Category: होम

  राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार..

राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न… मुंबई :    स्व. अजितदादा पवार यांची शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राज्यभर “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान”  राबविण्या एकमताने निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली  विधानभवन कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.या नव्या अभियानामुळे पक्षाला मजबूती देण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली.  पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी हीच खरी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगर म्हणाले. मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा घेत “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे,कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक,शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करा

ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करा उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना पत्र ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ‘ठाणे शहर विकास समिती’ नियुक्त करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवले आहे. पारदर्शक विकासासाठी समितीची गरज पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले की, ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटील होत आहेत. केवळ सिमेंट-काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणे ही काळाची गरज बनली आहे. समितीची प्रमुख उद्दिष्टे: उपमहापौरांनी या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून पाच प्रमुख उद्दिष्टे मांडली आहेत: विकास आराखडा (DP) नियंत्रण: शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे. जनहितकारी धोरणे: बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरण राबविणे. भ्रष्टाचार निर्मूलन: शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे. ज्वलंत प्रश्नांवर तोडगा: अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे. हॅपी इंडेक्समध्ये वाढ: नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे. राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून, शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत ठाणे मनपा आयुक्तांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ  रमेश औताडे मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार  दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख मृत्यू हृदयरोगामुळे होतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि चुकीची माहिती यांमुळे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ . कौशल छत्रपती यांनी याबाबत माहिती दिली. जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “ हार्टस्ट्राँग ” हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. ३१ वर्षीय एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. तो दिसायला फिट असतानाही हा प्रकार घडला. “फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे,” असा महत्त्वाचा संदेश ते देतात. रुथ अँड सोशल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक पहिल्या आवृत्तीत हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा आता 6०० कोटींचा…!

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा आता 6०० कोटींचा…! दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार- पालकमंत्री नितेश राणे राजन चव्हाण सिंधुदुर्गनगरी-आता निवडणुका संपल्या आहेत.त्यामुळे येणाऱ्या तीन वर्षात आपल्याला जबाबदारीने काम करायचे आहे.नारायण…

कॉपीची कुप्रथा

आपल्याकडे फेब्रुवारी – मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी – बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय,…

भ्रष्टाचार: दहशतवादाचे अदृश्य केंद्र-डॉ. सुधांशु यादव

दहशतवाद ही केवळ बंदुका आणि बॉम्बची भाषा नाही; ती समाजाच्या मुळाशी लागलेल्या किडीची, अविश्वासाची आणि घृणेची अभिव्यक्ती आहे. वरवर पाहता दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे दोन भिन्न गुन्हे वाटू शकतात, परंतु…

कबड्डी संघटनांचा शिल्पकार शंकरराव ऊर्फ बुवा साळवी !

कबड्डीच्या विकासासाठी उत्तुंग भरारी घेतलेले शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांचे नाव भारत देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील अग्रक्रमाने नव्हे तर सर्वप्रथम घ्यावे लागेल असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं.त्यांनी कबड्डीवर मनापासून…

हा करार टिकणार का?

हा करार टिकणार का? जगातील अनेक देश ट्रम्प यांना घाबरून अमेरिकेबरोबर व्यापार करार करत असताना भारत मात्र अमेरिकेला दाद द्यायला अजिबात तयार नव्हता. ट्रम्प वारंवार आपल्या विधानांवरुन ‌‘यू टर्न‌’ घेत…

बदलापुरात रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बदलापुरात रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग स्लग –रिक्षा चालकाच्या डोळ्यात मैत्रिणीने माती फेकल्यामुळे मुलगी बचावली आरोपीला अटक ठाणे: बाल लैंगिक शोषणासाठी कुप्रसिद्ध झालेल्या बदलापुरात पुन्हा एकदा अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. बदलापूरमध्ये ट्युशनला…