Author: bittambatami.com

पुणे अपघात दडपण्यासाठी कोट्यावधींचा चुराडा !

 दारुड्या मुलाच्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे : दारुच्या नशेत श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पॉर्श कारने गेल्या आठवड्यात दोघांना चिरडून ठार मारले. दारुड्या अल्पवयीन मुलाचा…

मनसेनंतर अजित पवरांचाही एकला चलो रे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदसाठी मुंबै बँकेच्या नलावडेंना उमेदवारी स्वाती घोसाळकर मुंबई : अवघ्या देशासहीत महाराष्ट्रही येत्या चार जूनच्या लोकसभा निकालाकडे डोळे लावून बसला आहे. या निकालानंतर राज्यातही त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्यादृष्टीने…

निसटत्या आघाडीने तेंडुलकर संघाचे ६ गुण

ड्रीम इलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा मान सिंघवीला शतकाची हुलकावणी मुंबई, २८ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या…

वस्ताद वसंतराव पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई : कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल “पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य* यांच्यावतीने” पैलवान सुभाषदादा पाटील सर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ” यांच्यावतीने भाईंदर येथील  श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव…

मोरेकर गणित अभ्यासिकेचा शंभर टक्के निकाल

ठाणे : सेवारत्न पुरस्कार विजेते हरेश्वर मोतीराम मोरेकर संचलित मोरेकर विनाशुल्क गणित अभ्यासिकेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ४ मुले आणि ५ मुलींचा समावेश होता. या…

उल्हासनगर महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षारक्षकाची आत्महत्या

सहा महिन्यापासून पगार दिला नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे म्हारळ गावाच्या वेशीवर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे राजू धाटावकर यांना गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने लोनचे हप्ते भरू न शकल्याने सोमवारी दुपारी  3 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. सदर  हॉस्पिटल हे मनपा प्रशासनाने खाजगी तत्वावर दिले असून येथील कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार दिला जातो व 12 – 12 तास काम करवून देखील वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली

मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प पालघर : स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर पालिका अ‍ॅक्शन मोडवर!

चार अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम केले सुरू उल्हासनगर : एकीकडे महानगरपालिकेने 336 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या शक्यतेची दक्षता घेऊन उल्हासनगरातील 4 अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम करण्याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कॅम्प 1 ते 5 परिसरातील प्रभागनिहाय 336 घोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्द केली आहे.सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक आयुक्त यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ज्या अतिधोकादायक इमारती मागच्या वर्षी खाली करण्यात आल्या होत्या,ज्या राहण्यास अयोग्य आहेत अशा प्रभाग समिती 4 च्या हद्दीतील 4 इमारतींचे पाडकाम आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सुरवात केली आहे.मिनर्व्हा पॅलेस अपार्टमेंट,हिललाईन पोलीस् स्टेशन जवळ,रुपानी महल अपार्टमेंट,प्रभाराम मंदिरासमोर,गंगासागर अपार्टमेंट,सेवक बेकरीसमोर,पवनधाम अपार्टमेंट,कैलास कॉलनी, स्मशान भूमीसमोर ही पाडकाम करण्यात येत असलेल्या अतिधोकादायक इमारतींची नावे असल्याची माहिती सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.

पर्यावरण जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

नवी मुंबईत 104 मोठ्या सोसायट्यांमध्ये नवी मुंबई : शहरे पर्यावरणपूरक असावीत यादृष्टीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेने सुरवातीपासूनच उत्साहाने सहभागी होत आपले राज्यातील मानांकन कायम उंचावत ठेवले आहे. सन 2023 मध्ये ‘क’ वर्ग महानगरपालिकांत नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नावाजली गेली आहे. ही परंपरा अधिक उंचावण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात आणखी उत्तम कामगिरी करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण पर्यावरणशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून पर्यावरणपूरक कार्यक्रमांत प्रत्यक्ष लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने विभागनिहाय मोठ्या सोसायट्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येत आहे. यादृष्टीने 21 मे ते 27 मे 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवित मोठ्या सोसायट्यांमध्ये पर्यावरण जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. याकरिता प्रत्येक विभागातील 13 म्हणजे 104 मोठ्या सोसायट्या निवडण्यात आल्या. त्याठिकाणी जाऊन स्वच्छता, ऊर्जाबचत, वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक प्रतिबंध, वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, पर्यावरणपूरक वाहनांचा वापर, जलबचत, सांडपाणी प्रक्रिया अशा पर्यावरणाशी निगडीत विविध विषयांवर नागरिकांशी थेट संवाद साधून प्रबोधन करण्यात आले. एकूण 104 मोठ्या सोसायट्यांमध्ये राबविण्यात आलेल्या या पर्यावरण विषयक कार्यशाळांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या विशेष सप्ताहात नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार अशा प्रकारचे पर्यावरण जनजागृती उपक्रम महानगरपालिकेमार्फत सातत्याने राबविण्यात येतील असे अतिरिक्त आयुक्त तथा पर्यावरण विभागाचे प्रमुख श्री. शिरीष आरदवाड यांनी सांगितले आहे.

कल्याणमध्ये कांगा लीग क्रिकेट स्पर्धेची निवड

मुंबई : मुंबईत होणाऱ्या प्रसिद्ध कांगा लीग क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच कल्याणमध्ये खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे जाण्याची संधी आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक इच्छुक क्रिकेटपटू नेहमीच उत्सुक असतात. यंदा प्रथमच कल्याण विभागातील क्रिकेटपटूंची निवड कल्याणमध्येच होणार आहे. निवड प्रक्रिया शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. निवड प्रक्रिया युनियन क्रिकेट अकादमी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर, वाली नगर, कल्याण पश्चिम येथे होणार आहे. कांगा लीग ‘एफ’ क्रिकेट संघ निवडीसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. तरी या निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमाणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२३८९०१८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.