Category: Blog

Your blog category

वाढते प्रदुषण व बदलते हवामान रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षणाची गरज

पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानी पर्यावरणाच्या प्रती वैश्विकस्तर यावर आणि राजनीतीक व सामाजिक जागृती आणण्याकरिता संयुक्त राष्ट्राने २६ नोव्हेंबर १९७२ ला “विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस” साजरा करण्याची घोषणा…

बालदिन

आज १४ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक जागतिक पातळीवर २० नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पाहिल्यांदाच बालदिन…

 केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता ठाणे : विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. सिंधू हे विश्रामगृह पडघा, बोरिवली तर्फे, राहुर व शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080820 हा आहे तर ईमेल आयडी exp.observerbhiwandi@gmail.com हा आहे. विधानसभा मतदारसंघ 139- मुरबाड, 140 – अंबरनाथ, 141 – उल्हासनगर, 142 – कल्याण पूर्व, 143-डोंबिवली या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून आशिषकुमार पांडे हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. आशिषकुमार पांडे हे रेयॉन सेंच्युरी, शहाड येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080844 तर ई-मेल आयडी expenobs139to143@gmail.com हा आहे. विधानसभा मतदारसंघ 144 कल्याण (ग्रामीण), 145 मिरा भाईंदर, 146 ओवळा माजिवाडा, 147 कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. सुरेंद्र पाल सिंग हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080892 तर ईमेल आयडी expenditure.observer25@gmail.com हा आहे. विधानसभा मतदारसंघ 148 ठाणे, 149 मुंब्रा कळवा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून जी.मनिगंडासामी (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. जी.मनिगंडासामी हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039060688 तर ईमेल आयडी exp.observer.thane@gmail.com हा आहे. 0000

बालिकेवर अत्याचार करून खुन करणार्या नराधमाला फाशी द्या

संतप्त मोखाडावासींयांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा मोखाडा: मोखाड्यातील पिंपळाचापाडा येथील आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून, तीचा खुन केल्याची घटना 28 ऑक्टोबरला घडली आहे. या घटनेतील संशयीतास मोखाडा पोलीसांनी अटक केली आहे. अत्याचार करून बालीकेचा खुन करणार्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी मृत बालीकेच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढुन  संताप व्यक्त केला आहे. मोखाडा शहरातील पिंपळाचापाडा येथील  8  वर्षीय बालिका, तेथीलच आपल्या मैत्रिणीच्या, बहिणीच्या  वाढदिवसाला जाते, असे सांगुन  28  ऑक्टोबर ला संध्याकाळी घरातुन बाहेर पडली. मात्र, उशीरापर्यंत ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तीच्या पालक व नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर रात्री ऊशीरा मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान ( दफनभूमी ) नजिक सदरची बालीका बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. मोखाडा ग्रामीण रूग्णालयात तीला तपासणी साठी नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले होते. या बालीकेवर अत्याचार करून नराधमाने तीला ठार मारले होते. या घटनेमुळे मोखाड्यातील नागरीक संतप्त झाले आहेत. मोखाड्यातील संतप्त नागरिकांनी हनुमान मंदिर पासुन बाजारपेठेतून, थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी करत, पोलिसांना निवेदन दिले आहे. तसेच दिवसेंदिवस मोखाड्यात तरुणांमध्ये वाढत चालेले आमली पदार्थांचे सेवन तसेच बेकायदेशीर सुरू असलेल्या अंमली पदार्थांचे अवैद्य धंदे बंद करण्याबाबत पोलिसानी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली आहे. या मोर्चात महिला व तरूण  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेविषयी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयित  आरोपीला तात्काळ अटक केली आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त मोर्चेकर्यांनी केली आहे. 00000

