Author: bittambatami.com

 लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध

लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध बहुआयामी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे मत ठाणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. लतादीदींच्या…

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी कल्याण : कल्याण मध्ये एप्सटीन फाइल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी…

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र कल्याण: प्रो. डॉ. दिनेश गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून साकारलेले शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय व आविष्कारक चित्र निर्माण…

 डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन

डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन रनर्स क्लॅन फाऊंडेशनचा यशस्वी उपक्रम डोंबिवलीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय कल्याण : रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने प्रथमच १२ तास स्टेडियम…

  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड टेनिस क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून मुलांचे क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार होणार – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे…

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा युवा खेळाडू विवांश घोषचे शानदार यश मुंबई : नुकत्याच मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत युवा तायक्वांडोपटू विवांश घोषने शानदार यश…

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप रमेश औताडे मुंबई: इराणमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला पुन्हा एकदा दोषारोपांचे लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या विरोधात द्वेष भडकवला जात…

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च २०२६ रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन रमेश औताडे मुंबई : कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन नामदेव ढसाळांच्या जयंतीदिनी रविवार १५ फेब्रुवारी रोजी नीलकमल लाॅन्स, पुणे-नाशिक रोड, राजगुरुनगर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस हे उद्घाटक असून,कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, महा.राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म.भा.चव्हाण हे परिसंवादप्रमुख असून कविसंमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे हे स्वागताध्यक्ष आहेत असे टाव्हरे यांनी सांगितले.साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद,काव्यसंमेलन,गुणवंतांचा सन्मान   याचे आयोजन केले आहे. कनेरसर येथे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरे साहित्य संमेलन झाले होते. खेड येथे नामदेवराव ढसाळ यांचा जन्म झाला असून कनेरसर येथे शालेय शिक्षण झाले होते.ढसाळ हे मुंबई येथे उपजिवीकेसाठी गेले व तीच  त्यांची कर्मभूमी ठरली.साहित्य क्षेत्रात तसेच दलित पँथर च्या माध्यमातून त्यांनी अलौकिक योगदान दिले आहे.विश्व साहित्यिक म्हणून त्यांची गणना होते. भारत सरकारने नामदेवराव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता.विद्रोही कवी- लेखक म्हणून ढसाळांची गणना होते.गोलपिठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले होते.हाडकी हाडवळा,मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे,गांडु बगीचा,तुही यत्ता कंची, मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले, या सत्तेत जीव रमत नाही,प्रियदर्शनी, खेळ व इतर विपुल साहित्य संपदा ढसाळांनी निर्माण केली आहे. खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,साहित्यिक,साहित्य प्रेमी यांनी ढसाळांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन टाव्हरे यांनी केले आहे.

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले कल्याण: बल्याणी विभागात पीर वली शाह दर्गा ऊर्स २०२६ निमित्त प्रभाग क्र. 4 मध्ये लावण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसीचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांचे अधिकृत बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर कृत्य अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या भावना दुखावणारे आहे. या घटनेमागील दोषींवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.