Category: क्रीडा

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस मुंबई : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत एमजेएससी ट्रॉफीसाठी १ फेब्रुवारी रोजी…

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक ठाणे: ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित सब ज्युनिअर गटाच्या ठाणे जिल्हा अजिंक्यपदाच्या मैदानी स्पर्धेत तीन नवीन जिल्हा विक्रमासह ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाने सर्वसाधारण…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३१ जानेवारीला अजितदादा पवार यांची शोकसभा मुंबई:-महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या वतीने कबड्डीचे आधारवड संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई, दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क)…

 महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत

७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – तेलंगणा, २०२६. महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत मुंबई:- महाराष्ट्राच्या महिला संघाने “७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उप उपांत्य फेरी गाठली. तेलंगणा येथील गच्ची बोवली बंदिस्त क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या उपउपांत्यापूर्व सामन्यात महाराष्ट्राने आज गोवा संघाला ४२-३६ असे नमविले. सुरुवातीला थोडी झटपट पहावयास मिळाली. पण पहिला लोण देत महाराष्ट्राने १९-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीला महाराष्ट्राकडे २५-१४ अशी आघाडी होती. विश्रांती नंतर आणखी एक लोण देत महाराष्ट्राने आपली आघाडी ३२-१५ अशी वाढविली. या नंतर गोव्याने गतीमान खेळ करीत महाराष्ट्रावर लोण देत ३०-४० अशी आघाडी कमी केली. शेवटी महाराष्ट्राने ६ गुणांनी बाजी मारली. आम्रपाली गलांडे, याशिका पुजारी, निकिता पडवळ याच्या दमदार चढाया त्यांना समृद्धी मोहिते, समरीन बुरोंडकर, ज्यूली मिस्कीटा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळविला. महाराष्ट्राचा या स्पर्धेत ई गटात समावेश होता. त्या गटात छत्तीसगड, विदर्भ व केरळ हे अन्य संघ होते. महाराष्ट्राने प्रथम विदर्भला ५७-२० असे, त्या नंतर छत्तीसगडला ४२-१९ असे, तर शेवटी केरळला ५७-११ असे पराभूत करीत या गटात अव्वल स्थान मिळविले होते.

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी प्रारंभ  

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी प्रारंभ मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी आज सुरु झाली. महाराष्ट्राचे लाडके क्रीडा प्रेमी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे कोणताही गाजावाजा न करता अजित पवार यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सर्व खेळाडूंनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली व स्पर्धा सुरु करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळ दादर शाखेचे प्रमुख वासुदेव मुखर्जी व सिस्का कॅरम कंपनीचे अतुल मेहरा यांनी कॅरम बोर्डवर एक डाव खेळून औपचारिक उदघाटन केले. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन यांचे सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेला सकाळी ९ वाजता सुरवात झाली. पहिल्या फेरीतच प्रेक्षकांना चुरस बघायला मिळाली. महाराष्ट्रच्या डॉ अनिल तायशेटेने पहिल्या सत्रात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू व राष्ट्रीय विजेत्या कर्नाटकच्या झहीर पाशाला पहिला सेट १७-११ असे हरवून खळबळ .माजवली. परंतु आक्रमक खेळाच्या जोरावर झहिरने दुसरा व तिसरा सेट २५-०, २५-५ असा सहज हरवून आपले आव्हान कायम ठेवले. खुली एकेरी पहिल्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे ओमकार टिळक ( महाराष्ट्र ) वि वि रघुनाथ वाघपंजे ( महाराष्ट्र ) १३-२७, १७-१३, १५-५ आर अरोक्यराज ( तामिळनाडू ) वि वि इरफान खान ( महाराष्ट्र ) १८-१०, १९-६ रिंकी कुमारी ( महाराष्ट्र ) वि वि जगन्नाथ मैत्रानी ( महाराष्ट्र ) २५-०, २२-० प्राजक्ता नारायणकर ( महाराष्ट्र ) वि वि सूर्यकांत मोरे ( महाराष्ट्र ) २०-४, २३-१० रीतिकेश वाल्मिकी ( महाराष्ट्र ) वि वि अजगर शेख ( महाराष्ट्र ) ४-२२, १६-१४, १७-१५ खातीम खलील ( मालदीव ) वि वि रियाझुद्दिन शेख ( महाराष्ट्र ) २५-१-२५-० के श्रीनिवास ( तेलंगाना ) वि वि जितेंद्र राठोड ( महाराष्ट्र ) २०-५, २५-५ संगीर अहमद ( उत्तर प्रदेश ) वि वि अब्दुल कयूम खान ( महाराष्ट्र ) २५-०, २५-० काजल कुमारी ( महाराष्ट्र ) वि वि सतीश खरात ( महाराष्ट्र ) १४-१०, १८-२ इब्राहिम हुजान अली ( मालदीव ) वि वि उदय घाडीगावकर ( महाराष्ट्र ) २४-९, १६-२ विशाल परमार ( महाराष्ट्र ) वि वि शेख युसूफ ( तेलंगना ) १६-११, १९-० यु नरेश ( तेलंगाना ) वि वि आकाश मुरल ( महाराष्ट्र ) २१-०, २५-० वी आकाश ( ओरिसा ) वि वि हर्ष बारिया ( महाराष्ट्र ) २५-०, २३-९

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

विश्वनाथ स्पोर्ट मीट – २०२६ ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर पुणे: आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले. एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले. बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.…

नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे

मुंबईत कुस्तीचा महासंग्राम नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे मुंबई: अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन  नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव दंगल लीग’ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी झेंडा फडकावला. विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे झालेल्या या एकदिवसीय कुस्ती लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातून ५ पुरुष व २ महिला अशा एकूण ७ खेळाडूंनी सहभाग घेतला असून, स्पर्धेत एकूण २८ कुस्तीपटूंनी आपली ताकद आजमावली. स्पर्धेची सुरुवात हरियाणा व पंजाब यांच्यातील चुरशीच्या सामन्याने झाली. या लढतीत हरियाणाच्या ५ कुस्तीपटूंनी विजय मिळवला, तर पंजाबच्या २ कुस्तीपटूंनी बाजी मारली. परिणामी पहिला सामना हरियाणा संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात रंगतदार सामना झाला. महाराष्ट्राच्या ४ कुस्तीपटूंनी विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली, तर उत्तर प्रदेशच्या ३ कुस्तीपटूंनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्र संघ विजयी ठरला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा आमनेसामने आले. महाराष्ट्रच्या पृथ्वीराज पाटील, रविराज चव्हाण, आदर्श पाटील, अमृता पूजारी आणि सोनाली मंडलिक या पाच कुस्तीपटूंनी शानदार विजय मिळवला, तर हरियाणाच्या अंकुश सागर दहिया आणि कुसुम दहिया यांनी आपापले सामने जिंकले. अंतिम फेरीत महाराष्ट्रने ५–२ असा विजय मिळवत नरसिंह यादव दंगल लीगचे चॅम्पियन पद पटकावले. या स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आमदार अतुल भातळखर, आमदार संजय उपाध्याय, दुबईतील उद्योगपती काझी अब्दुल मतीन, संपत साळुंखे, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी प्रेक्षकांशी साधलेल्या संवादामुळे मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना आयोजक नरसिंह यादव म्हणाले, “देशातील कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा लीग स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या माध्यमातून अनेक नवोदित कुस्तीपटू घडतील. मुंबई व परिसरातील प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे.” स्पर्धेतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. विजेत्या महाराष्ट्र संघाला आयोजक नरसिंह यादव आणि डॉ. शिल्पी शेरॉन-यादव यांच्या हस्ते चांदीची गदा आणि ‘नरसिंह यादव दंगल लीग’ ची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक ठरली. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि संघबळाच्या जोरावर महाराष्ट्राने चॅम्पियनपदावर आपले नाव कोरले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी, याच दिवशी, अहिंसेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुजाऱ्याची, एका अधम वृत्तीच्या माथेफिरुकरवी कट रचून निर्घृण हत्या करविली गेली.बरोबर ७८ वर्षांपूर्वी ‘गांधी’ नावाच्या महात्म्याची हत्या झाली खरी; पण, ‘गांधीवाद आणि गांधीविचार’ कधिच मेले नाहीत, कधिच मरणार नव्हते…कारण, आजच्या जागतिक-तापमानवाढीसारख्या महासंकटामुळे भयग्रस्त झालेल्या व भांडवली-नववसाहतवादी दुष्प्रृत्तींमुळे, अशांत-अस्वस्थ झालेल्या जगाला.