Author: bittambatami.com

केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू

केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू अनिल ठाणेकर ठाणे : केंद्र सरकारच्या या मालक धार्जिणे व कामगार धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारी २०२६ रोजी…

तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त

तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त काम त्वरीत मार्गी लावण्यासाठी नगरसेवक महेश गायकवाड यांनी अधिकाराऱ्यांना धरले धारेवर कल्याण : कल्याण पूर्वेतील विजय नगर प्रभागातील सम्राट अशोक विद्यालय ते…

नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ संरक्षित वृक्षांची सर्रास कत्तल सुरूच हरिभाऊ लाखे नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने पिंपळ, वड, औदुंबर या वृक्षांना संरक्षित दर्जा देताना, तोडण्यास सक्त मनाई केल्यानंतरही निसर्गसाखळीतील अत्यंत…

 समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान

समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान मुंबई : महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले मंत्रालय , मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांना आदर्श पत्रकार…

 चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न

चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न ठाणे – परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्थापन केलेल्या विश्वव्यापी चिन्मय मिशनला…

जागतिक दर्जाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातीलच नाही तर जगातील एक नावाजलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली म्हणजे आज हे विद्यापीठाला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८…

चेहऱ्यावरील अॅसिड…

महिलांच्या चेहऱ्यावरील अॅसिड हल्ले केवळ अत्याचारच नाहीत तर अतिशय क्रूर मानवी वृत्तीचे प्रतीक म्हणून निंदनीय देखील आहेत परंतु केवळ महिलाच नव्हे तर आजकाल काही पुरुषही ‘फेशियल’ या सौन्दर्यासाठीच्या नावाखाली चेहऱ्यावर…

रस्त्याला हवा आणखी एक पर्याय

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात जाणारे त्र्यंबकेश्वरपासून गडहिंग्लजपर्यंत अनेक घाट रस्ते आहेत. त्यापैकी मुंबई-पुण्यादरम्यानचा बोरघाटातील रस्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्याला द्रुतगती मार्गाचा पर्याय दिला असला, तरी बोरघाटात हे रस्ते…

आर्थिक पातळीवर फसगत कुठे?

आर्थिक पातळीवर फसगत कुठे? सध्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात देशात कोणतीही असामान्य परिस्थिती नाही. उद्योगजगतात असलेली असामान्य परिस्थिती मुख्यत: आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः अमेरिकेने वाढवलेल्या टेरिफमुळे आहे. ताज्या अर्थसंकल्पाकडूनही वास्तव लक्षात घेऊन तरतुदी…

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रमेश औताडे मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत उपाध्यक्ष बंडू हिरवे यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान सांगितले. याबाबतचा निवेदनपत्र ४ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मानधन प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निधीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.असे सचिन जाधव व संदीप पाटील यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे राज्यातील हजारो गावे ओ डी एफ प्लस घोषित झाली असून हजारो गावे ‘हर घर जल’ म्हणून प्रमाणित झाली आहेत. मात्र, इतके महत्त्वाचे काम करूनही कर्मचाऱ्यांना मानधन, आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.