Category: होम

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम कल्याण : कल्याण पूर्व येथील कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्येची देवी माँ सरस्वतीची पूजा-अर्चा श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. मिथिलाजन एज्युकेशनल सोशल अँड रिलिजियस ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कल्याणी दुर्गा माता मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन, सरस्वती पूजन, हवन तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. वसंत पंचमीच्या खास प्रसंगी मिथिलाजन ट्रस्टच्या माध्यमातून ज्ञानाची देवी माँ सरस्वतीची पूजा करण्यात आली तसेच शेकडो गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेची फी भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करण्यात आली. या उपक्रमाबाबत मिथिलाजन ट्रस्टचे अध्यक्ष संजीव मिश्रा यांनी सांगितले की, मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने दरवर्षी ट्रस्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी, सुमित झा, दीपक मिश्रा, केशरी पांडेय, आनंद झा आदींचे मोलाचे योगदान लाभले.

 ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन

‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन पराक्रम दिनाला प्रचंड प्रतिसाद मुंबई, दि. (प्रतिनिधी) “स्वातंत्र्य मागून मिळत नाही… ते हिसकावून घ्यावे लागते!” या तेजस्वी विचारांचे मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी, भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला तो ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ या भव्य, भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व नृतनाट्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाच्या प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष! या राष्ट्रभक्तीने भारलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे (२१ पॅरा एस.एफ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ‘ऑक्सिजन लेडी’ सुमेधा ताई चिथडे यांच्या कार्यकथनाने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांमागची त्यांची निःस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचा तेजस्वी अध्याय ठरला.यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओंकार मुळ्ये, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर नारायण वाडकर, तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक  मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली. या सन्मानसोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्य-संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावात “जय हिंद” गुंजत होते. याच मंचावर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक  विजय कलमकर तसेच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू व सुवर्णपदक विजेते  महादेव समजीस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवशाली पराक्रम दिन सोहळ्याला पितांबरी प्रॉडक्ट्स व इंडियन ऑइल यांचे मोलाचे प्रायोजन लाभले, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सुनील दळवी एमएफ इन्व्हेस्टमेंट्स, जाधव फूड्स, अद्वैता वास्तु, बीऑ.न स्टोअर, रुचिसूत्र यांनी सहप्रायोजक म्हणून भक्कम साथ दिली.  ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प — देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली बलिदानाला आणि एक जागरण, प्रत्येक भारतीयाच्या मनातील पराक्रमाला!

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात धवल लक्ष्मी हे स्थानिक नावही दिले कासवाने केला १८४७ किलोमीटरचा प्रवास योगेश चांदेकर पालघरः अरबी समुद्रालगत डहाणू येथे वन विभागांतर्गत सागरी कासव संक्रमण उपचार केंद्र आहे. या केंद्रात समुद्रात जखमी झालेल्या कासवांवर उपचार केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य समुद्रात वावरणारे कासव डहाणूनजीक आढळले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला फिजिओथेरपी देण्यात आली. समुद्रात ते पोहण्यास सक्षम आहे, की नाही याचा विचार करून नंतर ते समुद्रात सोडण्यात आले. धवल लक्ष्मी हे कासव दक्षिण मध्य समुद्रात पोहोचले आहे. डहाणू येथील सागरी कासव संक्रमण केंद्र कासवांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉगर हेड, हॉक्सबीन यासारख्या कासवाच्या प्रजाती आढळतात. असंख्य समुद्र कासवांना जीवदान देण्याचे कार्य डहाणूच्या समुद्रालगत असलेल्या कासव संक्रमण उपचार केंद्रात केले जातात. फिजिओथेरपीने उपचार दहा ऑगस्ट रोजी ओलिव्ह रीले जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. अशक्त व जखमी अवस्थेत कासव पाहिल्यानंतर तेथील मच्छीमारांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने या जखमी कासवाला सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. कासवावर फिजिओथेरपी तसेच अन्य औषधोपचार करण्यात आले. स्टमक ट्यूबच्या मदतीने त्याला खाद्य देण्यात आले. जखमांवर योग्य ते उपचार आणि योग्य काळजी घेतली गेली. २९.६ किलो वजनाचे हे कासव महाराष्ट्रात प्रथमच आढळले. ते पोहण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारचा हा प्रयोगही महाराष्ट्रात पहिलाच होता. सॅटेलाईट टॅगच्या मदतीने लक्ष या कासवाचा समुद्रातील प्रवास कसा असेल, यावर देखरेख ठेवण्यासाठी संशोधकांनी भारतीय वन्य जीवन संस्थेच्या मदतीने सॅटेलाईट टॅग बसवला. मादी जातीच्या या कासवाचे नाव धवललक्ष्मी असे ठेवण्यात आले. धवल कंसारा यांचे  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून तसेच डहाणूला असलेल्या महालक्ष्मी देवीमुळे या कासवाचे नाव धवल लक्ष्मी असे ठेवण्यात आले. वीस नोव्हेंबरला हे कासव समुद्रात सोडण्यात आले. धवल कंसारा यांनीच ‘ॲनिमल सेविंग ग्रुप’ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचेच नाव या कासवाला देण्यात आले. आता ते समुद्रात सोडण्यात आले असून, त्याची अचूक दिशा सॅटेलाईटमधून कळते. सध्या ते डहाणूपासून १८४७ किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य समुदात आहे. कासवावर बसवलेले सॅटेलाईटची कालावधी एक वर्ष इतके आहे. त्यातील यंत्रणा ही कासव पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर पडल्यास कासवाची अचूक दिशा दाखवते. मासेमारांच्या जाळ्यात अडकून जखमी डॉ. दिनेश व्हिनेरकर व डॉ.जानवी जाधव, टीटीसीमधील प्राणी रक्षक रेमंड डिसोझा व प्रतिक वाहुरवाघ आणि ‘वाईल्ड लाईफ कन्झरवेशन’ आणि ॲनिमल वेलफिअर असोसिएशन’ चे सर्व सदस्य एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी व संपूर्ण वन अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार करून लक्ष ठेवले. सागरी कासव हे मुळात समुद्रात असलेल्या गाळ स्वच्छ करण्याचे काम करतात. अनेकदा ते मच्छीमारांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात पडतात. अशावेळी त्यांची सुटका जाळ्यातून होत नाही. त्यांना अंतर्बाह्य जखमा होऊ शकतात. बरेच मच्छीमार ही वेगवेगळी जाळी वापरत असतात. त्याला घोस्ट नेटजाळी’ म्हणतात. श्वास घेता न आल्याने त्याला जखमा होतात. त्याला ‘ल्फोटिंग सिंड्रोम’ असे म्हणतात. त्याच्या पोटात बऱ्याचदा प्लास्टिक दिसते. धवल प्राणीप्रेमी धवल लक्ष्मी नावामागे एक खूप मोठे कारण आहे, ज्या सागरी बचावासाठी व सागरी कासव केंद्र उभारणी करण्यामागे त्याने पहिले पाऊल उचलले. वन्यजीव रक्षक धवल कंसारा म्हणून नामांकित असा एक वन्यजीव प्रेमी होता. तो आज जगात नाही. त्यांच्या आठवणी टिकून राहाव्यात, म्हणून धवल असे व लक्ष्मी म्हणजे डहाणूमध्ये सुप्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर आहे. त्याला अनुसरून धवल लक्ष्मी असे नाव त्या कासवाला देण्यात आले.

महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना!

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा – महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना! पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम…

 बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा                                         

श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राट यांना मानवंदना बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार सादरीकरणाने अतीशय कमाल केली. रंगमंचावरील कुणी प्रज्ञा चक्षु तर कुणाचे हात, कुणाचे पाय नाहीत परंतु केवळ जगण्याची जिद्द नाही तर सूर, स्वर, संगीत, वाद्य अशा कशातही आम्ही कमी नाही किंबहुना धडधाकट कलाकारांपेक्षा आम्ही काकणभर सरस ठरु, अशा प्रकारे सभागृहात आपापल्या अदाकारीने दाखवून दिले. एका बाजूला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होत असतांना बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे बंधूराज ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि केवळ श्रीकांतजींसाठीच मराठी गाणी गाणाऱ्या महंमद रफी यांच्या आवाजाची जादू दिव्यांग गायकांनी रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आणि एका अर्थाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंखचा अनोखा नजराणा पेश केला. बिपिन वर्तक, मकरंद भोसले, विनोद गावंडे, सुधीर पालांडे, सारिका शिंदे, श्रद्धा घुगे या गायक कलाकारांनी विविध प्रकारच्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट गीतांचा नजराणा पेश केला. नृत्यांगना ज्योती मस्तेकर यांनी  ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली अशा लावण्यांच्या नृत्यावर उपस्थित रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले. संतोष मोहिते, नागेश कांबळे, दीपक कांबळे, हर्षवर्धन वर्तक, डोनाल्ड कोळी, महेश नाईक, शिवाजी बनसोडे या वादक कलाकारांनी स्वरपंखच्या कार्यक्रमास उत्साहाचे, भरारीचे पंख लावल्याने कार्यक्रमाची नजाकत वाखाणण्याजोगी होती. स्वतः प्रज्ञा चक्षु असलेल्या बिपीन वर्तक यांनी केलेले सूत्रसंचालन व्यावसायिक मराठी वाद्यवृंदातील प्रख्यात निवेदकांची आठवण करून देत होती. स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग कलाकारांच्या अनोख्या वाद्यवृंदाची संकल्पना आणि निर्मिती कनक क्रिएशनचे अतुल साटम यांची होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोरीवली नाट्य परिषदेचे झुंजार पदाधिकारी विजय तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाजनको, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, घारे ज्वेलर्स, गिरगांव कट्टा, लायन्स क्लब ऑफ मुंबई प्लॅटिनम, फार्मा प्रोफेशनल संदीप मानकामे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. सामाजिक,  शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आयोजकांच्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ‘ अशा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने सदैव पाठीशी उभे राहणारे गिरगांव कट्टा चे सर्वेसर्वा प्रदीप मालंडकर, आयोजक संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार मुंबई : मुंबई येथे आयोजित ‘ग्लोऱ्या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात नामवंत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक लीना र. प्रभू…

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग योगेश चांदेकर पालघरः  वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी  नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन  संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना,  थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे. निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे. नोकरीऐवजी उद्योगात रमले मन विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली. संकल्पातून ‘संकल्प हनी’…

 ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’तर्फे ‘आयटीआय मुंबई १’ येथे ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन मुंबई : ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ (आरसीबी) तर्फे शनिवारी, २४ जानेवारीला ‘आयटीआय मुंबई १’ येथे इंडस्ट्री ४.० सुसज्ज…

 राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय!

राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय! शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का रमेश औताडे मुंबई : राज्यातील शेतकरी आजही निसर्गाच्या लहरीपणाशी, बाजारभावाच्या अस्थिरतेशी आणि कर्जाच्या ओझ्याशी झुंज देत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड आणि उत्पादन खर्च वाढूनही हमीभावाची हमी नाही. पीक विमा वेळेवर मिळत नाही,कर्जमाफीची आश्वासने हवेत विरतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का ठरतो, असा सवाल शेतकरी करत आहेत. याच राज्यात आणि देशात मोठ्या उद्योगसमूहांसाठी मात्र धोरणे वेगळी भासतात. जमीन, वीज, पाणी, करसवलती, कर्जपुनर्रचना सगळे काही वेगाने मंजूर होते. प्रकल्प रखडले तरी दंड नाही; तोटा झाला तरी सवलत. मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच नियम कठोर का? शेतकऱ्यांचे कर्ज थकले की नोटीस, जप्ती आणि मानसिक ताण; पण उद्योगपतींच्या कर्जावर पुनर्गठन आणि सवलती मिळतात हा दुहेरी न्याय का? विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. आत्महत्यांची आकडेवारी धोक्याची घंटा वाजवत असताना, सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. “आम्हाला दया नको, समान न्याय हवा,” अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून उठते आहे. शेती हा उद्योग मान्य करूनही त्याला उद्योगासारख्या सवलती का नाहीत? उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, वेळेत पीक विमा, सरळ आणि पारदर्शक कर्जमाफी, वीज-पाणी सवलती या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. दुसरीकडे, मोठ्या उद्योगांसाठी धोरणांची लालफीत क्षणार्धात कापली जाते. हा फरकच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सरकारला प्रश्न केला. राज्यातील जनमत आज स्पष्ट आहे. कायद्याचे निकष समान हवेत. शेतकऱ्यांना न्याय देताना तसूभरही कमीपणा नको. देश अन्नदाता शेतकऱ्यांवर उभा आहे; त्याच अन्नदात्याच्या जगण्याचा प्रश्न दुर्लक्षित ठेवून विकासाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना एक न्याय आणि उद्योगपतींना दुसरा—हा अन्याय आता थांबायलाच हवा, अशी ठाम मागणी राज्यभरातून शेतकरी करत आहेत.

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारला गेला. हा एकप्रकारे लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे.असा आरोप अपक्ष उमेदवार ॲड. विक्की पाटील यांनी रविवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला.याविरोधात आम्ही जनहीत याचिका दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. अशी माहिती ॲड. विक्की पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून  अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या ऍड.विक्की पाटील यांनी १० हजारहून अधिक मत घेतली होती.यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. याबाबत सविस्तर बोलण्यासाठी विक्की पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी बोलतांना विक्की पाटील म्हणाले की २०१० पासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्याने शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काम करत होतो.पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली. परिणामी प्रभाग क्रमांक ४ (अ )येथे मी इच्छुक असताना जागावाटपात ती जागा भाजपाच्या वाट्याला गेली. मात्र जनसेवेचा वसा मी घेतला असल्याने नागरिकांच्या सेवेकरिता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. माझ्याकडे प्रचारासाठी खूप कमी अवधी होता. त्यातही माझ्यामागे पक्षाचे कोणतेही पाठबळ नव्हते. तरीही मी सुरुवातीपासून दारोदारी जाऊन  प्रचार करण्यावर भर दिला. मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही मला प्रचारादरम्यान मिळत होता.माझ्या मतदारसंघात अनेक उच्चभ्रू सोसायटी ही येतात. पण या निवडणुकीत माझ्या मतदार संघातील अनेक उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेशच नाकारला जात होता. या येथे अनेक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचूच दिले गेले  नाही.याचा अनुभव मी माझ्या प्रचाराच्यावेळी स्वतः त घेतला आहे. आम्हाला प्रचारादरम्यान सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रोखले जात होते. हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे.असा आरोप विक्की  पाटील यांनी यावेळी बोलतांना केला.ही पद्धत लोकशाहीला घातक अशी आहे. हे रोखण्यासाठी  यासंदर्भात लवकरच आपण एक जनहित याचिका  न्यायालयात  दाखल करण्याचा   विचार सुरू केला आहे. अशी माहिती ऍड.विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.तसेच माझा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी यापुढे मी एस. के. पाटील या माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे. असे ही विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.