केवळ, ‘गांधीविचार’च तारु शकतो; हे एव्हाना, या समरप्रसंगी, अवघ्या जगाच्या चांगलंच ध्यानी आलंय, असे मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले. आपल्या याच, विश्ववंदनीय महात्म्याचे, हेच वैश्विक-विचार पुढे नेण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ या समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने, ३० जानेवारी-२०२६ रोजी, सायंकाळी ठीक ५ वा. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे, हे दोघे मान्यवर प्रभावी वक्ते ‘गांधी-विचारविश्वावर’ प्रकाशझोत टाकताना, आपल्यातील समाजघातकी, राष्ट्रद्रोही व अतिरेकी अशा उजव्याशक्तिंचा यथोचित समाचार घेतील.  सर्वसामान्यांना अज्ञात असलेल्या ‘गांधींची ओळख’, या व्याख्यानातून होईलच; पण, त्याचबरोबर गांधीहत्येचं नेमकं ‘सत्य’ही, या व्याख्यानातून पुढे येईल. आजपर्यंत ढोंगी व जात्यंध्य हिंदुत्ववाद्यांकडून, आपल्या महात्म्याबद्दल आणि त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक अफवा बेमालुमपणे प्रसारित केल्या गेल्या; त्या सप्रमाण, पुराव्यांसह खोडून काढण्याचं महान कार्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, ही अपेक्षा आहे. आपल्या राष्ट्रपित्याचं कळीकाळाला पुरुन उरणारं महान कार्य व त्याचा संदेश…जनसामान्यांपर्यंत साद्यंत पोहोचावा; तसेच, त्याच्या ‘हौतात्म्या’तून अंशतः का होईना, पण उतराई होता यावे, यासाठीच,”गांधीहत्या आणि आपण…” या व्याख्यानाचं प्रयोजन आहे आणि त्यासाठीच, आपली उपस्थिती आवर्जून प्रार्थनीय आहे, असे आवाहन राजन राजे यांनी केले.

 भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यानिमित्ताने मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की भारतीय संविधान देशातील सर्व प्रकारच्या जनतेस जगण्याचे – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हक्क व अधिकार प्रदान करते. त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी देखील प्राप्त होते. याचा लाभ घेत असतांना आपण सर्वांनी आपली कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे व मेहनतीने पूर्ण केली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या शिक्षणक्रमांची माहिती देखील दिली. त्यात प्रामुख्याने नवीन कौशल्याधारित व रोजगाराभिमुख, कृषी विज्ञान केंद्राचे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेले शिक्षणक्रम यांचा समावेश होता. मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली सुरु असलेला महाज्ञानदीप प्रकल्प, वाढवन बंदर साठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या हेतूने सुरु झालेले शिक्षण – प्रशिक्षणाचे काम, शेतकरी वर्गास एआय तंत्रज्ञान आधारित दिले जात असलेले शिक्षण, सामाजिक बांधिलकी म्हणून बंदिवान, तृतीयपंथी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवक युवती यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे सुरु असलेले विशेष उपक्रम यांची देखील त्यांनी माहिती दिली. सन २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करुया असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,  विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, दैनंदिन वेतन व सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी, शेतमजूर आदी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती शिवसेना उबाठाची मागणी मान्य मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले. नगरसेवक धरम काळे, ऍड संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.