Author: bittambatami.com

महिन्यापासून शहापूर परिसरातून जीओचे नेटवर्क गायब

कल्याण: गेल्या महिन्यापासून शहापूर तालुक्यातील अनेक गाव हद्दीतील जीओ मोबाईलचे नेटवर्क गायब असल्याने या भागातील नोकरदार वर्ग सर्वाधिक हैराण झाला आहे. साठगाव, शेणवे, मळेगाव, मुसई, कुल्हे परिसरात हा प्रकार सर्वाधिक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. जीओ मोबाईलवर काॅल आला तर तो अचानक बोलताना कट होतो. नेटवर्क येण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांना गावाबाहेर उंच टेकडीवर जावे लागते. तेथे चुकून नेटवर्क असेल तर मोबाईल लागतो. अन्यथा नेटवर्क कधी येईल या प्रतिक्षेत ग्रामस्थांना थांबावे लागते. अलीकडे सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होतात. शेतकऱ्यांना बँँकेचे व्यवहार करताना मोबाईलचा वापर करावा लागतो. आता शेतीविषयक बी-बियाणे, शासन सुविधांचा लाभ ऑनलाईन माध्यमातून घेण्यासाठी मोबाईलचा वापर प्रभावीपणे केला जातो. बँकेतील बहुतांशी व्यवहार, ओटीपी, गॅस अनुदान, दुकानात ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल नेटवर्क नसल्याने ग्राहक, दुकानदार त्रस्त आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. ग्रामीण भागातील अनेक उच्चशिक्षित नोकरदार घरात बसून कार्यालयीन कामकाज करतात. त्यांची जीओ नेटवर्क नसल्याने सर्वाधिक कोंडी झाली आहे. आता गावागावामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. गावांमधील बहुतांशी व्यवहार मोबाईलवर अवलंबून असतात. लहान मोठे व्यवासायिक, त्यांना संपर्क करण्यासाठी मोबाईल महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातील बीएसएनएलचे नेटवर्क मागील सहा वर्षापूर्वी बंद पडत गेल्यानंतर गावांमध्ये जीओचा मोबाईल घेण्याची स्पर्धा लागली. सुरूवातीच्या काळात गावात जीओचे मोबाईल नेटवर्क पूर्ण क्षमतेने होते. पण गेल्या काही दिवसांपासून शहापूर परिसरातील शेणवे भागात जीओचे नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक ग्रामस्थ, वित्तीय संस्थांनी यासंदर्भात जीओच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आहे. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

पर्यावरण दिनी ठामपा लावणार पोखरण रोडवर बकुळाची १ हजार झाडे तर नागला बंदर चौपाटीवर ५०० झाडे !

५ जून रोजी ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ संकल्प – संदीप माळवी अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे तर ठाणे महापालिका पोखरण रोडवर बकुळाची १ हजार झाडे तर नागला बंदर चौपाटीवर मियावाकी पध्दतीने ५०० झाडे लावण्यात येणार असल्याची  माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने,  ठाणे महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने,५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५.०० वाजता ‘ करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, स्टॅण्ड अप कॉमेडी, कविता, पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्र्.१ आणि नागला बंदर चौपाटी अशा दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यात बकुळाची १००० झाडे लावली जाणार आहेत. तर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने ५०० झाडे लावली जाणार आहेत. त्यात, पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे.महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

