Category: होम

 केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज

केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक आगळावेगळा उद्यान प्रकल्प कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक आगळा वेगळा प्रकल्प साकारला जात असून यामध्ये आता महापालिका क्षेत्रातील बारावे रिंग रोड लगत  परिसरात ऑटिजम व्हिलेज साकारले जात आहे. हे ऑटिजम व्हिलेज व्हिलेज सुमारे   १२७७२ चौ मी इतक्या परिसरात तयार होत असून ऑटिजम व्हिलेज अंतर्भूत असलेल्या उद्यानात एका बाजूस ऑटिजमग्रस्त मुलांसाठी ऑटिजम व्हिलेज आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यान साकारले जात आहे. या ऑटिजम व्हिलेज मध्ये स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठी  संवेदी उद्यान, संवेदी मार्ग, संवेदी खेळाची उपकरणे, ध्यान केंद्र, उपचार केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आहेत. यामुळे महापालिका आणि एमएमआर रिजन मधील ऑटिजम रुग्णांना थेरेपी सुविधा उपलब्ध होणार आहे . उर्वरित भागात भव्य उद्यान , आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट ,एम्म्पोथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग,  जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया , टॉयलेट, सोलर सिस्टम अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हे ऑटिझम व्हिलेज मेरी रियालिटी या  विकासकांमार्फत अमिनिटी टीडीआर मधून तयार होत असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी याठिकाणी पाहणी करून २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाला   या  ऑटिझम व्हिलेजचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण करण्याबत संबंधितांना निर्देश दिले. तसेच दर सप्ताहात स्थळपाहणी करून आढावा घेतला जाईल असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सहा संचालक  नगररचना संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव व विकासक सुदेश मोर्यांनी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे व कन्सल्टंट सूरज पाटील उपस्थित होते.

  नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले

नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले नाशिक मनपाची कचरा व्यवस्थापनात मोठी झेप हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेने प्रत्यक्ष कचरा संकलन व वर्गीकरण व्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. कचरा व्यवस्थापन हे केवळ संकलनापुरते मर्यादित न ठेवता, ते मोजमापयोग्य, उत्तरदायी आणि नागरिक केंद्रित प्रणाली म्हणून विकसित करण्यासाठी मनपाने सुसूत्र, नियोजनबद्ध आणि परिणामाभिमुख मोहीम राबवली आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काटेकोर निरीक्षण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा समन्वय साधण्यात आला. या मोहिमेमुळे शहरातील ओला व सुका कचरा वर्गीकरणात अल्पावधीतच ठोस सुधारणा दिसून आली आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाधारित रिअल टाइम देखरेख प्रणाली. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन आपत्कालीन नियंत्रण कक्षातून दररोज सरासरी ८० हन अधिक कचरा संकलन वाहने आणि कचरा-संवेदनशील ठिकाणांची थेट व्हिडिओ कॉलद्वारे तपासणी करण्यात आली. यात वाहनातील ओला सुका कचरा वर्गीकरण, मनुष्यबळ उपलब्धता, मार्ग व वेळापत्रक पालन, ब्लॅक स्पॉटची स्थिती तपासून तत्काळ सुधारात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे कचरा मिश्रणावर नियंत्रण मिळाले असून, कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः शहरातील विविध वॉडर्डामध्ये दैनंदिन पाहणी सुरू केली. पायलट वॉर्डासह महत्त्वाच्या भागांना भेटी देत वाहननिहाय वर्गीकरण, ब्लॅक स्पॉट, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता तसेच नागरिकांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. यामुळे प्रशासकीय निर्णय जलद आणि प्रभावीपणे घेणे शक्य झाले. तिसऱ्या टप्प्यात साप्ताहिक आढावा व कामगिरी मूल्यमापन यंत्रणा राबविण्यात आली. विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदार, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापक, जनजागृती आणि उपद्रव शोध पथकांच्या उपस्थितीत कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामुळे जवाबदारी निश्चित होत कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली. ५३ ब्लॅक स्पॉट निर्मूलन चार स्तरांवरील पडताळणी, ब्लॅक स्पॉट निर्मूलन, घरोघरी जनजागृती, झोपडपट्टी मोहिमा आणि कडक दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून शहरातील ६० पैकी ५३ ब्लॅक स्पॉट पूर्णपणे निर्मूलित करण्यात आले आहेत. परिणामी रस्ते स्वच्छ होऊन, नागरिकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. पायलट वॉर्डमुळे वर्गीकरणात झेप प्रत्येक विभागात एक पायलट वॉर्ड निवडून राबविण्यात आलेल्या धोरणामुळे सुरुवातीला २० ते ३० टक्के असलेले कचरा वर्गीकरण सातत्यपूर्ण निरीक्षणांमुळे ६५ टक्क्यांहून अधिक पातळीवर पोहोचले. अवघ्या दोन महिन्यांत या मोहिमेचे सकारात्मक आणि ठोस परिणाम दिसून आले.

ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’!

ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’! सुयश व्याख्यानमालेत उलगडला ५० वर्षांच्या कारकि‍र्दीचा प्रवास ठाणे : चित्रपट व संगीत क्षेत्रातील तब्बल ५० वर्षांहून अधिक समृद्ध कारकि‍र्दीत १९ पार्श्वगायक व २८ अभिनेत्यांचे…

महाराष्ट्रात पीएम-ई-बस सेवा योजना फक्त कागदावरच, अद्याप एकही बस सेवेत नाही-वर्षा गायकवाड

महाराष्ट्रात पीएम-ई-बस सेवा योजना फक्त कागदावरच, अद्याप एकही बस सेवेत नाही-वर्षा गायकवाड नवी दिल्ली : पंतप्रधान-ई-बस सेवा योजना ही केंद्रातील मोदी सरकारची योजना महाराष्ट्रासाठी तर कागदावरच दिसत आहे. या योजनेअंतर्गत,…

 कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा

कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाची केली पाहणी उल्हासनगर : रविवारी आमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी…

 लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध

लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध बहुआयामी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे मत ठाणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. लतादीदींच्या…

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी कल्याण : कल्याण मध्ये एप्सटीन फाइल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी…

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र कल्याण: प्रो. डॉ. दिनेश गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून साकारलेले शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय व आविष्कारक चित्र निर्माण…

 डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन

डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन रनर्स क्लॅन फाऊंडेशनचा यशस्वी उपक्रम डोंबिवलीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय कल्याण : रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने प्रथमच १२ तास स्टेडियम…

  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड टेनिस क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून मुलांचे क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार होणार – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे…