Author: bittambatami.com

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.…

परीक्षा पे चर्चा… राजकारणात मुरलेल्या भल्याभल्या राजकारणांची ‘शाळा’ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणाच्या पलिकडे जात यंदाही देशातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षेचे टेन्शन दूर करण्यासाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची अशी शाळा घेतली.

भारताने सहाव्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला; वर्ल्डकप जिंकणारा आयुष म्हात्रे विरारचा ‘दुसरा’ छोरा

हरारे : विरारचा छोरा आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करून सहाव्यांदा वर्ल्डचॅम्प बनण्याचा मान मिळविला. योगायोग म्हणजे भारताच्या या सहावर्ल्डकप विजेतेपदात टिमचा कॅप्टन दुसऱ्यांदा विरारचा छोरा ठरला आहे.…

अँकर सहा कॉलम इस्लामाबादमध्ये मशीदीत भीषण स्फोट

स्फोटात २४ ठार, १०० हून अधिक जखमी इस्लामाबाद : पाकिस्तानातील तरलाई भागातील इमाम बारगाह परिसरात शुक्रवारी जुम्मा नमाजाच्या वेळी झालेल्या भीषण स्फोटात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी…

नक्षलवाद्यांची ‘कंपनी १०’ खतम

गडचिरोलीत सी-६० पोलिसांची मोहीम ० ७ नक्षलवादी ठार ० महाराष्ट्राचे जवान दिपक मडावी शहीद गडचिरोली : नक्षलवाद्यांमध्ये कुख्यात असणाऱ्या कंपनी १० चा गडचिरोली पोलिसांनी आज खात्मा केलाय. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या अबुझमाड दुर्गम भागात आणि…

शरद पवार निवडणूक लढविणार ? मविआकडून राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु ० राज्यसभेच्या सात जागा २ एप्रिलला रिक्त होणार  

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या रोज नवे वळण पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकारणाचे सारे संदर्भ बदलले असून त्यामुळ विविध राजकीय पक्षांच्या भुमिकाही सातत्याने बदलत…

रिझर्व्ह बँकेचा हात, चलनसाठ्याची साथ

रिझर्व्ह बँकेचा हात, चलनसाठ्याची साथ अर्थनगरीमध्ये वार्षिक अंदाजपत्र अर्थात बजेटचे वातावरण असले तरी काही महत्वाच्या बातम्याही लक्ष वेधून गेल्या. आर्थिक संकटात सापडलेल्या बँकांना रिझर्व्ह बँकेचा मदतीचा हात मिळणार आणि आर्थिक…

प्रकाशन व्यवसायातील मुद्रित शोधकाचे महत्त्व…

प्रकाशन व्यवसायातील मुद्रित शोधकाचे महत्त्व… कालच्या दै बित्तंबातमीत एक बातमी प्रकाशित झाली होती. ती एका संघटनेची नवी कार्यकारिणी गठीत झाल्याबद्दलची बातमी होती. मात्र त्या बातमीत नव्या कार्यकारणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो…

परराष्ट्र खात्याची मुत्सद्दी खेळी

परराष्ट्र खात्याची मुत्सद्दी खेळी ‌‘यूएई‌’चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्या नवी दिल्ली भेटीत एका धोरणात्मक संरक्षण करारावर भर देण्यात आला. त्याला एक मजबूत आर्थिक आयामदेखील होता. त्यात युरेशिया आणि…

  वाढवण बंदर विकासात स्थानिकांना कामे देणार

वाढवण बंदर विकासात स्थानिकांना कामे देणार भारतीय जनता पक्षाच्या निवेदनानंतर ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ची ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील वाढवण येथील बंदर विकासाचे काम ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ने घेतले असून या कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आदींनी सुमारे चारशे कार्यकर्त्यांसह कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीच्या वतीने स्थानिकांना रोजगार देण्याचे मान्य करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली. वाणगाव येथील ‘आयटीडी सिमेंटेशन’ या कंपनीने वाढवण बंदर विकासाचे काम हाती घेतले आहे. ‘एल अँड टी कंपनी’ची ही उपकंपनी आहे. या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी बाहेरच्या लोकांना रोजगार दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राजपूत, भोये यांच्यासह भाजपच्या सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी तेथे धडक दिली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या दहा-पंधरा कर्मचाऱ्यांनी मद्यपानाच्या नशेत सुमारे चारशे कार्यकर्त्यांना रोखून धरले. निवेदन देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भोये, राजपूत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात प्रवेश केला व निवेदन दिले. स्थानिक भूमिपुत्रांना डावलले या निवेदनात प्रामुख्याने स्थानिकांच्या रोजगाराच्या तसेच कामासंबंधीच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डहाणू तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कुशल व अकुशल कामगार वाहतूक व्यवस्था तसेच यंत्रसामग्रीसाठी स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जाते. अन्य राज्यातील कंत्राटदार, कामगार व वाहनधारकांना प्राधान्य दिले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या हक्कावर गदा येत आहे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व कुशल व अकुशल कामगार फक्त डहाणू तालुक्यातील असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यालयीन कर्मचारी स्थानिक हवेत कामगारांना देण्यात येणारी मजुरी भत्ते व इतर सुविधा कामगार कायद्यानुसार देण्यात याव्यात, कार्यालयीन कामासाठी लागणारे कर्मचारी त्यात कारकून पर्यवेक्षक आदी पदांवर स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, साईट इंजिनिअर, मॅनेजर, सुरक्षा रक्षक आदी पदावर बाहेरील व्यक्ती नेमण्याऐवजी स्थानिक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, कार्यालयीन कर्मचारी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने भाडेतत्त्वावर घेताना डहाणू तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडूनच घेण्यात यावीत आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. पुरवठा कंत्राटी स्थानिकांना द्या प्रकल्पासाठी लागणारी जड वाहने व इतर यंत्रसामग्री; त्यात जेसीबी, हायवा पोकलेन, ट्रॅक्टर आणि टँकर व अन्य वाहने स्थानिकांकडून घेण्यात यावीत. खडी, रेती, डांबर व इतर साहित्याच्या वाहतूक व खणन कामासाठी लागणारी यंत्रसामग्री व पुरवठा कंत्राटे स्थानिकांना देण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार…