Author: bittambatami.com

६७२ नागरिकांनी घेतला दाखल्यांचा लाभ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबीरात ६७२ नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे ६७२ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे,  मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसीन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बने, सुनिल पाटील, पल्लवी गिध, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज चेऊलकर, संदीप शिंदे, नासीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे 1000 हजार विद्यार्थ्यांना वह्यांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम   ठाणे : आई-बा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट मिळाली आहे. ज्युनियर…

कोकणातून मी शिवसेना संपवली- नारायण राणे

रत्नागिरी- कोकणातून महायुतीला तडीपार करा म्हणणाऱ्या शिवसेनेला मी कोकणातून संपवले असेअसे धक्कादायक विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे…

वाचक मनोगत

रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे रस्त्यावर बाराही महिने खाद्यपदार्थ विकले जातात कारण खाणारांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे अशीच अवस्था असते .उघड्या…

मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज

विशेष श्याम ठाणेदार शिक्षणाची भाषा कोणती असावी यावर आपल्याकडे गेली अनेक वर्ष विचारमंथन सुरू आहे. केवळ समाजातच नव्हे तर घराघरांत यावर चर्चा सुरू आहे. चर्चा कसली वाद विवादच म्हणा कारण…

दूरदृष्टी असणारे रामोजी

श्रद्धांजली स्वाती पेशवे दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि धडाडी असेल तर सामान्य घरातील माणूसही किती मोठी मजल मारु शकतो, हे रामोजी राव यांच्या जीवनचरित्रातून समजते. जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलेल्या रामोजी फिल्म…

सरसंघचालक भागवत आणि योगींच्या बंद दाराआड चर्चेमुळे टेन्शन वाढले

नवी दिल्ली : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बंद दाराआड चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले आहे. भागवत आणि योगी यांच्या या भेटीमुळे राजकीय टेन्शन मात्र…

भाजपा ५०० पार गेला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही

अमोल मिटकरींचा घरचा आहेर मुंबई : भाजपाचे आमदार टी. राजा यांनी भिवंडीत, ४०० पार झालो असतो, तर देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले असते, असे विधान केले आहे. या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाला घरचा…

पावसाची दांडी आणि घशाला कोरड

मुंबई: मॉन्सूनने मुंबई, ठाणेसह महाराष्टात दमदार हजेरी लावली खरी पण आतामात्र पावसाने दांडी मारली असून सध्यातरी मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये आजही काहीच प्रगती झालेली नाही. विशेषता धरण क्षेत्रात पावूस पडला नसल्याने मुंबई आणि ठाणेकरांच्या…