Author: bittambatami.com

कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ पाटील रिंगणात

शिक्षकांचा पाठींबा ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ रामजी पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसलेले सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षकांच्या समस्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ रामजी पाटील यांना शिक्षकांच्या पाठिंब्यावर कोकण पदवीधर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पदवीधर आमदार देखील शिक्षकच असला पाहिजे असे शिक्षकांचे म्हणणे आहे म्हणून त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे गोकुळ पाटील म्हणाले. गोकुळ पाटील सर गेल्या 29 वर्षापासून सर्व शिक्षक शिक्षकेतर संस्थापक यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार रामनाथ मोते सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर एल आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी गोकुळ पाटील सर अग्रेसर असतात त्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे श्री पाटील यांनी कोकण पदवीधर मतदार उमेदवारी संघातून अर्ज भरला आहे.यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात गोकुळ पाटील यांची उमेदवारी आव्हान ठरण्याचे चिन्ह आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

कामगारनेते गोविंदराव मोहिते एक बहुआयामी व्यक्तीमत्व

विशेष राजेंद्र साळसकर १९७० साली गिरणी उद्योग मुंबईत फार फोफावला होता.या काळात हा उद्योग अत्यंत भरभराटीला आला होता. एकंदरीतच सत्तर ते ऐंशी दशकाचा काळ हा टेक्सटाईल उद्योगाचा सुवर्ण काळच होता…

लोकशाहीचा विजय

विशेष श्याम ठाणेदार जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव अर्थात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला. देशातील जवळपास…

नरेंद्र मोदींसमोर आव्हाने…

अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पंतप्रधान पदाचा दावा सादर केला आहे, आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते येत्या रविवारी म्हणजेच ९ जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार…

शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

लातूर : शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड…

काँग्रेसच्या यशात सेनेचा वाटा – राऊत

मुंबई : शिवसेनासोबत नसती तर काँग्रेसच्या इतक्या जागा आल्या असत्या का? हा साधा प्रश्न आहे. काही ठिकाणी आमची मदत झाली नसती आणि त्यांची आम्हाला झाली नसती तर हे यश मिळालं असतं का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय…

नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला सावरले– सुशीलकुमार शिंदे

मुंबई – कठीण काळात महाराष्ट्रात नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस उभी केली ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. नुसतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही चांगल्याप्रकारे सावरलं. तुम्ही जे काम केले ते सदैव लक्षात राहणारं आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते…

विधानसभेला भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही – संजय शिरसाट

मुंबई : सर्व्हे नावाचं भूत जे भाजपच्या डोक्यात गेलेलं ते आता निघेल. एका मतदारसंघात 12 सर्व्हे केल्याने काही होतं नाही. नागरिकांची मतं ही महत्वाची आहेत. आम्हाला अतिआत्मविश्वास नडला, आता भाजपाच्या सर्व्हेच्या च्या दबावतंत्राला आम्ही बळी पडणार…