर्ट बनवून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार, या रिपोर्ट मध्ये कुठे कुठे धोकादायक स्थितीत गोष्टी आढळल्या, त्यावर काय कारवाई केली, मेट्रोच्या बांधकामात तपासणीवेळी काय काय दिसून आले, हे सर्व रिपोर्टमध्ये द्यावे लागणार आहे.

राज्यभरात एटीएसकडून छापे

राज्यभरात एटीएसकडून छापे एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २१ ठिकाणी धाडी  अनेकजणांची चौकशी मुंबई: एन महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात तब्बल २१ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने राज्यभर एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु झाले. या…

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा दगडफेकीत एकमेकांची डोकी फोडली पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यभर भाजपाने जोरदार…

इशान किशनचे तांडव, पाकिस्तान भस्मसात

इशान किशनचे तांडव, पाकिस्तान भस्मसात टीम इंडियाची ‘सुपर ८’मध्ये धडक कोलंबो- महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इशान किशनने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टीवर अक्षरशः तांडव करत धावांचा ‘अग्निवर्षाव’ केला आणि पाकिस्तानला भस्मसात केलं. इशांतच्या बॅटीतून उसळणाऱ्या अग्नीलोळाला थांबविण्याचे धाडस पाकिस्तानच्या…

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात चिंचवली : वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र येथे ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा…

राज्यशास्त्राच्या जेन झी विद्यार्थ्यांनी केलं “पॉलिटिका २०२६” या उपक्रमाचे आयोजन

राज्यशास्त्राच्या जेन झी विद्यार्थ्यांनी केलं “पॉलिटिका २०२६” या उपक्रमाचे आयोजन मिरा -भाईंदर : अभिनव महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पॉलिटिका २०२६” हा उपक्रम विद्यार्थी शिक्षकांनी उत्साहात साजरा केला. विभागाने “आम्ही…

क्लस्टर प्लॅन रद्द करणे आणि नवीन विकास आराखडा

क्लस्टर प्लॅन रद्द करणे आणि नवीन विकास आराखडा 18 तारखेची पहिली महासभा वादळी होणार मिरा – भाईंदर मिरा -भाईंदर शहरात राबविण्यात येणारा क्लस्टर प्लॅन रद्द करण्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा…

ठाण्यातील मालवणी महोत्सवात ‘डबलबारी’ भजनाची रंगत

ठाण्यातील मालवणी महोत्सवात ‘डबलबारी’ भजनाची रंगत बुवा संतोष जोईल विरुद्ध श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगला सुरेल सामना अनिल ठाणेकर ठाणे,शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक…