Category: होम

एमएसपीसीच्या माध्यमातून फार्मासिस्ट होणार स्मार्ट

रमेश औताडे   मुंबई: महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदने  राज्यातील ४ लाख ३० हजार फार्मासिस्टला जगभरात औषध क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा ( एआय ) च्या युगात सज्ज राहण्यासाठी व औषधांचे परिपूर्ण सखोल ज्ञान व भान येण्यासाठी ‘फार्मासिस्टची उन्नत्ती’ हा कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेला ७५ वर्ष झाली असून या अमृत महोत्सवानिमित्त नवीन अद्ययावत वास्तूत हा भव्य दिव्य कार्यक्रम १३ ऑगस्टला कालिदास नाट्यगृह येथे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मराव बाबा अत्राम,  कॉन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ माँटू बुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ००००

घरोघरी तिरंगा अभियान देशप्रेमाचा जागर- किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबविले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि अलिबाग नगरपालिका यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी भालेराव, अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी उत्तम धाईगडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. शाममराव कदम, देशमुख, अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात यावर्षीही अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. मोठया उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सातत्याने त्यागाची आणि बालिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल. रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला. तिरंगा पदयात्रेस जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी जावळे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

पृथ्वीच्या व प्राण्यांच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या निमित्ताने व्हावे वृक्षारोपण

श्रावण महिना आला की आगळे-वेगळे वातावरण निर्माण होते व सणांना सुरूवात होवून सर्वत्र उत्साह दिसून येतो.श्रावण महिन्यात नागपंचमीला अत्यंत महत्व दिल्या जाते. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजाअर्चना केली जाते.नागपंचमीचा…

क्रांती भरात, त्रुटी दारात

परामर्ष हेमंत देसाई 2026 पर्यंत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा सध्याच्या एकदशांशावरून एकपंचमांश असा वाढण्याचा दिलासादायक अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने प्रकट केला आहे. एव्हाना जगभरातून परदेशस्थांनी आपल्या मायभूमीत…

बंगाली गोर्बाचेव्ह

डाव्यांनी झापडबंदच असले पाहिजे, कामगारांच्या हिताचा त्यांनी विचार केला पाहिजे, उद्योजकांचे हीत आणि त्यांना पायघड्या घालायची काहीच गरज नाही, अशी मानसिकता पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील डाव्यांची होती. उद्योगच आले…

महायुतीने शंभर जागा जिंकल्यास माझे नाव बदला- जयंत पाटील

पुणे : “विधानसभेला महायुतीचे शंभरच्या आत आमदार निवडून येणार आहेत, यापेक्षा आधिक जागा आल्या तर माझे नाव बदला”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीला ओपन चॅलेंज दिलं आहे. पुण्यातील मंचरमध्ये राष्ट्रवादीची…

नीरजला भालाफेकीत सिल्व्हर मेडल

कुस्तीत अमन शेरावतला ब्राँझ संदीप चव्हाण पॅरिस : अवघ्या भारताचे लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्राने एतिहासिक कामगिरी करीत भारताला सिल्व्हर मेडल जिंकून दिले. ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर…

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर ‘परमवीर अस्त्रा’चा हल्लाबोल

दरेकर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर, सिल्व्हर ओकवर फिल्डींग लागायची स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शऱदचंद्र पवारांची राष्ट्रवादीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपापाठोपाठ…

सर्वश्रेष्ठ की सातत्य ?

संदीप चव्हाण रात तो वक़्त की पाबंद है, ढल जाएगी देखना ये है चराग़ों का सफ़र कितना है.. पॅरिसमधिल स्टेड दी फ्रान्सच्या अतिभव्य स्टेडियमबाहेर रात्रीच्या अडीज वाजता नीरजशी बोलताना राहून…