Category: होम

माजी विश्व् विजेत्या प्रशांत आणि योगेशला पराभवाचा धक्का                   

२री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या सुपेश कामतेकरने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेवर २२-१८, ५-२३, २०-१२ असा चुरशीचा विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या महम्मद साजिदने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या योगेश परदेशीवर ३-१६, १९-१३, १५-१० असा खळबळजनक विजय मिळवून आगेकूच केली. एका वेळी २४ सिस्का कॅरमवर खेळविण्यात येणाऱ्या एकंदर १० लाखाची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर मालदीवज, श्रीलंका व अमेरिकेच्या खेळाडूंच्या सहभागाने हि स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. संदीप सावंत ( महाराष्ट्र ) वि वि सलमान खान ( महाराष्ट्र ) ११-८, १४-१५, १७-३ अभिषेक भारंबे ( महाराष्ट्र ) वि वि तुलसीदास हळर्णेकर ( गोवा ) २३-११, ७-२५, २३-१ जलालुद्दीन मुल्ला ( महाराष्ट्र ) वि वि नवीन चीकलापुडी ( अमेरिका ) २५-१३, १६-१७, १९-५ संतोष डोखे ( महाराष्ट्र ) वि वि सचिन बांदल ( महाराष्ट्र ) ८-९, २२-१, २५-१४ राजेश गोहिल ( महाराष्ट्र ( वि वि एस ए. इकबाल ( मध्य प्रदेश ) २५-४, २०-८ संजय मणियार ( महाराष्ट्र ) वि वि यमान जलील (  मालदिवज ) १५-२, १८-८ जुगल किशोर दत्ता ( आसाम ) वि वि प्रफुल रसाळ ( महाराष्ट्र ) ११-५. १६-४ एस के महम्मद ( तेलंगणा ) वि वि प्रकाश दुधाळे (  महाराष्ट्र ) १६-१०, २१-४ हारून शेख ( महाराष्ट्र ) वि वि गिहन चमारा ( श्रीलंका ) ६-१९, २०-२, २५-९ महम्मद अहमद ( तेलंगणा ) वि वि शरद मोरे ( महाराष्ट्र ) १५-०, १७-१० अनिल मुंढे ( महाराष्ट्र ) वि वि तैमूर अश्रफ ( दिल्ली ) ७-१५, २३-६, २३-०

रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा

 भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे मागणी   ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही इमारतींमधील रेरा नोंदणी घोटाळ्यात सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. आता या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच संबंधित बिल्डरांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे केली. घरग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्यांतर्गतची नोंदणी व बिल्डरने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून मंजूर झालेल्या कर्जातून कल्याण-डोंबिवलीतील ५८ इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांनी घरे घेतली असून, सहा हजार नागरिक राहत आहेत. कालांतराने रेरा कायद्याअंतर्गत मंजुरी मिळविण्यासाठी बिल्डरांनी महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिकेने संबंधित इमारती जमीनदोस्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकारामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांची व्यथा आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज मांडली. या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घ्यावी. तसेच सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला निर्देश द्यावेत. तसेच या प्रकरणी बिल्डरांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. 0000

 रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम

 मेनरोड, शालिमार भागात कारवाई   नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली. सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले. कारवाईत सातत्याचा अभाव शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते. 0000

विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे ब.रि.सो.पार्टीची कमिटी बरखास्त

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यामहाराष्ट्र राज्य व विदर्भ कमिटी बरखास्त करण्यात आल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी दिली आहे. दिनांक १३ डिसेंबर २०२४ व १५ डिसेंबर २०२४, नागपूर व पूणे या पक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकत्र्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रदेश स्तरीय प्रदेश व जिल्हा कमेट्या बरखास्त करून पक्ष-सदस्यता व संगठनबांधनीचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी काही विशेष पदाधिकारी यांची हंगामी पदाधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. यापुढे पक्षाची पक्षबांधनी, सदस्यता मोहिम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे व जन आंदोलन या चार कलमी कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना पक्षबांधनीचे आदेश दिले आहेत.राज्यातील सामाजिक असंतोष-परभणी, बीड सारख्या घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असून राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारसमोर सुध्दा नवीन आव्हाणे उभे केली आहेत त्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी असेही ठराव या बैठकीत पास करण्यात आले. त्याशिवाय निवडणूकीत ईव्हीएम चा गैरवापर, काळ्या पैशाचा गैरवापर, शासन-प्रशासनाचा गैरवापर, आर्थिक घोटाळे व आश्वासने आणि वन नेशन वन इलेक्शन यामुद्द्यावर भविष्यातही बीआरएसपी सातत्याने सुधारणासाठी व बदलासाठी प्रयत्नशील राहील असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. असेहीबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे, संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी सांगितले.

जवाहर नवोदय विद्यालयासाठी १८ जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा – मनोज राऊत

 अशोक गायकवाड रायगड :निजामपूर ता.माणगाव येथील पीएमसी स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा १८ जानेवारी २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठीचे प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.i वेबसाईटवरून संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावेत अशी माहिती विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मनोज राऊत यांनी दिली आहे.* जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर एकूण २ हजार ३७४ विद्यार्थी यावेळी इयत्ता सहावी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण ८० जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक परीक्षा ओळखपत्रे या https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्राचे पासवर्ड असणार आहेत सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काही माहिती हवी असेल तर त्यांनी संतोष चिंचकर ९८८१३५१६०१ ,अर्जुन गायकवाड ९८६२७९३६४०, वर्षा सावंत ७२७६००८३९९ यांना संपर्क साधावा.

सत्तरीतील सेल्फी”: लेखक आणि प्रकाशकाचे मोठे धाडसच  -सुधीर गाडगीळ

मुंबई  :  ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, अशा व्यक्तींविषयी आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या अज्ञात बाबींविषयी धैर्याने पुस्तक लिहिणे आणि ते छापल्याबद्दल “सत्तरीतील सेल्फी” या पुस्तकाचे लेखक  चंद्रकांत बर्वे आणि प्रकाशक अलका भुजबळ या…

कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या आठवर

मुंबई : कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. फजलू रेहमान (५२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कुर्ला पश्चिम येथील…

जरांगेच्या उपोषणाचा मुहुर्त आज ठरणार

जालना : मराठा आरक्षणासाठी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या बहुचर्चित सामुहिक उपोषणाचा मुहुर्त  अंतरवाली सराटीमध्ये उद्या मंगळवारी १७ डिसेंबरला सकाळी 11 वाजता ठरणार आहे. स्वता जरागे या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत. छगन…

सरपंच हत्येच्या चौकशीसाठी सीआयडी बीडमध्ये दाखल

बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाच्या युवक सरपंचांचा निर्घुनपणे खून करण्यात आल्यानंतर आज त्याचे पडसाद विधीमंडळ आणि संसदेतही उमटले. दरम्यान सरपंचाच्या हत्येच्या तपासासाठी सीआयडी बीडमध्य दाखल झाली आहे. या प्रकरणाच्या तपासाला…