निवडणूक निकालानंतर मोबाईल रिचार्ज महागणार
सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर…
सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर…
पैलू सुभाष लांडे देशातील सार्वत्रिक निवडणुकींमुळे वातावरण ढवळून निघत असताना हळूहळू जनमताचा कलही समोर येत आहे. त्यानुसार ‘एनडी’च्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी सरस असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: शेतकरी, कामगार, विद्यार्थी…
तब्बल १० वर्ष ८ महिने आणि २१ दिवसांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून त्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर उर्वरित तीन आरोपी…
नवी दिल्ली : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंहांच्या अडचणीत वाढल्या आहेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीतील राऊज रेवेन्यू…
मुंबई : आपल्याला भारताबाहेरून राहील नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा दावा सदावर्तेंनी केला. राहील नामक व्यक्तीने भारताच्या बाहेरून धमकीचा फोन केल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. या संदर्भात गृहविभागाने देखील दखल घेऊन दहशतवाद विरोधी पथकाकडे याचा तपास द्यावा अशी मागणी सदावर्तेंनी केला. दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका दिला असून एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे.
गडचिरोली : छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 6 नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला यांना या जंगलात घेरल्याची माहिती आहे. बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून अजूनही अधूनमधून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांतील जवान हे नक्षलविरोधी अभियानात सहभागी आहे. गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत. माहितीनंतर शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांतील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. जिथे शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले.
अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात केलेले वक्तव्य हे अतिशय खालच्या पातळीचे असून निषेधार्ह आहे असे मत…
पंतप्रधान मोदींचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल नंदुरबार : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र असल्याची टीका केल्यामुळे महाराष्ट्रात रान उठलेले असतानाच पंतप्रधान मोदींनी नंदुरबार येथे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. ठाकरेंची ही नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा बोलत आहेत, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या देशातील माता भगिनी माझं रक्षण करतील, याची या मंडळींना कल्पना नाही आहे. असे वक्तव्य मोदीं यांनी…
नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभे नंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले होते. हाच धागा पकडत काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपाप्रणीत एनडीएत यावे त्यांचे स्वागत होईल अशी खुली…
कन्नौज: उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, कारण उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला. ते म्हणाले, ” मोदींनी १० वर्षे अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, परंतु जेव्हा ते घाबरले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन मित्रांची नावे घेतली आणि सांगितले की, या आणि मला वाचवा. इंडिया आघाडीने मला घेरले आहे.” नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, “१० ते १५ दिवसात तुम्हाला दिसेल की, तुमची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु विचलित होऊ नका. आमचा मुद्दा भारतीय संविधानाचा आहे. या संविधानाने दलित आणि मागासवर्गीयांना अधिकार दिले आहेत.” नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने ठरवले आहे की, ते संविधान रद्द करणार आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही. मतदानासह इतर अधिकारही संविधानानेच दिले आहेत. ही महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. तसेच, नरेंद्र मोदी २२ लोकांसाठी काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, नरेंद्र मोदींनी या २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. नरेंद्र मोदींनी तुमचे किती कर्ज माफ केले आहे? असा सवाल करत हे केंद्र सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, मजूर यांचे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.