धनगर प्रतिष्ठानच्या वतीने धनगर रत्न पुरस्कार

ठाणे : धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे  यांच्या वतीने रविवारी “धनगर रत्न” पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार  तेजस्विनी गलांडे ( शासकीय ),गणेश कुरकुंडे ( पत्रकारिता),अनिकेत पडसे ( सामाजिक),अनिल झोरे ( शैक्षणिक ),अक्षय मासाळ ( क्रीडा ),डॉ स्मिता काळे-बंडगर ( वैद्यकीय ), भीमराव जानकर ( उद्योजक ),नागू आप्पा वीरकर  ( लेखक – साहित्यिक ),आकांक्षा शंकर वीरकर ( राजकीय ),सचिन तामखडे (कला ) राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,नवी मुंबई  (सामाजिक संस्था)  यांना प्रदान करण्यात आले.तर पुश अप्स मध्ये ग्रिनीज वल्ड रेकॉर्ड करणारे संजय देवकाते यांचा विशेष सन्मान करण्यात आला.ठाण्यातील पाचपाखाडी येथील  ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर,वसई विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,माजी नगरसेविका विशाखा खताळ,समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे,बाबासाहेब दगडे,संजय वाघमोडे,यशवंत सेना नवी मुंबई अध्यक्ष अभिजित कोकरे,समाजसेवक संदेश कवितके,संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्षा माधवी गणेश बारगीर आदीसह मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य इतके मोठे आहे कि सर्व समाजाने त्यांची पूजा केली पाहिजे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. समाजातील रत्न शोधून त्यांना पुरस्कराच्या माध्यमातून बळ देण्याचे काम धनगर प्रतिष्ठान करत आहे त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात केळकर यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.धनगर प्रतिष्ठान सतत समाजाच्या समस्या,प्रश्न सोडवण्यात पुढे असतात.त्यामुळे प्रतिष्ठान करत असलेल्या या सामाजिक कार्याला आमचे कायमचे पाठबळ असले असे सांगून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे सुशोभीकरणासाठी आमदार निधी लागला तर देऊ असे आश्वासन देखील केळकर यांनी दिले आहे.सरकारने समाजासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत या योजना समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन विविध शिबिरे आयोजित करण्यात येईल असे केळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन धनगर प्रतिष्ठानच्या वतीने माझाकडे केलेल्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरीव निधी देऊन भव्य स्मारक उभारू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,गणेश बारगीर,अविनाश लबडे,राजेश वारे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,अनिकेत पडसे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,सचिव गायत्री गुंड,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव सुजाता भांड,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लगार अर्चना वारे,मीना कवितके,शीतल डफळ,वंदना वारे,अमृता बुधे,सीमा कुरकुंडे,मनीषा शेळके,रंजना यमगर,स्मिता गावडे,शुभांगी उघाडे,रिचा कुलाळ आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे अमोल जगताप हे कोकण पदवीधर निवडणूक लढविणार- सतिश देशमुख

अनिल ठाणेकर ठाणे : शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेचे प्रतिनिधी म्हणून संगणक इंजिनियर अमोल गौतम जगताप हे कोकण पदवीधर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते, त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीनंतर कोकण पदवीधर निवडणूक जाहीर केली असल्याने संघटनेने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. आजपर्यंत ७५०० तरुण पदवीधर यांचे फॉर्म संघटनेच्या वतीने भरण्यात आले असून हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे. शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्याच्या हितासाठीही संघटना कार्यरत असुन अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. या राज्यात केवळ  सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधरांच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. यामुळे आता मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या वतीने तरुण उमेदवार म्हणून संगणक इंजिनियर अमोल गौतम जगताप हे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेचे प्रतिनिधी म्हणून कोकण पदवीधर निवडणूक लढविणार असल्याचे सतिश देशमुख यांनी जाहीर  केले आहे.

तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने कार्यक्रम

मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व  मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ – “तंबाखूला नाही म्हणा”. यात धुम्रपानविरोधी कार्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. “जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्ताने मंत्रालयात सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला.  व्यसनांचे विदारक रुप प्रकट करणारे कटआऊट, बँनर्स, पोस्टर्स प्रदर्शनी याचे उदघाटन यावेळी प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उप सचिव रविंद्र गोरवे, कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ तांबवेकर, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल मडामे हे उपस्थित होते. प्रमोद जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यसन आणि वाढते प्रमाण यांना आळा घालण्यासाठी प्रचार, प्रसार, प्रबोधनाची त्रिसुत्री अवलंबून युवा पिढीचे तंबाखूजन्य पदार्थापासुन आपण रक्षण करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन थांबविले नाही तर सन 2020 ते 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखू पासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला नाही का ? म्हणून या आयोजनात सर्वांनी सहभागी व्हावे व स्वतःला तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी 2011 साली व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे. 2020 महाराष्ट्र राज्याचे साठावे वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने व्यसनमुक्त महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या 100 मीटर पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये मोहीम राबविण्यात येईल व याठिकाणी तंबाखूमुक्ती ची शपथ मंडळाच्या संघटकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याचे चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी मांडले. वाढते व्यसनांचे प्रमाण आणि त्यात अडकत झालेली तरुणाई यांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि शरीराची होणारी परवड लक्षात घेऊन या मुलांना परावृत्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात ही प्रदर्शनी, व्यसनमुक्ती सापसिडी बघण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मुंबईकर यांचे लक्ष वेधुन घेऊन सर्वांना तंबाखूला नाही म्हणा असे संदेश देत होते. सदर कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्तालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन, किन्नर मॉ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत तंबाखू मतलब खल्लास तंबाखू मुक्त महाराष्ट्र चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी दिली. सदर कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने कार्यकारीणी सदस्य प्रिया पाटील, दिपक पाटील, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील, मुंबई शहर संघटक विवेक साळवी, व मुंबई उपनगर संघटिका दिशा कळंबे, स्वयंसेवक चेतना सावंत या सर्वांनी उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रम प्रसंगी व्यसनमुक्ती सापसिडी चे पण आयोजन करण्यात आले होते याचा आंनद सर्वांनी घेतला. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे आभार नशाबंदी मंडळाचे सदस्य प्रिया पाटील यांनी मानले. तसेच संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल मडामे, चिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले.

नॅप फाऊंडेशनचे ९ जून रोजी ठाण्यात स्नेहसंमेलन

पालिवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि युवा उद्योजकांचा होणार सन्मान ठाणे: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालिवाल समाजातील ज्येष्ठ महनिय व्यक्तीचा तसेच समाजातील युवा उद्योजकांचा नॅप फाऊंडेशनच्या वतीने रविवार,  9 जून रोजी ठाण्यात सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नॅप फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निकीता पालिवाल यांनी दिली आहे. नॅप फाऊंडेशनच्या वतीने ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने नॅप फाऊंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेदिक प्रसाधने बनविण्यात येत आहेत. या उत्पादानांची विक्री फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच संपूर्ण भारतभर केली जाणार आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही नॅप फाऊंडेशन कार्यरत आहे. 9 जून रोजी महेश भवन, कासारवडवली येथे नॅप फाऊंडेशनच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पालिवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्तीचा तसेच भारतातील प्रमुख ८ राज्यातील युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे.  आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती निकीता पालिवाल यांनी दिली आहे. यावेळी महिलांनी उत्पादन केलेल्या आयुर्वेदिक प्रसाधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून विक्रीही करण्यात येणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे निरंजन डावखरेंना उमेदवारी

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. तसेच भाजपाचे कोकणातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून २०१२ पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले जात आहे. ते यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधरांना नोकरीबरोबरच कोकणातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते आदींसह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार डावखरे यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच कोकणात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये डिजिटल साहित्य व प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. जनतेशी थेट संपर्क, प्रत्येक प्रश्नाची खोलात जाऊन घेतलेली माहिती, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांशी संवाद ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

एक्सिट पोल नेमके कशासाठी ?

वाचक मनोगत लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला आणि देशभरातील समस्त वृत्तवाहिन्यांनी एक्सिट पोलचा निकष दाखवण्यास सुरुवात केली ज्यामध्ये मराठी वृत्तवाहिन्याही मागे नव्हत्या. मागील काही वर्षांपासून निवडणुकानंतर एक्सिट पोलचे निकाल…

लोकनेते गोपीनाथ मुंडे

विशेष श्याम ठाणेदार कोणताही राजकीय वारसा नसताना, स्वकर्तृत्वाने राजकारणाचे शिखर गाठणारे नेते भारतीय राजकारणात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील यात लोकनेते म्हटले जाणारे एकमेव नेते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब. आज…