Author: bittambatami.com

मुंबईत पाणीबाणी ; धरणांनी तळ गाठला

मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने एकुण सात पैकी पाच जलाशयांनी तळ गाठला असून दोन जलाशयांमध्ये…

सिक्कीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; महाराष्ट्रातील २८ पर्यटक अडकले

आसाम : सिक्कीम येथे ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून मुसळधार पावसामुळे देशभरातली सुमारे २००० पर्यंटक पुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील २८ पर्यंटकांचा समावेश आहे.   या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी

नाशिक : लोकसभेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतरही भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस संपता संपत नाहीय. नाशिक शिक्षक मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने उभी ठाकली असल्यामुळे…

छगन भुजबळ बंडाच्या तयारीत

स्वाती घोसाळकर  मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटात सारखे डावलण्यात येत असल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ बंडाच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सुत्र आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी  समाजाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करता यावे…

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात एक्सप्रेसची मालगाडीला धडक

१५ प्रवाशांचा मृत्यू, शेकडो जखमी  बंगाल : पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेसने  मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत .जखमींना…

अथक चालणे हाच मुक्काम !

विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन प्रज्ञा जांभेकर मुंबई : शिक्षक-प्राध्यापक, लेखक-समीक्षक, पत्रकार-संपादक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ता अशी बहुआयामी ओळख असलेले विनय हर्डीकर 24 जून 2024 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत.…

मुंबई रत्न पुरस्कार कामगार नेते मारुती विश्वासराव यांना बहाल

मुंबई : दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रविवारी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार  क्षेत्रातील मुंबई रत्न पुरस्कार, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना बहाल करण्यात आला. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय  सभागृहात  १६ जून २०२४ रोजी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार  क्षेत्रातील मुंबई रत्न पुरस्कार,  ज्येष्ठ संपादक डॉ.  सुकृत खांडेकर यांच्या हस्ते, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना बहाल करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार साक्षी नाईक, दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधर कदम, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत, शशिकांत सावंत, उद्योजक डॉ. नानजीभाई ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास अनिल ठाणेकर   ठाणे : लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती. मात्र कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून, कोकणाने त्यांनाच तडीपार केले. कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या. आता कोकण पदवीधर निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आमदार निरंजन डावखरे यांनी १२ वर्षांत पदवीधरांबरोबरच विविध विकासकामे केली. त्याचबरोबर विद्यार्थीभिमुख भूमिका घेऊन विविध प्रश्न सोडविले. विधिमंडळातही ते सतत प्रश्न मांडण्यात आघाडीवर आहेत, असे मत व्यक्त करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा निरंजन डावखरें यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तर आमदार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला. लोकसभेनंतर होणारी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे, असे या मेळाव्यात नमूद करून महायुतीच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहता कार्य करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कोकणातील कार्यकर्त्यांच्या ताकदीने निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीच्या मुंबईतील दोन, कोकण आणि नाशिकमध्ये भाजपासह महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले असले, तरी राज्यात महायुतीला लक्षणीय मते मिळाली. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाली. आता या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कामे जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच लोकसभा निवडणुकीत काही एनजीओंनीही महाविकास आघाडीच्या साह्याने नरेटिव्ह निर्माण केले. मोदी द्वेषाने पछाडलेल्या काही एनजीओंमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले आहेत, असा आरोप करुन आमदार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा आज सायंकाळी पार पडला. ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, हेमंत सवरा, आमदार मंदाताई म्हात्रे, रमेश पाटील, प्रताप सरनाईक, उमाताई खापरे, गीता जैन, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रशांत ठाकूर, मनिषा कायंदे, माजी खासदार आनंद परांजपे, राजेंद्र गावित, माजी आमदार रविंद्र फाटक, संदीप नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव, मनसेचे पदाधिकारी अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आरपीआयचे भास्कर वाघमारे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे संकल्पपत्र असलेल्या `व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ००००

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू

अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार…   मुंबई : ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.…

