Category: होम

२६ जानेवारीला रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे

अनिल ठाणेकर ठाणे : २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ईव्हीएमचा प्रतिकात्मक तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे.यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, पक्षप्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप व त्यांची ‘महायुती’ (एनडीए) सत्तेवर आल्यानंतर, भारतीय जनतेचा ईव्हीएम वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या ईव्हीएम हटाव… लोकतंत्र बचाव मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, १० डिसेंबरपासून ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने ईव्हीएम हवे की, बॅलेट पेपर अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, ठाणे शहराच्या काही भागात प्रायोगिकस्तरावर, ही ‘जनमत-चाचणी मोहीम’ यापुढेही राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी, वर्तकनगर नाका, येथे गुरुवारी, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे जनमत-चाचणी घेण्यात आली. दरम्यान, “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही ‘धर्मराज्य पक्षा’ची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा पारदर्शक लोकशाही-प्रजासत्ताकाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी. येत्या २६ जानेवारी – २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन राजन राजे यांनी केले आहे. ०००००

माथेरानच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पद्मश्री डॉक्टर अझीम काझी यांचे आश्वासन

माथेरान : माथेरान मध्ये काल अंजुमन इस्लाम या संस्थेचे चेअरमन तसेच पद्मश्री डॉक्टर जहीर काझी भेट दिली होती यावेळी माथेरान मध्ये असलेल्या संस्थेच्या इमारतीमध्ये लवकरच येतील स्थानिकांसाठी अद्यावत शाळा व…

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 1 लाखाहून अधिक दंड वसूली

नवी मुंबई: नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना राबवितांना प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या करिता महापालिका आयुक्त डॉ.…

जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी बुधवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणी महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व विधी यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे. 0000

धर्म आदर्श जीवनाचा आधार धर्म म्हणजे काय ?

  धर्म हा आदर्श जीवनाचा आधार आहे. स्वतः सुखाने जगण्याची आणि दुसऱ्यांना सुखाने जगू देण्याची. सर्वांना सुखाने जगावे असे वाटते. दुःखापासून मुक्त असे जीवन सर्वांना पाहिजे असते. पण जोवर खरे…

बंगाली वाघिणीच्या मर्यादा

  राजकीय नेत्यांनी स्वप्ने पाहण्यात, महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही; परंतु स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का, तेवढी उडी घेण्याची आपली पात्रता आहे का, कुवत आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.…

‘अंतरीचे प्रतिबिंब’ला प्रथम पुरस्कार

 ‘मराठबोली’  राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा मुंबई , ‘मराठबोली, पुणे’ या संस्थेने  घेतलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्व विषयांना स्पर्श करणार्‍या श्रेणीत मुंबईतील चार अंकांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यात ‘सदामंगल…

बॅलेट पेपरवर मतदानासाठी जनआंदोलन उभारणार- पटोले

मारकडवाडी : भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात…