Author: bittambatami.com

मेधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने

ठाणे : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले आहे. आंदोलनाच्या नेत्या मा. मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह दि, १५ जून २०२४ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम असून त्यांना देशभरातून लाखो लोकांचे समर्थन मिळत आहे.मधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. पुनर्वसना शिवाय डुब नाही. सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे. सरदार सरोवर बाधित आदिवासी, शेतकरी, मजूर आणि नर्मदा खोऱ्यातील सर्व भूमिहीन समुदायांनी अहिंसक सत्याग्रही म्हणून संघर्ष केला आणि पुनर्वसनाचा हक्क, जीवन आणि उपजीविकेचा हक्क मिळवला. भूमिहीन, स्त्रिया, भूमीधारक, मत्स्य कामगार, आदिवासी, कुंभार इत्यादींचाही कायदेशीर आणि सामूहिक कृतीं मुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात उदारीकरण केलेल्या राज्य धोरणांमुळे समावेश झाला. कालांतराने सुमारे ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. तथापि, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही काही शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबे आहेत, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे.असे असूनही नर्मदा न्यायाधिकरणाच्या पुरस्काराचे, कायद्याचे आणि धोरणाचे उल्लंघन करून, निमाड, मध्य प्रदेशच्या मैदानी भागातील वरची गावे आणि एका टाऊनशीपसाठी बॅकवॉटरची पातळी बदलण्यात आली. पात्र कुटुंबांच्या यादीतून १५९४६ कुटुंबांना वगळण्यात आले. परंतु त्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली. त्यांचे सर्व सामान उध्वस्त झाले. गुरेढोरे आणि माणसं मरणासन्न झाली !! अधिकाऱ्यांशी संघर्ष आणि संवादानंतर त्यांना काही मदतीची रक्कम मिळाली, पण अद्याप पूर्ण भरपाई मिळालेली नाही २०२४ चा पावसाळा दारात आलेला असताना पुढचे पाऊल म्हणून नर्मदा बचाव आंदोलन सत्याग्रहाची सुरुवात करत आहे. आंदोलनाच्या रास्त मागण्या खालीलप्रमाणे आहेत., केंद्रीय जल आयोगाने १९८४ मध्ये अंदाजित केलेली आणि २०२३ मध्ये ती बरोबर असल्याचे सिध्द झालेली बॅकवॉटरची पातळी ( जुनी ) स्वीकारा., बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या., कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा., रिक्त पदांवर पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण, मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा., वरील कामे पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा.वरील मागण्या घेऊन जिल्हाधिकारी  ह्यांना भेटून हे निवेदन मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांना निवेदन द्यावं. मागण्या मान्य करण्यासाठी खालील संस्था संघटने तर्फे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्देशने करण्यात आली.ह्या निर्दशनास जगदीश खैरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस, श्रमिक जनता संघ, डॉ. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक, भारत जोडो अभियान, नरेश भागवाने, महासचिव, बहुजन विकास संघ, लिलेश्र्वर बनसोडे, निमंत्रक, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति, निर्मला पवार,  भारतीय महिला फेडरेशन, सुब्रतो भट्टाचार्य स्वराज अभियान, ठाणे हर्षलता कदम, अध्यक्ष, समता विचार प्रसारक संस्था, नितीन देशपांडे उपाध्यक्ष, धर्मराज्य पक्ष ह्या संस्था संघटना सहभागी झाले होते. हे निर्देशन यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, सुनिल दिवेकर, गणेश चव्हाण ह्यांनी मेहनत घेतली. 000000

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर   ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

कोकण पदवीधर-शिक्षक मतदारांना २६ जूनला विशेष नैमित्तीक रजा मंजूर-अमोल यादव

अशोक गायकवाड   नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी पदवीधर-शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/ पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/ शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. या रजे बाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर- शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. 00000

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग

भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटूत ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज पुण्यतिथी. फ्लाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २०…

१८ जून हा का आहे काळा दिवस?

१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. अनुच्छेद ३१ (ए) व (बी) मध्ये बदल करून, नवे परिशिष्ट-९ संविधानात घुसडण्यात आले. मूळ संविधानात हे परिशिष्ट नव्हते. या परिशिष्टात टाकलेले कायदे…

वेध डॉ. चंद्रशेखर टिळक केरळमध्ये दाखवलेले राजकीय अस्तित्व, ओरिसामध्ये विधानसभा आणि लोकसभेत मिळालेले घवघवीत यश, कर्नाटकमध्ये आटोक्यात राहिलेली पडझड आणि दाक्षिणात्य राज्यांमध्ये मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ या सगळ्याचे प्रतिबब एनडीए…

एलन मस्क प्रकरणाचा अन्वयार्थ…

देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता…

सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे-चव्हाण

कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात…

ठाणे-रायगड जिल्ह्यात मोठी पोलीस भरती

ठाणे : पोलीस दलात नोकरीच्या अनुषंगाने तयारी करणार्‍यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ठाणे आणि रायगड (Raigad) जिल्ह्यात विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. तर ही भरती 21 जूनपासून…