Author: bittambatami.com

विजयासाठी मेहनत घेणाऱ्या कट्टर मुस्लिम कार्यकर्ऱ्यांचा खासदार नरेश म्हस्के यांनी केला सत्कार 

ठाणे : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करण्याचा फतवा मौलवींनी काढला होता. तर राबोडी विभागातील कट्टर शिवसैनिक असलेल्या डॉ. असगर मुकादम यांना धमक्या दिल्या गेल्या. मात्र कोणत्याही दबावाला बळी न…

५० हजाराहून अधिक कोयी जमा करत नागरिकांचा पर्यावरणशील सहभाग

आंब्याच्या कोयी संकलन उपक्रम नवी मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छतेत तसेच पर्यावरण रक्षण – संवर्धनात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून याच धर्तीवर जागतिक पर्यावरण…

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या…

वस्ताद वसंतराव पाटील यांना ‘राष्ट्रीय गरुड झेप’ पुरस्कार प्रदान

मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे सर्वेसर्वा वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त काळ दिलेल्या भरीव योगदानाबद्दलसांगली…

छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी ‘बलिदान दिवस’ म्हणून फाल्गुन अमावस्येला पाळण्यात यावा

शिवभक्त श्री राजू देसाई यांचे कळकळीचे आवाहन मुंबई : गुढीपाडव्याच्या सणासाठी श्रीखंड त्याच दिवशी आणा आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला नको. कारण तो दिवस छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी असून तमाम हिंदूंनी हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला पाहिजे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश उर्फ राजू देसाई यांनी कळकळीचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराजाभिषेक दिनानिमित्त जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळाच्या प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश शांताराम उर्फ राजू देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकसह अनेक घटना खड्या आवाजात कथन केल्या तसेच औरंगजेबाने छत्रपती शंभूराजे यांचा तब्बल चाळीस दिवस अतोनात छळ केला. शंभूराजे यांचे हात तोडण्यात आले. डोळे काढण्यात आले, शीर धडापासून वेगळे केले पण छत्रपती शंभूराजांची ना नजर झुकली, ना मान झुकली‌. हमने हमारी फौजमें कैसे कैसे सूरमा पालके रखे हैं, शाहिस्तेखान गया तो शिवाने उसकी उंगलियाॅं काटके भेज दिया, अफझलखान को शिवाने वहीं दफना दिया. हमको दुष्मन भी मिला तो शिवा जैसा और शंभू जैसा. अगले जनम में हमें शंभू जैसा शूरवीर बेटा मिले, असे औरंगजेबाने म्हटले असल्याचे खफीखान या औरंगजेबाच्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे, असे जेंव्हा राजू देसाई यांनी सांगितले तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. साहित्यिक विजय मडव, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, मनोहर देसाई, वसंत सावंत, दिनेश विचारे, अभिलाष कोंडविलकर, दिलीप चव्हाण, संजना वारंग, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, कांचन सार्दळ, रोहिणी चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पालघर : वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सार्वजनिक…

ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक ‘संकल्पपत्र’चे प्रकाशन

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक ॲड. परब यांना विजयी करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई : मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक संकल्पपत्राचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मातोश्री’ येथे बुधवारी प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना वचनबद्ध असून उच्चशिक्षीत उमेदवार ॲड. अनिल परब यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदवीधर मतदारांना यावेळी केले. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील चार जागांची निवडणूक जाहीर झालेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून ‘महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेना नेते ॲड. अनिल परब आहेत. संकल्पपत्र प्रकाशनावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली ५ वेळा या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विजयी होत आलेला आहे. मुंबईकर आणि शिवसेना यांचे एक दृढ नाते आहे. मुंबईतील पदवीधर मतदारांसाठी ॲड. अनिल परब यांनी विविधांगी कार्य करण्याचा संकल्प वचननाम्यात दिला आहे. शिवसेना पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत ॲड. अनिल परब यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. २६ जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान आहे. मात्र, या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे मतदान चुकवू नका. मतदान करुनच कामावर जा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदवीधर मतदारांना केले. यावेळी ॲड. अनिल परब म्हणाले की, मी शिवसेनेचा आमदार म्हणून तीनवेळा विधानपरिषदेत कार्य केले. मात्र, यावेळी मी प्रथम पदवीधर मतदारसंघात उभा आहे. माझ्या संकल्पपत्राचे प्रकाशन माझे पक्षप्रमुख आणि मतदार असलेले उद्धव ठाकरे यांच्या हस्त होत असल्याचा मला मोठा आनंद आहे. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे संकल्पपत्राच्या प्रकाशनाला येथे उपस्थित आहेत. मुंबई पदविधर मतदारसंघात प्रचंड मताधिक्क्याने निवडून येण्याचा शिवसेनेचा विक्रम आहे. ९८ टक्के इतके विक्रमी मताधिक्य शिवसेनेने या मतदारसंघात मिळवलेले आहे. यावेळीसुद्धा मोठे मताधिक्य घेत मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहील, असा ठाम विश्वास ॲड. अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे ॲड. अनिल परब यांच्या विरोधात मुंबई पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे डॉ. दिपक सावंत की भाजपचे किरण शेलार उमेदवार असणार आहेत, याविषयी अद्याप काहीच निश्चितता नाही. परब यांचे संकल्पपत्र दोन पानी असून ते मराठी व इंग्रजीमध्ये आहे. त्यामध्ये ॲड. अनिल परब यांनी आपला परिचय दिलेला असून त्यामध्ये मुंबईतील पदवीधरांसाठी हेल्प डेस्क ते वसतीगृह सुविधा असे नियोजित कामांची सविस्तर यादी येथे दिलेली आहे.

डम्परच्या धडकेत क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अपघातात एका महिलेचाही सामावेश ठाणे : वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते (४४) यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या…

‘काहींनी जाहीरपणे नाही पण मैत्री निभावली’

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची समाज माध्यमावर पोस्ट  समाजमध्यमांवरील संदेशामुळे खळबळ ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

पिकवलेला भाजीपाला ‘ई कार्ट’द्वारे घरपोच

ठाणे : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी कृषी विभागाच्या मार्फत महिला बचत गटांना ‘ई – कार्ट’ पुरविण्यात आले आहेत. या वाहनाच्या मदतीने महिलांना स्वत: पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री थेट…