Author: bittambatami.com

मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे- लक्ष्मण हाके

जालना : मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते  लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण…

लोकसभा अध्यक्षपदाची तिढा कायम; चंद्राबाबूंच्या टीडीपीची मोर्चेबांधणी

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होत असून अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे.…

चंद्राबाबू, नितीश कुमारांचा पक्ष मोदी फोडणार- राऊत

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदी भाजपाचा खासदार जर निवडून आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज केलाय. केलाय.…

विधानसभेच्या तयारीला लागा – एकनाथ शिंदे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १९ जून रोजी होणाऱ्या…

वायकरांच्या वादग्रस्त विजयावर राहुल गांधीचाही हल्लाबोल

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी मिळविलेल्या ४८ मतांच्या वादग्रस्त विजयावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला आहे. व्टिटरचे मालक एलॉन मस्क यांनीही ईव्हिएम…

भाजपा आमदाराचा पुन्हा हिंदू राष्ट्राचा नारा

भिवंडी : भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा नारा दिला. भाजपाला लोकसभेत चारशेपारचा विजय मिळाला असता तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते असेही टी. राज सिंह…

वायकरांच्या विजयात मोबाईलचा झोल ?

 ईव्हीएम डेटा ऑपरेटर गुरव, वायकरांचा मेव्हणा आणि निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्या फोन कॉलचे गौडबंगाल कायम मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या विजयात…

खासदारकीच्या कारकि‍र्दीत भिवंडीत १० वर्षांत एकही दंगल नाही

कपिल पाटील यांचे चोख प्रत्युत्तर, विधानसभा निवडणुकीत एकत्र मतदानासाठी आरोप   भिवंडी : भिवंडीतील एकही मुस्लिम नागरिक माझ्यावर दंगल घडविण्याचा आरोप करणार नाही. खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत भिवंडी शहरात एकही दंगल झालेली नसून, हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. दंगलीबाबत विधाने करीत मुस्लिमांची दिशाभूल करून लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकत्र मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता व्यक्त करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. तसेच हिंदू धर्म सभा व संत संमेलनाचा कार्यक्रम हा सकल हिंदू समाजाचा असून, नवीननवीन लोकप्रतिनिधी झालेल्या लोकप्रतिनिधींना विजय पचनी पडत नाही. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला लगावला. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे शनिवारी सायंकाळी संत संमेलन व हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. त्याला तेलंगणचे आमदार टी. राजा सिंह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे कपिल पाटील फौंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले असून, भिवंडीत दंगली घडविण्याचा डाव आहे, असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला होता. या आरोपांना कपिल पाटील यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. या संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाने केले आहे. परंतु, कपिल पाटील फौंडेशनला ही संधी मिळाली असती, तर भाग्यवान समजलो असतो, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. यापूर्वी २०१५ मध्ये कामतघर येथील वऱ्हाळदेवी तलावालगत टी. राजा सिंह यांची सभा झाली होती. त्यानंतर भिवंडीत दंगल घडलेली नव्हती. गेल्या दहा वर्षांत हिंदू मुस्लिमांबरोबरच सर्व समाज व जातीबांधव गुण्यागोविंदांने राहत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मुस्लिमांचे एकत्रित मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता श्री. कपिल पाटील यांनी व्यक्त केली. हिंदू धर्माच्या जागृतीबाबत आयोजित केलेल्या संमेलनाला विरोध केला जात आहे. टी. राजा सिंह यांची सभा घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला. अशा प्रकारे संत-महंतांचा अपमान शिवसेना उद्धव ठाकरे गट सहन करणार आहे का. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिमानाने हिंदूत्व सोडले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेच्या भिवंडीतील अनुयायांना हा प्रकार मान्य आहे का, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणार का, असे आव्हान माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. अनधिकृत बांधकामांबाबत वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला. सुरेश म्हात्रे यांनी स्वत: आपल्या बांधकामांसाठी स्थगिती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या बांधकामांना माझे संरक्षण होते का? भिवंडी अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करावयाची असल्यास, स्वतचा जेसीबी घेऊन स्वत:ची अनधिकृत बांधकामे पाडावीत, असे आव्हान कपिल पाटील यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवे धोरण आणल्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण खासदार झाल्यावर पहिल्याच दिवशी या शेतकऱ्यांच्या मुलांचे उत्पन्न बंद करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका श्री. कपिल पाटील यांनी केली. सुरेश म्हात्रे यांच्याकडून केल्या जाणारे निराधार आरोप सहन केले जाणार नाहीत. याप्रकरणी कायदेशीर दावा दाखल केला जाईल, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला. भिवंडीत पोलिसाला मारहाणीकडे केले दुर्लक्ष लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी शहरात दिवसांपूर्वी पोलिसाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी सुरेश म्हात्रे कोठे होते. त्यावेळी ते पुढे का आले नाहीत, असा सवाल कपिल पाटील यांनी केला.

‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही – सुनिल तटकरे

रोहा : राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही  कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला. रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि  त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली… मी तिला माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे असेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे असा पक्का शब्द सुनिल तटकरे यांनी रोहेकरांना दिला. सर्वात उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली. ४० वर्ष जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. इथल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी मला साथ दिली आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण सुरू असताना विकासाच्या मुद्यावर इथल्या जनतेने निवडणूक ताब्यात घेत हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला आहे. राज्य सरकारचे सहकार्य मिळणार आहेच शिवाय केंद्राचेही  आपला खासदार असल्याने निर्विवाद सहकार्य मिळणार आहे असा विश्वास बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी रोहेकरांना दिला. तटकरेसाहेब हे आपल्या घरातलीच व्यक्ती समजून तुम्ही मतदारसंघात उतरलात आणि आपण घेतलेल्या परिश्रमाला जनतेने प्रतिसाद चांगला दिला. महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल अदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आभार दौरा दिनांक १४ जूनपासून सुरू केला असून दुसर्‍या दिवशी रोहा येथे महायुतीच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, नितीन तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कुणबी समाज नेते सुनिल मगर, कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नेत्या दिपिका चिपळूणकर आणि महायुतीचे नेते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रवेशोत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा आज (दि. १५ जून २०२४ ) सुरू झाले असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांनी शाळा भेट दिली आहे. भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शाळा वैजोळा, केंद्र शिवनगर येथे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, गोड पदार्थ, पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिल्या दिवशी जसे सर्वांनी हजेरी लावली तसेच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत उपस्थित रहावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले. आज प्रवेशोत्सव निमित्ताने शासकीय शाळेत गावातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहात ही खरी आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे यासाठी पालकांनी विशेष सहकार्य करावे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे. आहार आणि आरोग्य उत्तम राहिल्यास शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना लागेल. जंक फूड न खाता विद्यार्थ्यांनी उत्तम आहार घ्यावा. शाळा छोटी असून देखील शाळेतील शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६० विद्यार्थीं या शाळेत शिक्षण घेत आहेत. आज शाळा सुरू होत असून शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यीं, पालक, शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी यांनी केले. प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळा भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल अर्चना पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी संजय असवले, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुऱ्हाडे, शाळेचे शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील, पालक, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.