Category: होम

वाढत्या तापमानावरील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग सरसावले

मुंबई : मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे.  ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट धडकली आहे.  गेले काही दिवस  मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील  काहा दिवस तापमानात…

सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार- जरांगे

आंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या आग्रहासाठी सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार आहे यासाठी येत्या १ मेला नारायण गडावर आमची बैठक होणार आहे. या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु आहे, असे…

‘घोषणा करतात ४०० पारची, चर्चा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची’

चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल  सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात ४०० पारचा नारा देतात आणि संपुर्ण भाषणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यांची चर्चा करतात अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर केली.…

महाविकास आघाडीची मंगळवारी रिपब्लिकन फ्रंटसोबत बैठक

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुढील तीन टप्प्यांतील मतदानासाठी महाविकास आघाडी आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी यांची एक संयुक्त समन्वय बैठक उद्या मंगळवारी ३० एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.…

महायुतीत जागावाटपाचा संस्पेस कायम

मुंबई :  मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाजतगाजत उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना त्याच जागावर महायुतीतमात्र सन्नाटा आहे. नक्की जागा कोण लढविणार याबाबतच अजून संस्पेस कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या…

निजामने केली पुनमची निघृण हत्या!

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! मुंबई,  : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम…

मतदारांच्या जनजागृतीसाठी 5 मे रोजी मॅरेथॉनचे आयोजन

पालघर  : 5 मे रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत करण्यात आले आहे. भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters…

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट संचलन पुरस्कार भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

लोकलमधून पडून डोंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू

डोंबिवली: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली. ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती. डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलने मुंबईच्या दिशेेने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. मुंब्रा खाडीजवळ लोकलच्या दरवाजाला त्याने धरलेला हात सटकला तो खाडीत पडला असे पोलिसांंचे म्हणणे आहे. अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटु्ंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशावर आतील गर्दीचा भार येतो. किंवा त्या प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणे मुश्किल होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

‘जेल का जवाब वोट से’

महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातला संताप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमटत आहे. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामध्ये ‘आप’चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सामील झाले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा व ‘जेल का जवाब वोट से’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात असल्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे, परंतु ‘आप’च्या कार्यकर्त्यांची गळ्यात पक्षाचा शेला, डोक्यावर टोपी व हाती झेंडे घेत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले ‘जेल का जवाब वोट से’ अशा आशयाच्या फलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जेल का जवाब वोट से, अरविंद केजरीवाल जिंदाबाद, भारत माता की जय, पहले लढे थे गोरो से – अब लडेंगे चोरोसे, गली गली में शोर है भाजपा सरकार चोर है आदी घोषणा करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसर दणाणून सोडला. ‘आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून ऐन निवडणुकीच्या काळात तुरुंगात टाकले आहे. या हुकूमशाही वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला जो धक्का दिला आहे, त्याचे उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत. त्यामुळे ‘जेल का जवाब वोट से’ ही आमची नवीन घोषणा आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही जागोजागी ही घोषणा व प्रचार करीत आहोत. सध्या मोदी सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, त्यामुळे बहुसंख्य मतदार हे महाविकास आघाडी – इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करतील’, असे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी बोलताना सांगितले.