Author: bittambatami.com

नेरुळ विभागात अनधिकृत हॉटेलवर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रांर्तगत महात्मा गांधीनगर (एम.आय.डी.सी.) डी – ब्लॉक मधील पाण्याच्या पाईपलाईन लगत असलेल्या सर्व अनधिकृत हॉटेलवर नेरूळ विभाग कार्यालयामार्फत अतिक्रमण विरोधी पथकाने…

शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती

नवी मुंबई :  भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय  निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा…

आमदार निरंजन डावखरेंना पाठिंबा

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मानले आभार ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निरंजन डावखरे यांची मंगळवारी भेट घेतली. तसेच त्यांना पाठिंब्याचे पत्र सोपविले. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, सरचिटणीस सुशिल महाडिक, उपाध्यक्ष सचिन बनसोडे, कोकण प्रदेशाध्यक्ष यशपाल ओहोळ, जिल्हाध्यक्ष धम्मदिप बनसोडे, प्रतिक सुताके, महेंद्र चंदनशिवे, धर्मराज ब्राम्हणे, अश्विन वाघ आदी उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळविण्याचा निर्धार विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी कंबर कसली

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा नगरपासून सुरू होणार. मुंबई दि. १२ जून – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिनांक १९, २०, २१ जून रोजी अहमदनगर इथून राज्यव्यापी दौऱ्याची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.सलग तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत. शिवाय नगर जिल्ह्यातील नगर शहर, कोपरगाव, अकोले या विधानसभा मतदारसंघात, शिवाय लोकसभा दक्षिणनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावाही सुनिल तटकरे घेणार आहेत. लोकसभेच्या अधिवेशनात सुरुवातीचा लोकसभा सदस्य म्हणून जी शपथ घ्यावी लागेल तो कालावधी सोडता उर्वरित कालावधी महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी विशेष करुन ज्या – ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य आहेत त्या मतदारसंघाचा संघटनेचा व्यापक दौरा करण्याचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या दौऱ्याची घोषणा आज सुनिल तटकरे यांनी केली. ४० वर्षात लोकसभा निवडणुका जवळून पाहिल्या आणि लढल्या आहेत. पाचवेळा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो आहे असे सांगतानाच प्रत्येक निवडणूक एक वेगळे परिमाण घेऊन येत असते. २००४, २००९, २०१४,२०२४ ची निवडणूक असेल या निवडणुकीची वेगळी समीकरणे राहिली आहेत. तर विधानसभेलाही वेगळी समीकरणे पहायला मिळाली असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात आलेले जे कौल बघितले तर महायुतीला जे अपेक्षित यश अभिप्रेत होते. ते आम्ही मिळवू शकलो नाही. हे निर्विवाद सत्य आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे. अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज या निवडणुकीत आमच्यापासून दूर गेलेला दिसला. या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या त्या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. याही गोष्टींची जाणीव असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मतदान होत असते आणि विधानसभेला वेगळे होत असते. या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सूक्ष्मपणाने अवलोकन केले आहे. बारकावेही समजून घेतले आहेत. प्रादेशिक विभागात घडलेल्या निकालाचा विचारही केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रकर्षाने काम करणार आहोत असे सुतोवाचही सुनिल तटकरे यांनी केले. गेले सात – आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्याबाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत एक नकारात्मक भावना निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी सहानुभूती बोलण्यात आली. ती असू शकते ते नाकारत नाही ती निवडणूकीपूरती सिमीत असते असेही सांगताना सन १९८४, १९८९,१९९०, १९९१, १९९५, १९९६, १९९८, अशा कालावधीत कसे चित्र बदललेले दिसले हा अनुभवही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितला. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे फार कुणी आत्मविश्वास गमावलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यव्यापी संघटनेचा दौरा करत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजितदादा पवार यांच्या राज्यव्यापी दौर्‍याचे नियोजन करत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी जाहीर केले. या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवली की,  निवडणूकांची तारीख जशी जवळ आली तसा अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश आले असेल मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजावण्यात आम्ही कमी पडलो असे स्पष्ट करतानाच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता काम करत आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. नगरला जो काहींचा वर्धापन दिन साजरा झाला त्यात डॉक्टर, वकील जितेंद्र आव्हाड यांचे भाषण ऐकले, त्यांनी चारवेळा पवारसाहेबांनी अजितदादांना वेडं बनवले असे वक्तव्य केले. जे आम्ही सांगत आलो तेच म्हणजे २०१४, २०१६, २०२२ मध्ये भाजपसोबत जायचे हे ठरले होते त्यावर शिक्कामोर्तब डॉक्टरांनी केले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले. जयंत पाटील हे गेली सहा वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना व्यासपीठावरुन मी फक्त चार महिने आहे हे सांगावे लागले. तुम्ही चार महिने सोशल मीडियावर बोलू नका हेही सांगावे लागले. चार महिन्यानंतर अध्यक्ष पद सोडणार आहे. निवडणूकीच्या यशानंतर एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला या पध्दतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वासमोर बोलाव्या लागतात हे कशाचे द्योतक आहे.म्हणून काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍याच्या घरावर दगड मारु नये असा खरमरीत टोला सुनिल तटकरे यांनी लगावला. आता महाराष्ट्रात गेली २५ वर्षे अविरत २४ तास राबणाऱ्या अजितदादांच्या पाठीशी सहानुभूती तयार होईल आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे उपस्थित होते. 0000 Photo-6 मुख्यमंत्र्यांच्या मंजूर निधीतील कामांचा प्रताप सरनाईक लावणार धडाका ! अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मदतीने धडाका लावणार आहेत. विधानसभेच्या आचारसंहितेनंतर २६ जून २०२४ पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापुर्वीची काही कामे थांबलेली असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असल्याने मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींवरून  सोमवारी, १० जून, २०२४ रोजी आमदार  प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन २६ जून रोजी आचारसंहिता संपल्याबरोबर व ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामे पुर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांही संबंधित सर्व अधिकार्यांना प्रशासकीय स्तरावर असलेल्या सर्व मंजूर्या तात्काळ मंजूर करण्याच्या सुचना केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील खालील कामांविषयी चर्चा झाली. १)ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील माजिवडा, मोघरपाडा, वाघबीळ, येऊर, रामबाग येथील स्मशानभुमीचे अद्ययावत पध्दतीने नुतनीकरण / सुशोभिकरण करणे.…

घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू !

ठाणे: घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या…

ठाणे स्थानकाच्या बाहेर कचऱ्याचा ढीग !

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म करा. २ च्या विश्रांती कक्षाच्या बाहेर कचरा आणि रेती व खाडी च्या रोड्याने भरलेल्या गोण्यांचे  ढीग तसेच पडलेले आहे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाहेर  कचऱयाच्या ढिगाचे रूप आले आहे. फलाटांवर आणि स्थानकाबाहेर गोण्यांमधील राडारोडा, पावसामुळे स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. तर, पादचारी पूल, विश्रांतीगृह आणि तिकीट खिडक्या लगत गर्दुल्ले, भिक्षेकरुंनीठाण मांडल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.…

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 13 उमेदवार रिंगणात

 उमेदवारांनी उमदेवारी अर्ज मागे घेतले नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या  कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक 7 जून, 2024 पर्यंत स्वीकारण्यात आलेल्या एकूण 25 अर्ज नामनिर्देशनपत्रांची  छाननी झाल्यानंतर 12 अर्ज नामनिर्देशन मागे घेण्यात आले असून निवडणूकीच्या रिंगणात 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.  अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा.भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे.  नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत  छाननी दरम्यान एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात  आले होते.  कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून   1) ॲङ घोन्साल्वीस जिमीम मॅतेस 2) निलिमा निरंजन डावखरे  3) केदार शिवकुमार काळे 4)  संजय भाऊराव मोरे 5) अस्मा जावेद चिखलेकर, 6) डॉ.प्रकाश पाडूरंग भांगरथ 7) अंकिता कुलदीप वर्तक, 8) अमित जयसिंग सारिया 9) किशोर ओतरमल जैन, 10) डॉ.भगवान अभिमानसिंग रजपूत 11) प्रा.राजेश संभाजी सोनावणे, 12) अमोल रतन गौतम जगताप असे एकूण 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13 झाली आहे. ते पुढील प्रमाणे  1) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस 2) डावखरे निरंजन वसंत, भारतीय जनता पार्टी 3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना  4) अमोल अनंत पवार, अपक्ष  5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष 6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष 7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष  8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष  9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष  10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष 11)  मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष 12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष 13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती,अपक्ष असे आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार 26  जून 2024 रोजी  सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.  अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) अमोल यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 000000

आठ दिवसांत अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू

भाजपा माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा इशारा रोहिणी दिवाण ठाणे : घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर ही ठाणे महापालिका प्रशासनाचे ठाण्यात ठिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.  शहरात एखादी दुर्घटना घडून निरपराध माणसांचे जीव गमावण्याची हे सुस्त प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत आहेत. ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि घाटकोपर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना त्वरीत शहरांतील अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अन्यथा महापालिकेच्या समोर  तीव्र  आंदोलन करण्याचा सज्जड इशारा भाजपाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिला आहे.  आज ठामपा समोर. अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले.त्या वेळी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. ठामपा बरखास्त होऊन तीन वर्षे लोटली असून सध्या महापालिकेचा कारभार प्रशासन हाकत आहे.  परंतू तत्पूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आपण  शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज संख्या बाबत माहिती विचारली असता  अधिकृत होर्डिंग्जची संख्या ५९६ असल्याचे  सांगण्यात आले होते.तर अनधिकृत होर्डिंग्ज बाबत  कोणतीही मोजणी झाली नसल्याची माहिती  दिल्यानंतर माजी महापौरांनी त्वरीत मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. परंतू  पाच वर्षांनंतरही सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणतीही मोजणी केली नसून  कोणाच्या आशिर्वादाने ठाणे शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप केले जात आहे,असा संतप्त सवाल माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. तरी  घाटकोपर होर्डिंग्ज सारखी दुर्घटना होण्यापूर्वी  अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्वरीत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात यावी नाही तर  महापालिका समोर  तीव्र आंदोलन करू असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या- एकनाथ शिंदे

 अशोक गायकवाड मुंबई:तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत…

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ

रायगड : विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा…