Author: bittambatami.com

काँग्रेसशी कायमचा घरोबा नाही : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली: “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही. आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करून हुकुमशाही व गुंडगिरीच्या राजकारणाला पायबंद घालणं हे आहे”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. “सध्या देशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. जिथे कुठे भारतीय…

अखेर २५ तांसानी डहाणू लोकल सुरू

पालघर : रेल्वे मालघाडी अपघाताच्या दुर्घनटेनंतर २५ तासांनी डहाणुतून पहिली लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे, गेल्या दिवसभरापासून लोकल ट्रेनची वाट बघणाऱ्या प्रवाशांचा जीव अखेर भांड्यात पडला. तुटलेल्या ट्रेनचे ट्रॅक बांधून फायनल टेस्टिंगला…

पुणे अपघात चौकशी अहवाल ; डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित

ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना सक्तीची रजा मुंबई : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी महाराष्ट्र शासनाने ससून रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालानुसार…

सिनेमा निघाल्याने महात्मा गांधींना सारे जग ओळखायला लागले- मोदी

    महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली”- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली : महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात…

चुक झाली, माफी असावी- आव्हाड

 अनिल ठाणेकर ठाणे : मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनवधानाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो अशी खंत ट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस

मुंबई : दिल्लीत शंभर वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद होत असताना इकडे मुंबईकराना खुषखबर आहे. येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला…

मध्य रेल्वेचा प्रवास टाळा!

ठाणे स्थानकावर ६२ तासांचा ब्लॉक मुंबई : येत्या विकएण्डला मध्ये रेल्वेने प्रवास करण्याचा प्लान असेल तर तो टाळा. मध्ये रेल्वेच्या ठाणे स्थानकावर शुक्रवारी ३० मे च्या मध्य रात्रीपासून तब्बल ६२ तासांचा ब्लॉक घेण्यात…

गेल्या शंभर वर्षात असे घडले नाही

 दिल्लीत पारा ५२.३ अंशावर नवी दिल्ली : वातावरणातील बदलामुळे अवघं जग चिंतेत असताना आता सुर्यानेही आपला हिसका दाखवायला सुरुवात केली आहे. गेल्या शंभर वर्षातील तापामानाचा विक्रम मोडीत काढत दिल्लीत आज पारा ५२.३ अंशावर…

दोन महिन्यांतच कोस्टल रोडची दुरावस्था कशी झाली? प्रा. वर्षा गायकवाड

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल, सरकारला फक्त इव्हेंटबाजीतच रस. मुंबई : मुंबईच्या विकासात महत्वाचा असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात उघड झाले आहे. करोडो रुपयांच्या कोस्टल रोडचे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले असून इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसले दर्जेदार काम याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला द्यावेच लागेल, असा प्रश्न विचारून बोगद्यात लागलेल्या गळतीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कोस्टल रोड प्रश्नी शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल करत वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की,  पावसाळा अजून सुरू ही झाला नाही आणि कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागले आहे. पावसाळ्यात काय होईल कोणास ठाऊक? आधी अतिशय मंद गतीनं काम करायचे, कामाचा खर्च वाढवायचा आणि नंतर निवडणुका तोंडावर आल्या की कामांचे श्रेय लाटण्यासाठी घाईगडबडीने अर्धवट झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे, जनतेशी केलेल्या या चेष्टेचे उत्तर शिंदे सरकारला द्यावेच लागेल. महायुती सरकारने या प्रकल्पाच्या कामात दिरंगाई केली, त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला. जनतेचा एवढा पैसा अक्षरशः पाण्यात वाहून गेल्यासारखा आहे. याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली पाहिजे. गळतीबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तांत्रिक कारणे पुढे केले पण ही सारवासारव व सबब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या पैशाने उभारलेल्या प्रकल्पाचे सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वच बाबींची खबरदारी घेऊन दर्जेदार काम झाले पाहिजे. अशा पद्धतीच्या हलगर्जीपणामुळे जनतेचे जीव धोक्यात येऊ शकतात. काँग्रेसच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कोस्टल रोडचे श्रेय लाटण्यासाठी अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे उद्घाटन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले. जर प्रकल्पांचे श्रेय लाटण्याची हौस आहे तर त्या प्रकल्पांतील त्रुटींची जबाबदारी देखील घ्यायला शिकले पाहिजे. पण महायुती सरकार फक्त इव्हेंटबाजी करण्यातच माहिर आहे. कोस्टल रोडलाही भ्रष्टाचाराची कीड लागलेली असून निकृष्ट कामामुळे या महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल केली आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मेट्रोमधुन सहा महिन्यामध्ये १९ लाख ६२ हजार प्रवाशांनी केला प्रवास

नवी मुंबई  : नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत मेट्रोतून १९ लाख ६२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.…