वंचितांचा नव्हे हा तर संचिताचा रंगमंच! – विजयराज बोधनकर

ठाणे : ठाणे शहरातील लोकवस्तीतील मुले वंचित नसून भाग्यवान आहेत कारण त्यांना व्यक्त होण्यास त्यांचा स्वतःचा अवकाश मिळाला आहे. गरिबीमुळे कच न खाता कष्ट करत आलेल्या संधीचे सोने करण्याची उर्जा त्यांना इथे सापडते आहे. त्यामुळे हा वंचितांचा नव्हे संचिताचा रंगमंच आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी विजयराज बोधनकर यांनी वंचितांच्या रंगमंचावरील मुलांची रंगतदार कामगिरी बघून गौरवोद्गार काढले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे  काशिनाथ घाणेकर मिनीथिएटरमध्ये आयोजित वंचितांचा रंगमंचाच्या दशकपूर्ती सोहोळ्यात ठाण्यातील विविध वस्तीतील युवांच्या, उल्हासात पार पडलेल्या युवा नाट्यजल्लोष मध्ये ते बोलत होते. वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस वंदन करून, साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीवर्षा निमित्त महाराष्ट्रात चालू असलेल्या साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत नाट्यजल्लोषचे यंदा दहावे पर्व सादर झाले. या वेळेस मान्यवरांनी मुलांचे कौतुक करत त्यांना अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. नाट्यप्रशिक्षण शिबिर घेणाऱ्या थिएटर कोलाज च्या सुप्रसिद्ध प्रशिक्षक पल्लवी वाघ – केळकर मुलांच्या प्रयत्नांची प्रशंसा करुन म्हणाल्या की, इथे जगण्यातच संघर्ष आहे त्यामुळे खरे नाटक सापडते आणि मुलांच्या कलेला कसलीही भिंत नसते, भेद नसतो आणि मुलांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या वेळेस ‘दीवार म्हणजेच भिंत’ या विषयाच्या अनेक पैलूंवर आधारित नाटिका सादर झाल्या. डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ‘पाडू चलारे भिंत ही मध्ये आड येणारी’ हे गीत सादर करून थीमचं महत्व अधोरेखित केलं. ठाणे शहरातील विविध वस्तीतील युवांनी एकत्र येत ‘आधार’ ही नाटिका सादर केली. वेगवेगळ्या भिंती कशा दुःखितांच्या आधार बनतात हे नाटिकेतून प्रभावीपणे सादर केलं. अंबिका नगर गटाने ‘ ढ ची गोष्ट’ या नाटिकेत विद्यार्थी हुशार किंवा ढ असे नसतात. कुणी अभ्यासात तर कुणी खेळात तर कुणी कलेत हुशार असतात व अन्य कशात तरी ढ असतात. मित्रांनी एकमेकांना मदत करुन पाठबळ दिलं तर हुशार आणि ढ ही दीवार पाडली जाईल व ढ समजले जाणारे विद्यार्थी सुद्धा पास होतील हे विनोदी अंगाने छान सादर केलं. घणसोली गटाने ‘हे जीवन सुंदर आहे’ या नाटकात खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलीला अनेक अपमानास्पद वागणुकींना कसं सामोरं जावं लागतं व अशा वेळी नैराश्य येऊन आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत असताना तिची मैत्रीण तिला या विचारापासून कशी दूर नेते आणि तिच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करते, हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवलं. खारटन रोड गटाने ‘ आवाज उठाओ’ या नाटकात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धारिष्ट दाखवलं तर श्रीमंत आणि गरीब यातील भिंत पाडायला वेळ लागणार नाही हे उत्तम प्रकारे सादर केले. याच बरोबर एनॉक कोलियार याने निर्माण केलेली ‘मिरास’ आणि मयुर बने याने बनवलेली ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ या सुंदर शॉर्टफिल्म्स दाखवल्या गेल्या. वैष्णवी कारंडे आणि करीना साऊद यांनी कोळी नृत्य पेश केलं. राबोडी मधील अल्फिया, फलक, मुस्कान, शिफा या मुलींनी मुशायरा पेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एपिकॉन कंपनीचे चेअरमन जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मीनल उत्तुरकरांनी तर आभार प्रदर्शन हर्षलता कदम यांनी केले. वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि एकलव्य कार्यकर्ता दर्शन पडवळ यांनी सुत्र संचालन केलं. लोकवस्तीतील युवांच्या नाटिका बघून त्यांचे कौतुक करण्यासाठी लघुपटकार डॉ. संतोष पाठारे, नाट्यजल्लोष ची आयोजक, प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, यू ट्युबर रवींद्र पोखरकर, जगदीश खैरालिया, सीमा साळुंखे, मयूरेश भडसावळे, टॅगचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना सहाय्यक म्हणून सुनीता फडके, सुयश पुरोहित, विश्वनाथ चांदोरकर,नीलिमा सबनीस यांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लतिका सु. मो. , सुनिल दिवेकर, अजय भोसले, किशन सिंग बेदी, निलेश दंत आदींनी मेहनत घेतली. लोकवस्तीतील एकलव्य युवा दीपक, अक्षता, एंजेल, माही, मयुर, अनमोल, स्नेहा, साक्षी, प्रसन्न यांनी छान अभिनय केला. सृष्टी, ऋतुजा, कार्तिक, अथर्व, साक्षी, यशस्वी, हेमाली यांनी प्रभावी अभिनय करून प्रेक्षकांना हसवलं. नेहा, श्रद्धा, तेजस्वी, राधिका, सायली, सानिका, कार्तिकी, अस्मिता यांनी नाटिकेत सहभाग घेतला. किशन, अश्रफीय, एंजेल, रुद्र, टिया, निखिल, निकिता, दिव्या, प्रमिता यांनी छान कामे केली. 0000