ग्रामीण भागातील आगळी-वेगळी दिवाळी

  खर्डी : दीपावली म्हणजे आनंदाची उधळण, फराळाची मेजवानी, फाटक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, विद्युत दीपमाळा व आकाश कंदिलांची घराघरांवर केलेली रोषणाई असे चित्र असते; मात्र शहापूरसारख्या ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपावली, बलीप्रतिपदा व पाडवा या दिवशी उंबरखांड, दहिगाव, अजनूप, शिरोळ, टेंभा, दळखण, बेलवड व बीरवाडीसह ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी जनावरांचा गोठा शेणाने सारवतात. त्यानंतर जनावरांना आंघोळ घातली जाते. त्यांना रंगवले जाते. तसेच, फुग्यांनी सजवून गावच्या वेशीवर नेतात. त्यानंतर तेथे पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून या जनावरांना उड्या मारायला लावतात. दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्निवरून उडी मारायला लावल्यास त्यांना कोणतेच आजार होत नाहीत, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्याचे शेतकरी कैलास म्हसकर सांगतात. दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पूंजक ठेवतात. त्यावर झेंडुची फूले ठेवली जातात. नंतर हे पूंजक सुकल्यावर शेतात सर्वत्र टाकतात. त्यामुळे शेतात चांगले पीक येते, असे शेतकरी सदानंद घरत, नितीन सांडे व सखुबाई हिलम यांनी सांगितले. खर्डीतील काही संस्था खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवाच्या घरोघरी जाऊन फराळ व मिठाईचे वाटप करतात. पाडव्याच्या दिवशी नागरिक एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अशाप्रकारे पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही ग्रामीण परिसरात सुरू आहे. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी सर्व कुटुंबे एकत्रित येतात. विशेषतः ग्रामीण भागात दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. शेणाच्या गवळणी, पेंद्या तयार करून त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे जनावरे नाहीत, ते मातीच्या गवळणी आणि पेंद्या तयार करतात. काही गावांमध्ये या काळात जनावरांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी भाऊबीज साजरी करण्याची पद्धत आहे. झेंडूच्या फुलांचे तोरण घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांचे तोरण लागलेले पाहायला मिळते. अवघं घर फुलांनी सजवले जाते. ग्रामीण भागातील फराळात सहसा चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक रव्याचे लाडू, करंजी, चकल्या, अनारसे व शेव असे विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. ते मित्र परिवारात वाटून आनंद द्विगुणित केला जातो. फटाक्यांची आतषबाजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीच्या कुंड्या विकत आणल्या जातात. त्या घरी बनवून त्यात बत्ताशे टाकतात. त्यावर दिवा लावला जातो. याची शेतकरी मनोभावे पूजा करतात. घरातील मौल्यवान वस्तू, वाहन, अवजारे याचीही पूजा केली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते. शाळकरी मुले ही किल्ला बनवण्यात व्यस्त असतात. पाडव्याच्या दिवशी पती-पत्नी जोडीने बसून पूजा करतात. पत्नी- पतीला ओवाळते, तेव्हा पत्नीला दिवाळी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.  

  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करतांना माजी आमदार परशुराम उपरकर

अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी पुरावे सादर करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड रायअशोक गायकवाडगड :उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पनवेल तालुक्यातील मौजे वळवली, येथील स. नं.४९/०, या जमिन मिळकतींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणेच्या अनुषंगाने सर्व अतिक्रमणदार यांची कागदपत्रे व पुरावे तसेच या संदर्भात…

सोयगाव पोलीस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या व घोषणा बाजी

सोयगाव;-शहरात सोशल मीडियावर एकाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या बद्दल अपशब्द वापरून कमेंट केल्याने शहरातील मराठा सेवकांचा तीनशे ये चारशे जणांचा जमाव सायंकाळी सात वाजता पोलीस ठाण्यासमोर येऊन रात्री…

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश – चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ ऑक्टोबरला १ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबरला रात्री १२ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक…

heading- राज्यपालांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, बायोएनर्जी क्षेत्रांत राज्य आघाडीवर : राज्यपाल सी पी राधाकृष्णन अशोक गायकवाड मुंबई :’शाश्वत विकासासाठी हरित व नवीनीकरणीय ऊर्जा’ या विषयावर जागतिक व्यापार केंद्र मुंबईतर्फे आयोजित पाचव्या जागतिक…