Category: होम

  महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात पदभार स्वीकारून दोनच दिवसातच रस्त्याचे काम झाले सुरू कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे. महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे ठाणे, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचा गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत’, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा मुंबई, दि. ६ फेब्रुवारी – महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता गमावला आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे रविवार, ८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न ठाणे : श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (पश्चिम) येथील श्री माँ स्टेडिअमच्या भव्य प्रांगणात एकविसावी आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे परीसरातील बहुसंख्य विद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. या स्पर्धेत नामांकित शाळांनी चित्रकलेतील निपुण विद्यार्थी स्पर्धेसाठी पाठविले होते. चित्रकला स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंगी-बेरंगी चित्र चितारुन आपले कौशल्य प्रकट केले. तसेच सुंदर पोस्टर पेंटिंग सादर केलेत. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना १०००, ८५०, ७०० रोख रक्कमेची बक्षीसे आणि ३०० रु. ची प्रोत्साहनात्मक १० बक्षीसे देण्यात आलीत. या स्पर्धेसाठी २२ शाळांमधील जवळ जवळ १४०० मुलांचा सहभाग होता. या कार्यक्रामात श्री माँ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सीपॉल श्रीमती मिनी नायर, श्रीमती मेघना वांगे, श्रीमती रमा अनंतरामन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत

दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन अव्वल ठाणे: लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि  ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन संस्थेने बाजी मारली. एन के टी सभागृहात जुन्या संमिश्र गाण्यांवर पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत १३ शाळांमधील सुमारे १३० हून अधिक विशेष विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ तरल नागडा यांच्या संकल्पनेतून ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष होते. झवेरी ठाणावला कमलिनी कर्णबधिर स्कूलच्या चमूने दुसरा तर विश्वास सेंटरने तृतीय स्थान संपादन केले. विशेष मुलांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवसोदिवस या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजात या मुलांना स्वीकारण्याची भावना वाढीस लागल्याचे लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी सांगितले. सर्वश्री डॉ जुई मांडके आणि दिप्ती नायर यांनी यावेळी परिक्षक म्हणून काम पाहिले. लायन्स क्लबचे माजी जिल्हा गव्हर्नर राकेश चौमाल, लिओ क्लबच्या जिल्हा गव्हर्नर शिवानी शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी आभार प्रदर्शन केले.

डोंबिवलीतील गणेश स्मृती इमारतीचा पुनर्विकास मार्गी – संजय केळकर

डोंबिवलीतील गणेश स्मृती इमारतीचा पुनर्विकास मार्गी – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, डोंबिवली पूर्वेतील धोकादायक इमारतीचा रखडलेला पुनर्विकास आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून येथील भाडेकरू कुटुंबांना दिलासा…

काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम?

काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम? नाशिक महापौर दालनाचा फलक चर्चेत हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेत स्थायी समिती सभापती झालेली व्यक्ती कधीही महापौर होत नाही, असा आजवरचा नाशिकचा इतिहास आहे. महापौरपदी विराजमान…

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ रमेश औताडे मुंबई : श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो यांच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिझम नेटवर्किंग इव्हिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका…

इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक

इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील आटगाव रेल्वे स्थानका जवळील ११२ वर्ष जुना असलेला व १९९२ च्या काळातील  सुपरहिट ठरलेल्या व प्रसिद्ध…